Wednesday, August 31, 2011

यामुळे आर्थिक सुरक्षा मिळते काय ?

भारतीय अर्थव्यवस्था अन्य पाश्चात्य अर्थव्यवस्थांशी तुलना करता अधिक गुंतागुंतीची आहे व तिचे जे पदर अर्थव्यवस्थेला वाहुन घेतलेली व्रुत्तपत्रे वा राष्ट्रीय नियतकालिके आहेत ती ते सर्वच पदर अभिव्यक्त करतात असे नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा खरा चेहरा आपल्यासमोर समग्रपणे येत नाही. जागतिकिकरणानंतर एकुणातील अर्थव्यवस्था सक्षम झालेली आहे असे चित्र आपल्याला दिसते. ते खरेही आहे. पण त्यामागे फक्त जागतीकीकरण आहे कि ग्रामीण भारताने एकुण अर्थव्यवस्थेत उचललेला मोलाचा वाटाही आहे याचे समग्र विश्लेशन व्हायचे आहे. सध्या एकुणातील जग मंदीच्या खाईत भरकटले जात असता भारताने मात्र आपली अर्थव्यवस्था काही प्रमाणात तरी अद्यापपर्यंत सावरुन धरली आहे. गेली काही वर्ष सातत्याने चांगला जाणारा मान्सुन भारतीय अर्थव्यवस्तेच्या स्थिरीकरणातील महत्वाचा घटक आहे हे अमान्य करता येणार नाही. असे असले तरी एकुणातील पराकोटीची आर्थिक विषमता, प्रादेशिक असमतोल, पराकोटीचे होत चाललेले केंद्रीकरण, वाढत्या मक्तेदा-या आणि अर्थव्यवस्थेचे डोलारे बाह्य राष्ट्रांतील तेजी/मंदीवर वाढत्या प्रमाणात अवलंबुन असण्याचे धोके यातुन एकुणातीलच सामाजिक आर्थिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
भविष्यातील कोणत्याही आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी असणारी पुरेशी आर्थिक तरतुद करणे म्हणजे आर्थिक सुरक्षा एवढ्यापुरते समजुन चालत नाही. समजा कितीही गुंतवणुक करुन ठेवली तरी समजा चलनाचे मुल्यच कोसळले तर अर्थातच गुंतवणुकीचे मुल्य नगण्य व निरुपयोगी होवू शकते. असे रशियादी अनेक राष्ट्रांत होवुन गेले आहे....आताही होत आहे. या तेजी मंदीच्या स्थित्या या व्यक्तिगत कोणाच्याही हाती नसतात तर आता त्याला जागतीक परिस्थित्यांचे परिमाण लाभले आहे. क्रुत्रीमरित्या मागण्या वाढवुन पुरवठाही वाढवायचा हे धोरण महाकंपन्या सातत्याने वापरत असतात. प्रतिष्ठेच्या कल्पना बदलवल्या जातात आणि त्या हव्यासापोटी खरेद्या करत राहणारा एकुणातीलच कमावता समाज तेजीचे कारण ठरत जात असतो. त्या प्रमाणात कंपन्याही आपापल्या उत्पादन क्षमता वाढवत नेत असतात. पण एक क्षण असा येतो कि मागणी आणि उपलब्ध उत्पादनक्षमता यातील तोल बिघडतो...अर्थव्यवस्थेची पडझड होवु लागते आणि कमावत्या समाजाचीच घट होवु लागते. नोक-या जाणे, नफ्याचे प्रमाण घटने, उत्पन्नाची साधने कमी होणे असे बहुविध परिणाम होत जात एकुणातीलच समाजाची आर्थिक सुरक्षा धोक्यात येते.
पण आपल्या ग्रामीण भारताचे वास्तव या नियमाला अपवाद ठरते. हे क्षेत्र मुळात मागणीआधारीत अर्थव्यवस्थेचे नियम पाळते. म्हणजे उत्पादनाला काय भाव मिळणार हे सर्वस्वी खरेदीदारांच्या हाती असते. मजुरीचा दर काय असनार हे मजुर नव्हे तर श्रमाचा खरेदीदार ठरवत असतो. म्हनजे उत्पादन चांगले झाले काय आणि कमी झाले काय, अपवाद वगळता गुंतवणुक+श्रम+नफा+धोक्यांची किंमत=एकुणातील उत्पन्न अशा समीकरणाचा येथे सर्वस्वी अभाव आहे. त्यामुळे या वर्गाची आर्थिक सुरक्षा ही कायमस्वरुपी धोक्यात असते. जागतीक अर्थव्यवस्था कोणत्याही पातळीवर असो, त्याचा लाभ अत्यल्प प्रमाणात येथे पोहोचतो.
सामाजिक आर्थिक सुरक्षेत सरकारचा सहभाग कितपत मोलाचा ठरतो याबद्दल येथे भाष्य करायचे नाही. विविध आर्थिक मदत योजना/हमीभाव/सामाजिक आरोग्य योजना/पीक विमा/सार्वत्रिक शिक्षण योजना ई. आहेतच. परंतु यामुळे आर्थिक सुरक्षा मिळते काय हा खरा प्रश्न आहे. तसे असते तर शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी हजारो कोटींची प्याकेजेस दिल्यानंतर आत्महत्या थांबल्या असत्या, पण तसे चित्र नाही, म्हणजेच सामाजिक आर्थिक सुरक्षा (अगदी अन्न-सुरक्षा व आरोग्य सुरक्षाही) ख-या अर्थाने उपलब्ध नाही.
हेच आपण तंत्रशास्त्राधारित अर्थव्यवस्थेबद्दल म्हणु शकतो. फार तर या व्यवस्थेला तेजीचे फायदे तरी होतात....त्यामुळे या व्यवस्थेवर अवलंबुन असनारा समाज मंदीत तरुन जावु शकतो असे चित्र होते. पण आता त्यावरही गंभीरपणे विचार करावा लागणार आहे. सध्या जागतीक अर्थव्यवस्था मंदीची शिकार झाल्याचे चित्र आपण पहात आहोत. जगभर जवळपास ३ ते ४ कोटी लोकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. त्यात वेगाने वाढ होत आहे. जगाला रोजगार देणा-या अमेरिकेतील बेरोजगारी पराकोटीची वाढत चालली आहे. कर्जाधारित सुखनैव जीवन जगणा-या अमेरिकन समाजावर ही कोसळलेली कु-हाड अनेकांचे बळी घेत चालली आहे. ती सध्या स्टिम्युलस प्याकेजेस देवुन रोखण्याचा होणारा प्रयत्न अल्पजीवीच ठरेल कारण हे सारे मुळात क्रुत्रीम उपाय आहेत. तात्पुरते आहेत. आणि हीच कु-हाड भारतावर कधी कोसळेल याचा नेम नाही. कार्ण ज्या राष्ट्रांवर आपली आर्थिक मदार अवलंबुन आहे ती त्यांच्या मुलभुत धोरणांत बदल करणार नाही असे म्हणता येत नाही. तसे झाले (आणि ते होईल) तर येथील बहुराष्ट्रीय (व त्यांवर आधारीत) कंपन्यांतील बौद्धीक श्रमिकांवर बेरोजगारीची गदा कोसळु लागेल. मध्यंतरी ती वेळ काही प्रमाणात येवुन गेलेली आहे. त्या धक्क्यातुन अजुन बरेच सावरलेले नाहीत.
मुळात या अर्थव्यवस्थेचे पतन का होत आहे यावर गंभीरपणे चर्चा केल्याखेरीज कायमस्वरुपी आर्थिक सुरक्षा आपल्या सर्वच समाजाला कशी लाभेल यावर विचार करता येणार नाही. मी आधीच म्हटल्याप्रमाणे "क्रुत्रीमता" हा जागतीक अर्थव्यवस्थांनी पाया बनवला आहे. त्याला तंत्रद्न्यान/द्न्यान/धन यातील मक्तेदारी प्रव्रुत्तींचा आधार आहे. बव्हंशी शासनव्यवस्थाही या मक्तेदारी/भांडवलशाही प्रव्रुत्तींच्या आहारी गेलेली आहेत. या अर्थव्यवस्थेतुन होणारी निर्मिती खरोखर किती मुल्यवर्धित, जीवनोपयोगी व आवश्यक आहे यावर अर्थशास्त्रद्न्यही मौन पाळुन असतात. पण अशा उत्पादनांची होणारी भरमसाठ वाढ, त्यासाठी ब्यंका ते जनतेकडुनच गोळा केल्या गेलेल्या भांडवलाचा उपयोग आणि तोच समाज कामगार आणि ग्राहकही. एकुणातील चित्र असेच आहे. थोडक्यात मी याला मानवनिर्मित आर्थिक उन्माद म्हणतो. त्याला सारेच बळी पडत जातात...अजुन उत्पादन वाढ...अजुन विक्री...अजुन नफा...अजुन लाभांश...अजुन समभागांच्या किंमतीत वाढ....अजुन अर्जित कमायांतुन गुंतवणुकी हे एक दुष्टचक्र सुरु होते. वास्तवाचा आधार सुटलेला असतो.
त्याचीच परिणती अंतता: मंदीत होते. अवास्तव व्यवस्था करेक्शन करत मुळ पायावर येते हा सिद्धांतही भ्रामक असतो कारण मुळात हा "मुळ पाया म्हनजे काय?" याचे वास्तव दर्शन तर असायला हवे ना?
य सा-यात कमी-अधिक प्रमाणात सामाजिक आर्थिक सुरक्षा धोक्यात येते. तिचे पुर्वदिग्दर्शन सहजी होत नाही. चांगल्या काळात (सुगीत) एक शेतकरी जशी आपल्या दुष्काळी काळातील अन्नाची तरतुद करतो तशी तर्तुद केली जातेच असे नाही. अमेरिकन नागरिकांचा सर्वात मोठा दोष म्हणजे त्यांची सर्वच तरतुद कर्जाधारितच होती आणि त्यांची फळे अपरिहार्यपणे ते कधी ना कधी भोगणारच होते.
खरे तर सामाजिक आर्थिक सुरक्षा बहुआयामी आहे. संकटकाळासाठीची व्यक्तिगत तरतुद वा शासनाने संकटकाळी मदत पुरवणे एवढ्यापुरती ती मर्यादित नाही.
मला वाटतात ते महत्वाचे मुद्दे मी येथे संक्षिप्तपणे मांडतो...

१. नैसर्गिक संसाधनांची सुरक्षा: मानवी अर्थकारणासाठी, जगण्यासाठी निसर्गानेच उपलब्ध करुन दिलेला सोर्स म्हणजे सर्व प्रकारची नैसर्गिक संसाधने. आजची अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी बेसुमारपणे खनिजांची अनिर्बंध निर्यात दिर्घकालीन आर्थिक भवितव्यासाठी विघातक आहे. काही केल्या त्यात अधिकची व्रुद्धी होवु शकत नाही. त्यांवर येथेच प्रक्रिया व्हायला हवी.
जलसंसाधने: भारतीय जलसंसाधनांबाबत बेफ़िकिर आहेत हे उघड आहे...वारंवार सिद्ध झाले आहे. दुष्काळाची संभाव्य आवर्तने, मान्सुनवरील अवलंबितता ही भविष्यात एकुण आर्थिक सुरक्षा धोक्यात आणु शकते. १९७२ ते १९७५ असा प्रदिर्घ दुष्काळ ज्यांनी पाहिला नाही त्यांना माझ्या म्हणण्याचे महत्व समजणार नाही. असा दुष्काळ कधीही पडु शकतो...समग्र अर्थजीवन उद्ध्वस्त करु शकतो याची जाणीव असायला हवी. परंतु यात आता आपण चटावलो आहोत.
२. बौद्धिक संसाधनांची सुरक्षा व व्रुद्धी: कोणत्याही समाजाची अर्थसत्ता, त्यातील नियमितता व त्यातील वाढ ही उपलब्ध स्त्रोतांना कसे वापरले जाते आणि मुल्यवर्धितता कशी दिली जाते यावर अवलंबुन असते. अर्थात यालाही वास्तवाचा पाया लागतोच. बौद्धिकता, नवनिर्माणाच्या स्वतंत्र प्रेरणा या अर्थव्यवस्थेला अधिक वर्धिष्णु ठेवत असतात. असे बौद्धिक स्त्रोत वाढवणे, टिकवणे, त्यांना प्रेरणा देणे महत्वाचे ठरते ते यामुळेच. भारतात अजुनही बौद्धिक संसाधन विकास बाल्यावस्थेत आहे.
३. परंपरागत आर्थिक मुल्यांचा विकास: भारतीय अर्थव्यवस्था ही मुळातच प्राचीन काळापासुन बचती-आधारीत राहीलेली आहे. किंबहुना आजच्या जागतीक पडझडीतही ही व्यवस्था टिकत आहे याचे कारण या भारतीय मनोव्रुत्तीत आहे. आणि सध्याची जागतीक व्यवस्था हीच मुळात खर्चाधारीत आणि कर्जाधारित झाली आहे आणि तिची लागण भारतीय समाजाला आता होवू लागली आहे. त्यातुनच अवास्तव किंमतींचे लोण वाढले आहे. असेच होत राहिले तर एकुणातील आर्थिक असुरक्षितता वाढेल हे नक्की. अमेरिकेतील सब-प्राईम संकटाचा येथे विचार व्हावा. परंपरागत आर्थिक मुल्य आजही उपयुक्त आहेत हे येथे लक्षात घेणे आवश्यक आहे.
४. विकासाचे विकेंद्रीकरण: सामाजिक आर्थिक सुरक्षेचा अर्थ असतो सर्वच प्रदेशांना विकासाचा वाटा मिलावा. आपले चित्र उलटेच आहे. उद्योगधंदे विशिष्ट भागात एकवटत जात आहेत आणि खुप मोठा प्रदेश विकासापासुन वंचित आहे हे चित्र एकुनातील समाजाच्या आर्थिक सुरक्षिततेला हानीकारक आहे. त्यामुळे वाढणा-या सामाजिक समस्या वेगळ्याच...पुन्हा असुरक्षिततेत भर घालणा-या. विकेंद्रित विकासाने (औद्योगिकरणाने) सर्वच भागांतील लोकांना आपापले प्रदेश सोडुन कामा-धंद्यासाठी मुख्य शहरांकडे पळण्याची आवश्यकता राहीली नसती. एक आर्थिक असंतुलनाचे आज आहे तसे विदारक चित्र दिसले नसते. पण अद्यापही उशीर झालेला नाही. याबाबत समग्र विचार व क्रुतीची गरज आहे.

सामाजिक आर्थिक सुरक्षा शेवटी जनतेच्याच हाती आहे. आपण अर्थव्यवस्थेत नेमकी काय मौलिक भर घालतो, वास्तव आर्थिकतेशी कशी नाळ जुळवतो, आपल्या अर्थप्रेरणा या क्रुत्रीमतेकडे जात, अवास्तव प्रतिष्ठेच्या आहारी तर जात नाहीत ना, आणि सर्व प्रकारच्या भविष्यातील संभाव्य संकटांना (फक्त आर्थिक नव्हे) तोंड देण्याची मनोवस्था बनवत आहोत काय हे महत्वाचे आहे. राज्यव्यवस्था फार तर काही मदत करु शकते...सर्वस्वी नाही याचे भान असायला हवे.

Tuesday, August 30, 2011

खायाला नाय दाना आन म्हनं लोकपाल आना....

दादा, आज तरी भाकरीचा काय प्रोब्लेमच नाय व्हं
माय मजुरीला जाती
बाप चतकोर शेत नांगरतो
सरपंच येतू सांगाया
ते ठिबक सिंचन कि काय त्ये
तं कदी
इहिर काडाया
तं कदी ह्याला तं कदी त्याला...
सरकार म्हनं पैका देतं
त्वा फकस्त अंगठा उठीव...
एक गांधीबाबा देत्यो...
आन हवं तं
एक गावठीचा खंबा...
मायला आंगठा वठवायला काय बाचं जातं म्हनं?
वठवतो कि म्हंन्साल तिथं....

पर मायला आन बाला
बोलायच नाय सरपंच...
निवडनुका यिवुन -हायल्यात म्हनं...
गेलं ना रिजर्वात घोंगडं?
बाईल उबी करताय आयकतोय...
जरा ज्यादाच गांधीबाबा लागत्याल...
आताच सांगुन ठिवतोय...
नाय तं म्हनल
ह्यो प्यायाआदीच काय बरळतोय?

आन सरपंच, त्ये दिल्लीत काय तरी चाल्लय म्हन्त्यात
लय भारी गर्दी...शेराशेरात लोक म्हनं रस्त्यावं यिवुन -हायलेत
भ्रष्टाचार मिटवाया कायदा मागुन -हायलेत
च्यामारी तेंच्या
ते कदी गावाखेड्यात -हाईलेत?
खायाला नाय दाना आन म्हनं लोकपाल आना....
आस्लं कदी व्हतया व्हय?
आवं, द्येवाला निवद नाय दिला...
म्या म्हन्तो निवद नाय दिला तर इथं द्येव कदी पावत नाय
तं मानुस गांधीबाबा असा तसा सोडनार काय?
कंदी तुमी द्येव...कंदी आमी द्येव...
कबी तुम देव कबी हम देव...
मायला "द्येव" सबुद लय भारी काडला का नाय?

सरपंच ठिवा त्यो गावठीचा खंबा
पुडच्या येलला मातुर विदेशी आना
कह्याला पायजे वं त्यो अन्न्ना?
आन हा गांधीबाबा बोगस तं नवं ना?
लय बनावट आल्यात म्हनं बाजारात...
इच्यारायला तं पायजेल ना?

जावा निघोर आता
अंगठा तं मारला
यिल कामावं जवा
उठल तुम्चा बंगला...

Monday, August 29, 2011

पुरोगामी महाराष्ट्राचा प्रतिगामी चेहरा! (2)

पुरोगामी महाराष्ट्राचा इतिहास...!

समाज जेंव्हा प्रतिगत्मतेकडे वातचाल करु लागतो तेंव्हा तो सर्वस्वी स्वीकारला जातो असे होत नाही. विरोधी मतप्रवाहही जन्म घेत जातात आणि समाजाला ते गहन निद्रेतुन जागे करत राहण्याचा प्रयत्न करत असतात. यात नाथ संप्रदायाचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. जातीभेदातीत व्यवस्थेला या संप्रदायाने पाठबळ दिले. ते अर्थातच सांप्रदायिक पातळीवरच होते, पण सर्वांना दिक्षेचा आणि मोक्षाचा अधिकार आहे हे तत्व त्यांनी प्रसारित केले. या संप्रदायाचा उगम महाराष्ट्रात झाला नसला तरी नवनाथांपैकी किमान तीन नाथांच्या समाध्या महाराष्ट्रात आहेत. यावरुन महाराष्ट्रात नाथसंप्रदायाचा बराच प्रसार झाला असावे असे दिसते. द्न्यानेश्वरांचे ज्येष्ट बंधु निव्रुत्तीनाथांनी गहिनिनाथांकडुनच दिक्षा घेतली तर निव्रुत्तीनाथांनी तीच दीक्षा द्न्यानेश्वरांना दिली. द्न्यानेश्वरांचा वारकरी संप्रदायाशी कितपत थेट संबंध होता हे सिद्ध व्हायचे असले तरी ते नाथपंथीय तत्वद्न्यानाचे खंदे समर्थक होते हे त्यांच्या अम्रुतानुभव या अनुपम रचनेवरुन स्पष्ट होते. वर्णव्यवस्थेने नाकारल्यामुळे नाथ संप्रदायाचे तत्वद्न्यान त्यांना जवळचे वाटले असणे स्वाभाविक आहे. चक्रधरांनी प्रवर्तीत केलेला महानुभाव पंथ हाही समतेचे तत्वद्न्यान प्रचलित करत होता. संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाची मुहुर्तमेढ रोवली आणि महाराष्ट्रात एक नवी सामाजिक चळवळ निर्माण झाली. त्यासाठी त्यांनी विट्ठल या अवैदिक देवतेची निवड केली ही एका अर्थाने धार्मिक क्रांतीच होती. या संप्रदायात स्त्री-शुद्र-शुद्रातीशुद्र हा भेद नसल्याने चोखोबा, नरहरी सोनार, गोरा कुंभार, सावता माळी, तुकाराम, एकनाथ, शेख मोहम्मद असे असंख्य विविध जातीतील संतकवी निर्माण झाले व ते आपल्या आध्यात्मिक ते सामाजिक संवेदना अभिव्यक्त करु लागले. यात स्त्रीयांनाही समान स्थान असल्याने जनाबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा, मुक्ताबाई अशा समाजाने/धर्माने त्याज्य ठरवलेल्या स्त्रीयांनाही अभिव्यक्त होता आले. खरे तर वारकरी संप्रदायाचे हे फार मोठे यश होते. प्रतिगामी महाराष्ट्राला पुरोगामी चेहरा मिळण्याची ही फार मोठी संधी मात्र धर्ममार्तंडानी गमावली असे म्हनावे लागते. त्यामुळे वारकरी चळवळीचे यश विशिष्ट मर्यादेतच राहीले. जातीव्यवस्थेच्या बेड्या त्यांना तोडता आल्या नाहीत.
वारकरी संप्रदायाचे दुसरे अपयश म्हणजे हा संप्रदाय तत्वद्न्यानात्मक पातळीवर बव्हंशी परलोकवादीच राहीला. संसार करुन परमार्थ साधता येतो हा आद्य संत नामदेवांचा संदेश त्यांनी पाळला परंतु सांसारिक उदासीनता संसारात असुनही संपवता आली नाही हे आपण बहुतेक संतचरित्रांवरुन पाहू शकतो. दुसरे असे की समांतर वा पर्यायी सामाजिक विचारधारा त्यांना निर्माण करता आली नाही. राजकारणाबद्दल तर क्वचितच भाष्ये आढळतात...त्यामुळे तसे तत्वद्न्यान निर्माण करता आले नाही. मुळात या संप्रदायाचा उद्देशच पारमार्थिक असल्याने, इहवाद/अर्थवाद/नवनिर्मिती याबाबतही समाजदिग्दर्शन आढळत नाही.
असे असले तरी मुक जनतेला अभिव्यक्त होण्याची अभुतपुर्व संधी वारकरी संप्रदायाने दिली. आपली गा-हाणी मांडण्याची संधी मिळाली. वारीपुरता का मर्यादित असेना, समतेचा आनंद समाजाला लुटता आला.
पण नेहमी सुटणारा मुद्दा हा आहे कि सनातनी धर्मव्यवस्थेची या चळवळीबद्दल काय भुमिका होती? द्न्यानेश्वरांनी अन्य कोणालाही (आजतागायत) साध्य न झालेली काव्यात्मकतेची उंची गाठत तत्वद्न्यानाचा अभुतपुर्व सोपान रचला पण त्यांना उशिरा का होईना न्याय देण्याची बुद्धी धर्ममार्तंडांना झाली नाही. चोखोबाचा म्रुत्यु वेठबिगारी करतांना झाला...म्हणजे राज्यसत्ताही संत आणि वारक-यांच्या भावना समजावून घेण्यात अपेशी ठरले.
किंबहुना तसा प्रयत्नही वारकरी संप्रदायाकडुन झालेला दिसत नाही. किंबहुना राजसत्ता आणि धर्मसत्ता या सामाजिक आक्रिशापासुन दुरच राहिल्या वा त्यांना या चलवळीला महत्व देण्याची गरज भासली नाही. उलट या धर्मसत्तांनी चक्क वारक-यांचे आराध्य तेच विट्ठल मंदिर बळकावले आणि वारक-यांच्या हाती धत्तुरा दिला. नामदेव शिंपी असुनही त्यांच्या कुटुंबियांना विट्ठलाला नैवद्य दाखवण्याचा अधिकार होता. आता त्यावर पुरेपुर अधिकार धर्ममार्तंडांहाती आहे. विट्ठलाचे महती वाढवली वारक-यांनी आणि त्याच विट्ठलाचे अपहरण केले बडव्यांनी. वारकरी संप्रदायाने आजतागायत याबाबत सवाल केलेला नाही. हे वारकरी संप्रदायाचे वर्तमानातीलही अपयशच होते.
थोडक्यात नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय हे मध्ययुगातील पुरोगामित्वाचे चेहरे मानले तरी त्यांच्या मर्यादा होत्या हे उघड आहे.
बरे संप्रदायांचे यशापयस आपण बाजुला ठेवु...व्यक्तिगत पातळीवर तरी काही वेगळेपण मांडणारे चिंतनात्मक लेखन या काळात दिसते काय तर त्याचेही उत्तर नकारार्थी आहे.

पहिले खरे पुरोगामी: शिवाजी महाराज

सतराव्या शतकात शिवाजी महाराजांनी घडवलेली क्रांती अद्भुत...अभूतपुर्व वाटते याचे कारण मुळात या सामाजिक स्थितीत आहे. त्यांनी राजकीय क्रांती तर केलीच पण त्याला सामाजिक आणि धार्मिक क्रांतीचेही परिमाण होते. स्वाभिमान गमावून बसलेल्या समाजाला त्यांनी जाग आणली. समाजासाठी सत्ता असते हे त्यांनी प्रथम सिद्ध करुन दाखवले आणि तसेच उदात्त आचरण केले. नवनिर्मिती...मग ती शेतीची असो कि उद्योगधंद्यातील...कशी विकसीत होइल याचे भान त्यांनी प्रथमच दाखवले. स्वातंत्र्याचा श्वास काय असतो हे त्यांनी सातत्याने गुलामीत/अस्थिरतेत काही शतके जगणा-या प्रजेला क्रुतीने दाखवून दिले. धर्मसत्तेला धुडकावत समुद्रबंदी तोडली हे तर फार मोठे क्रांतीकार्य होते. बाटलेल्यांना स्वधर्मात त्यांनी घेतले आणि स्म्रुतीसम्राटांची वाचा बंद केली. समाजातील सर्वच घतक, मग ते ब्राह्मण असोत कि अगदी महार-मातंग, त्यांनी स्वराज्ज्याच्या प्रयत्नांत सामील करुन घेतले. महार सैनिकांनी पराक्रम गाजवला तर त्यांची सन्मानाने मिरवणुक काढण्याची प्रथा आणली. त्यांना वतने दिली, किल्लेदा-याही दिल्या तर अल्पांश असल्या तरी पाटीलक्याही दिल्या. आज हे प्रयत्न अत्यल्प वाटत असले तरी तत्कालीन एकुणातील सामाजिक परिस्थितीत त्याचे महत्व वेगळेच आहे. त्यांनी वेठबिगारीही बंद केली आणि उत्पादन/सेवांना उचित मोबदला हा न्याय्य सिद्धांत अस्तित्वात आनला. त्यांच्या मागे समाज प्राणपणाने उभा राहीला तो उगाचच नाही. स्त्रीयांचा आणि परधर्मियांच्या धार्मिक भावनांचा सन्मान हे एक त्यांच्या क्रांतीचे एक वैशिष्ट्य होते. पुर्वी तसे नव्हते. राजकीय तत्वद्न्यान तर पुर्णतया स्वतंत्र होते. युद्धशास्त्रातही त्यांनी मोलाची भर घातली. राज्याभिषेक करुन घेवुन (त्याबाबतचे वाद विवाद येथे अभिप्रेत नाहीत....त्यांनी अनेक शतकांनंतर एक भारतीय राज्याभिषेक करवुन घेवु शकतो हे सिद्ध केले...हे महत्वाचे) एतद्देशीय सत्तेचे उद्गाते ठरले आणि त्यासाठे त्यांनी धर्ममार्तंडाचाही विरोध पत्त्करला. महाराजांबद्दल लिहावे तेवढे कमीच आहे. येथे एकच सांगतो की गत सहस्त्रकातील पहिले ख-या अर्थाने पुरोगामी क्रांतीकारक हे शिवाजी महाराज आहेत याबाबत दुमत होवू शकत नाही.
असे असले तरी ही क्रांती अल्पजीवी ठरली याचा खेद आहेच. संभाजी महाराज व नंतर राजाराम महाराज यांना ती गती वा स्थीतीही सांभाळता आली नाही हे त्यांच्या गौरवशाली जीवनाकडे/क्रुतींकडे अत्यादरपुर्वक पाहुनही लक्षात येते. राज्यलोभाचा मुळ मानवी स्वभाव आडवा यावा आणि तिस-याच पीढीत स्वराज्य मोगलांचे मांडलिक व्हावे हा खेदकारी चमत्कार मराठी मानसाने दाखवुन प्रतिगामीतेची मुलभुत चाहुल दिली. याचसाठी अट्टाहास होता का हा प्रश्न शिवाजी महाराजांना पडला नसेल तरच नवल.
बरे, तरीही, या अत्यंत उलाढालीच्या काळात धर्ममार्तंडांची द्रुष्टी बदलली का, तर याचेही उत्तर नकारार्थी येते.
खरे तर भारतीय इतिहासात धर्ममार्तंडांनी एखादी निर्णायक भुमिका बजावली याचे उदाहरण मिळत नाही. असलीच तर ती नकारार्थीच आहे. हा वर्ग एवढा अतिरेकी का होत गेला याचे उत्तर स्माजशास्त्रद्न्यांनी शोधायलाच हवे. मी येथे धर्ममार्तंड हा शब्द जाणीवपुर्वक वापरत आहे. सर्वसामान्य ब्राह्मणांना उद्देशुन नाही हेही येथे लक्षात घ्यावे. एक राजा जनमानसाचे स्वप्न म्हणुन जागत होता आणि त्याच वेळीस धर्म/अर्थ/काम/मोक्षाच्या शिदो-या घेवून बसलेला हा धर्मनियमांचा कर्ता-करविता समाज कोठे होता, हा प्रश्न उद्भवने स्वाभाविक आहे, आणि कितीही कोलांटउड्या मारल्या तरी त्याचे सक्षम उत्तर मिळत नाही.
म्हणजे पहिली पुरोगामी क्रांती फसली का याचे उत्तर सत्तालोभात जाते तसेच आणि तेवढेच प्रतिगामी विचारधारांकडेही जाते.



Sunday, August 28, 2011

पुरोगामी महाराष्ट्राचा प्रतिगामी चेहरा! (1)



प्रत्येक प्रदेशाची स्वता:ची अशी स्वता:ची संस्क्रुती असते. संस्क्रुतीत भाषा, साहित्य, कला, धर्मशास्त्र, युद्धशास्त्र, राजशास्त्र, अर्थशास्त्रादि घटकांचा आणि त्यामागील एकुणातील समाजमानसशास्त्राचा समावेश होतो. मराठी संस्क्रुतीला किमान २५०० वर्षांचा द्न्यात इतिहास आहे. सहाव्या शत्कात एका चीनी प्रवाशाने महाराष्ट्राला भेट दिली होती तेंव्हा त्याने नोंदवून ठेवले आहे कि "येथील भुमी सुपीक आहे आणि लोक अत्यंत कष्टाळु आहेत. येथील लोक जिद्न्यासु असून नव्या गोष्टी शिकण्यास तत्पर असतात. येथील लोक प्रामाणिक आणि कष्टाळु असून ते सावळे पण काटक असतात. ते मुलता: दयाळु व्रुत्तीचे व स्वभावाने साधे असले तरी शत्रुच्या बाबतीत अत्यंत कठोर असतात. त्यांना अपमान सहन होत नसून जर तसे काही झाले तर सुड उगवल्याखेरीज रहात नाहीत. संकटप्रसंगी ते एकमेकांना मदत करण्यात तत्पर असतात." हे एका परकीयाचे निरिक्षण आहे आणि ते अनेक बाबतीत खरेही आहे. आजही आपण अल्पांशाने का होईना याचा, विशेश्त: ग्रामीण महाराष्ट्रात, अनुभव घेवू शकतो.
महाराष्ट्र पुरोगामी होता कि प्रतिगामी याचा ऐतिहासिक आढावा घेणे येथे रोचक ठरेल. त्यासाठी आपल्याला आधी पुरोगामी म्हणजे नेमके काय हे समजावून घेण्याची गरज आहे.
"पुरोगामी म्हणजे प्रस्थापित अन्याय्य समाजनियम/धर्मनियम/अर्थव्यवस्था/राजकीय धारणा/नीतिशास्त्र याविरुद्ध जात नवसमाजाला अनुकुल असे समतामय नियम अस्तित्वात यावेत यासाठी संघर्ष करनारा वर्ग म्हणजे पुरोगामी होय तर जे जुने आहे तेच तसेच्या तसे अपरिवर्तनीय आहे असे मानत समाजाला पुरातनत्वाच्या पाशात ओढत राहतात ते प्रतिगामी होत."
या वरील व्याख्येनुसार आपण पुरोगामी महाराष्ट्र आणि प्रतिगामी महाराष्ट्र याची गतेतिहासातील चर्चा आधी करुयात म्हणजे आपल्याला वर्तमान अजुन घासुन-पुसुन लक्खपणे पाहता येईल आणि निर्नय घेता येईल कि खरेच आज आम्ही पुरोगामी आहोत कि प्रतिगामी. दुर्दैवाने त्याचे उत्तर प्रतिगामी असेच येते आणि त्यावरील विवेचन मी येथे करत आहे.

प्रतिगात्मतेचा इतिहास:

तो अद्न्यात चीनी प्रवासी ईस ६२० च्या आसपास महाराष्ट्रात येवून गेला. त्याच्या वर्नणावरुन मराठी मानसिकतेचा एकंदरीत प्रत्यय येत असला तरी तेंव्हाची धार्मिक/सामाजिक स्थीती नेमकी काय होती याचा त्यावरुन आपल्याला अंदाज येत नाही. देवल स्म्रुतीची रचना मात्र महाराष्ट्रात झाली आणि तिचा काळ हा इस्लामी आक्रमणे आणि धर्मांतरांनंतरचा आहे हे स्पष्ट आहे. हा काळ इस. १२ वे ते १३ वे शतक असु शकतो. याच काळात रामदेवरायाचा मंत्री हेमाडपंत याने "चतुर्वर्ग चिंतामणी" या ग्रंथाची रचना केलेली दिसते. म्हणजे या काळात जातीव्यवस्था नुसती बळकटच नव्हे तर अन्याय्य होण्यास सुरुवात झाली होती असे दिसते. एवढेच नव्हे तर काशी खालोखाल पैठण हे एक धार्मिक बाबतींत (ते ठरवतील तसे) निर्णय घेण्याची अधिकारक्षमता मिळवुन बसले होते हेही दिसते. द्न्यानेश्वरांचे उपनयन याच पीठाने नाकारले. खरे तर आळंदीकर ब्राह्मण या तिन्ही भावंडांचे उपनयन व्हावे या पक्षात होते. म्हणजे धर्मनियमही सुस्पष्ट नव्हते. पण एक धर्मपीठ म्हणुन धर्म-अधर्म बाबत निर्नय घेण्याचा अधिकार या पीठाला मिळाला होता. पहिल्या सहस्त्रकातील राजवटी पाहिल्या तर असे कसले धर्मपीठ आस्थित्वात असल्याचे दिसत नाही. उलट राजसत्ता या खुपच सहिष्णु असल्याचे दिसते. म्हणजे बौद्ध विहारांना ते आर्थिक मदत करत तशीच जैन धर्मियांना व वैदिक कर्मकांडांनाही उदारपणे मदत करत असल्याचे चित्र आपल्याला तत्कालीन शिलालेख/ताम्रपटांवरुन दिसते. सातवाहन कुळातील राजे समुद्रसंचारी बनले होते...तीन्ही समुद्रांवर अधिकार गाजवला होता व त्यांचे नौकादल बलाढ्य होते याची नोंद अगदी ग्रीक प्रवाशांनीही घेवून ठेवलेली आहे.
पण दुस-या सहस्त्रकाच्या आरंभकाळापासुनच कालात आपण एक उलटा प्रवास झालेला दिसतो. याच काळात वेदबंदी, शिक्षण बंदी (ब्राह्मणेतरांना) समुद्रबंदी (सर्वांना), वर्णबंदी...(म्हनजे कलियुगात फक्त दोनच वर्ण...ब्राह्मण आणि क्षत्रीय...बाकी वर्ण आस्तित्वातच नाहीत...) परशुरामामुळे क्षत्रिय हटवले हे ठीक समजा....पण वैश्य कोणत्या धर्मनियमाने हटवले? त्याबाबत पुराणे मौन पाळुन आहेत. शेतकरी हा खरे तर वर्णव्यवस्थेत वैश्य...पण त्याचे तेही स्थान हिरावुन घेतले गेले आणि त्याचा व्यवसाय कायम ठेवून त्याला सामाजिक/धार्मिक पातळीवर एक पायरी अजुनच अध:पतीत केले. अन्य जातीयांनाही त्याच पातळेवर आणुन शुद्रातीशुद्र, अस्प्रुष्य अशा समाजाचीही निर्मिती केली आणि अति-प्रतिगामी विचारांचा उदय केला. हे फक्त महाराष्ट्रात झाले असे नाही तर उर्वरीत देशातही पद्धतशीरपणे केले गेले.
का? अशी काय निकड भासली होती धर्मनियंत्यांना कि ज्या बाबी फार नसल्या तरी काही समता/सामाजिक अधिकार या बाबत काही प्रमाणात उदारत्व बाळगत असलेल्या समाज/धर्म स्थीतीला एकाच वळचणीला आणले?
हे माझे विधान धाडसी वाटले तरी मी स्पष्ट करु इच्छितो कि इस्लामी सत्ता आणि काशी/कांचीची धर्मपीठे यांनी इस्लामी सत्ता सुखनैव येथे नांदावी यासाठी सत्ताधा-यांशी काहीतरी संगनमत केले असावे, अन्यथा एकाएकी स्म्रुतीसत्ता (धर्मसत्ता हा शब्द मी मुद्दाम वापरत नाही.) एवढी बलाढ्य व सर्वोपरी होवुच शकली नसती. सर्वच ब्राह्मण यात सहभागी असण्याची शक्यताच नव्हती. किंबहुना या कथित वेदद्न्यानी आणि इस्लामीय साठगाठीमुळे सामान्य ब्राह्मण समाजाचेही पराकोटीचे नुकसान झाले. गतसहस्त्रकात द्न्यान-विद्न्यानाची प्रगती खुंटली. अभिजात साहित्याची निर्मिती थांबली. संस्क्रुत भाषा म्रुत्युपंथाकडे गेली व जनभाषा हळुहळु जनजीवन व्याप्त करु लागली. या संक्रमणाचा इतिहास आपल्याला तपासायलाच हवा. याच काळात जातीव्यवस्था कठोर झाली. खुद्द ब्राह्मण समाज ५५० जातीत वाटला गेला.
प्रश्न अर्थव्यवस्थेचा असतो...धर्मापेक्षाही आर्थिक आकांक्षा आणि जगण्याचे राजकारण नेहमीच सर्वोपरी ठरत असते. धर्म हवा तसा वाकवता येतो. अर्थव्यवस्था ही मात्र अत्यंत वास्तव असल्याने ती म्हनाल तशी कधीच वाकवता येत नाही. या विशिश्ट काळात परकीय सत्त्तांमुळे अर्थव्यवस्था कोणच्याही हातात उरलेली दिसत नाही. येत्द्देशियांच्या तर नाहीच नाही. व्यापार थांबल्यांमुळे निर्मानकर्ते...मग ते लोहार असोत कि सुतार, माळी असो कि धनगर...तेली असो कि तांबोळी...यांचे व्यवसाय मर्यादित होत होत शेवटी गावगाड्याच्या चौकटीत अडकुन बसले. आपापल्या व्यवसायात स्पर्धा नको म्हणुन ब्राह्मनच काय अन्य जातीयही जातीची चौकट अन्न्याय्य पद्धतीने विकसीत करत गेले. "माझ्या व्यवसायात अन्य कोणी पडु नये...अन्यथा आह्र त्या एकुणातील मागणीच्या स्थितीत माझे उत्पन्न थांबेल..." ही असुरक्षिततेची भावना विकसीत होत गेली. यातुन जातमाहात्म्य वाढत खरे तर प्रत्येक जात हा एक स्वतंत्र धर्म बनत गेला आणि एकुणातील धर्म हा असंख्य जातीयांचा संघ बनत गेला. जात पंचायतींची सुरुवात जर अभ्यसली तर लक्षात येते कि याच काळात त्यांचा उदय झाला आणि त्याही अन्याय्य व कठोर बनत गेल्या. या जातीय संस्था स्वता:चे कायदे पाळत होते व त्यानुसार शिक्षा देण्याचा अधिकार बळकावून बसले होते, एवढे, की राजसत्ताही तंटे निर्माण झाले तर जात-धर्मानुसार निर्णय घेत असत, स्वीकारत असत. या प्रक्रियेतुन कोणतीही जात सुटलेली दिसत नाही. आजही अनेक जातींत आपण जातपंचायतींची सार्वभौमता अनुभवत आहोत.
ब्राह्मणही आपापले विशिष्ट देवांचे पुजाहक्क, धर्महक्क सांगते झाले, एवढेच नव्हे तर ते हक्क अबाधित रहावेत म्हणुन प्रसंगी मुस्लिम सत्तांच्या दरबारांतही गा-हाणे गुदरते झाले. (शंकराचार्य पदाचा वाद तर ब्रिटिश न्यायालयातही लढला गेलेला आहे...) हा सर्व लढा आपापल्या जातीय हक्कांना अबाधित राखण्यासाठी होता....आणि त्यामागे सर्वस्वी बदललेले अर्थकारण आणि राजकारणही होते हे लक्षात घेतले पाहिजे.
सांगायचा मुद्दा हा आहे कि प्रतिगामिता कशी असते याचे दर्शन महाराष्ट्राने गतकाळात घडवले आहे. चक्रधरांची हत्त्या हेमाडपंताच्या निर्देशाने केली गेली. द्न्यानेश्वर व त्यांच्या बांधवांना सामाजिक समतेचा, भले तो जात-निष्ठ असो नाकारला गेला. धर्मांतरीतांना पुन्हा धर्मात घेण्याचा जोही काही धर्मनिष्ठ/जातनिष्ठ मार्ग होता (अगदी देवल स्म्रुतीनेही सांगितलेला) तोही नाकारला गेला. थोडक्यात समान न्यायाचे मुलतत्वच सर्वांना, मग तो कोणत्याही जातीचा असो, नाकारले गेले. आणि अपरिहार्यपणे सर्वच समाजाने ते स्वीकारले.
आणि याच वेळीस राजसत्तात्मक प्रतिगामीपणा क्रमश: स्वीकारला गेला. आत्माभिमान, स्वाभिमान, शत्रुंबाबत कडवा असे म्हणवला जाणारा मराठी समाज आक्रमकांचा एकनिष्ठ चाकर बनला. दैवतवादाच्या (ही आपली गतजन्मातील पापांमुळे निर्माण झालेली अपरिहार्य स्थीति आहे असे मानत) आहारी जात याच नव्य समाजाने आपल्याच समाजाशी वैर मांडले.
मी याबाबत तत्कालीन समाजाला दोष देत नाही. चुकत होते ते धर्माचे आणि समाजव्यवस्थेचे नियंते. आणि या धर्मसत्ता सर्वसामान्य ब्राह्मनांच्या हातुनही निसटल्या होत्या. त्या केंद्रीभुत झाल्या होत्या त्या काशी, पैठण आणि कांचीच्या विद्वत्सभांहाती. शंकराचार्य पीठांचा अधिकार कधीच संपला होता. आणि पुर्वापारच्या राजसत्ताच या नव्य परकीय सत्तांचे एकनिष्ठ चाकर बनल्याने स्वकीयांच्या हिताची त्यांना काळजी वाटणे असंभाव्यच होते. यादवोत्तर आणि शिवपुर्व काळात तशी या चाकरांची समाजाशी काही बांधिलकी होती याचे निर्देश मिळत नाहीत. या चाकरांनी पराक्रम गाजवले, आपल्याच स्वबांधवांची आणि आक्रमणांच्या निमित्ताने अन्य राजकीय क्षेत्रात असणा-या प्रदेशांची (व पर्यायाने सामान्य जनतेची) धुळधान उडवण्यात कसलीही कसर सोडलेली दिसत नाही.
हे विवेचन अशासाठी कि प्रतिगामत्व कसे मुळात उद्भवले. ते कसे क्रमश: द्रुढमुल होत गेले. त्यामागील सामाजिक राजकीय स्थित्या नेमक्या काय होत्या हे आपणास पाहिले पाहिजे. पहिल्या सहस्त्रकात स्थिर सुर्य सिद्धांत (प्रुथ्वी केंद्रित) मांडण्यापासुन ते सुर्यकेंद्रित सिद्धांत (आर्यभट्टीय) मांडण्याची बौद्धिक क्षमता असणारा समाज, अद्वैततात्मक तत्वधारा मांडणारा समाज, बौद्ध असोत की जैन, यांच्याशी सहिष्णु वागणारा समाज आपापसातच एवढा वैरभावाने वागु लागला याचे समाजशास्त्रीय विवेचन अभिप्रेत आहेच. विद्न्यानाभिमुख समाज परत का अजनाभ वर्ष ते मेरु पर्वताच्या बाता करायला लागला? द्न्यानेश्वरांना "न चालता सुर्याचे चालणे" हे वैद्न्यानिक विधान करण्यासाठी मुळातील आर्यभट्टीय परंपरा उपलब्ध कोठुन झाली आणि ती लुप्त होत हाच समाज ऐहिकतेच्या बाबत उदासीन होत पारलौकिक आणि तेही जातीनिष्ठ होत कसा अध:पतीत झाला? तो एवढा कसा प्रतिगामी झाला?
इस्लामी आक्रमणे आणि त्यांची सत्ता स्थिरस्थावर झाल्यावर येथील धर्मनियंते/समाजनियंते पराकोटीचे बदललले दिसतात याला मी योगायोग मानत नाही. समाजनियंते सत्ताधारी जसे या नव्य सत्तांचे एकनिष्ठ चाकर बनले तसेच धर्मसत्तेनेही केले असे मी वर म्हणालो आहे ते यापोटीच.
हा प्रतिगात्म्तेचा इतिहास आपल्याला ब्रिटिश काळात वेगळ्या पद्धतीने विकसीत झाला आहे असेही दिसते. माक्स्मुल्लर या जर्मन विद्वानाने आर्य सिद्धांत भाषिक परिप्रेक्षात मांडला. त्याचे विघातक परिणाम लक्षात घेवून त्याने तो मागेही घेतला...पण येथील विद्वान अधिक अक्कलवान होते. त्यांनी आर्य सिधांतामुळे ब्रिटिश आणि ब्राह्मण हे एकाच मुळाचे ठरतात अशी समजुत करुन घेतली. विष्णुशास्त्री चिपळुनकर हे तर ब्रिटिशांना "आमच्या आर्य रक्ताचे पुरातन बांधव..." असे उद्देशुन म्हणु लागले. टिळकांनी यावर तर कळस चढवला. ओरायन असो कि आर्क्टिक होम इन वेदाज...ते ब्राह्मण (आर्य) हे उत्तर खंडातुन भारतात आले असे हिरिरेने सिद्ध करु लागले. बरे हे सांगणारे टिळक हे त्याच वेळी राष्ट्रीय पातळीवरील नेते होते...त्यामुळे त्यांच्या विवेचनाचा समाजमनावर प्रभाव पडणे स्वाभाविक होते. ब्राह्मण या संशोधनामुळे शेफारले तर बहुजनीय वर्ग ब्राह्मण हे पर्कीय असुन आपल्यावर आपली धर्मसत्ता लादणारे आहेत अशी प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते. राजकीय चळवळीवरही या नव्य-संशोधनाचा परिणाम झाला. ब्रिटिशांच्या चाक-या करण्यात कमीपणा वाटणे आता शक्य नव्हते कारण ब्रिटिशही आर्य वंशाचेच...पुढेही या मित्थकावर समाज विश्वास ठेवत गेला. त्यावर कसलाही अंकुश राहीला नाही. बाबासाहेबांनी "आर्य हा वंश नसुन जोही काही पुरातन काळात संघर्ष झाला तो धर्मश्रद्धांबाबत होता...वांशिक नव्हे..." हे स्पष्ट करुनही आजही त्यांचे अनुयायी म्हणवणारे काही लोक त्यांचेच विधान ऐकत न्नाहीत. मान्य करत नाहीत. "आर्य वंश हा एक तिढा आहे." असे वरकरणी मान्य करत डा. मधुकर ढवळीकरांसारखे संशोधक आर्य हेच सिंधु संस्क्रुतीचे निर्माणकर्ते होत असे मत मांडतात. (पहा...आर्यांच्या शोधात...ले. मधुकर केशव ढवळीकर). अगदी तर्कतीर्थ लक्षमण्शास्त्री जोशीसुद्धा आर्यवादाचे (म्हनजे आर्य नामक लढावु वंश भारतात प्रवेशला व त्यांनी येथील अडाणी-रानटी संस्क्रुतीला जिंकुन त्यांना मानसाळवले व आपल्या व्यापक सांस्क्रुतिक परिप्रेक्षात सामावून घेतले, त्यांच्या रानटी देवतांना (शिव/शक्ती आदि) वैदिक अलंकार चढवून आपलेसे करुन घेतले....) खंदे समर्थक होतेच. पण आर्यवादाने समाजाला प्रतिगामी बनवण्यात १९ व्या शतकात फार मोठा हातभार लावला. वेदांची निर्मिती येथील सरस्वती नदीच्या खो-यात नव्हे तर हेल्मंड नामक अफगानिस्तानातील सरस्वतीचेच मुळ नाव असणा-या नदीच्या काठी झाला असे उच्च रवाने सांगितले जावू लागले. आर्य हा एक प्रबळ, शक्तीशाली, विजिगिषु लोकांचा समुदाय होता व त्यांनीच जगभर विखरुन नवी सम्स्क्रुती घडवली असे हिरिरीने प्रतिपादन केले जावू लागले. यात कसलीही तार्किकता नव्हती, ऐतिहासिक पुरावेही नव्हते...पण तरीही ही प्रतिगात्म भावना अंतत: विघातक ठरली हे मात्र खरे.
या आर्यवादापुर्वी भारतात वा कथित हिंदु धर्मात ब्राह्मण ष्रेष्ठत्वतावाद होताच. पण तो जातीय परिप्रेक्षात. त्याला या माक्समुल्लरपर्यंत आणि टिळकांनी सैधांतिक रुप देईपर्यंत तो एकाच समाजसमुहातील अंतर्गत वाद होता...पण आर्यवादाने त्याची व्यापकता वंशश्रेष्ठत्वता वादापर्यंत वाढवली. हा प्रतिगामीपणा भारताला केवढा महागात पडला आहे याचे विवेचन मी पुढे करतच आहे. पण आपल्या धर्माचे नियंते हे आपल्या वंशाचे नाहीत, या भुमीचे नाहीत, स्वकीय नाहीत ही जाण याच मुढांनी वंशष्रेष्ठत्वाच्या वल्गना हाकण्याच्या नादात स्वता:च्याच पायावर कुर्हाड मारुन घेतली. महात्मा फुलेंनी ब्राह्मण वर्गावर जे आघात केले त्यात "आर्यभट" हा शब्द संतापाने का येतो याचे कारण फुलेंना शिव्या घालना-यांना आजही नाही.
महाराष्ट्रात ब्रिटिश काळात निर्माण झालेला हा आर्यवंश वाद आणि आर्यवंशीय समजणारा परकीय ब्राम्हणसमाज हे मात्र ब्राह्मण समाजाने प्रतिगामत्वाचे गाठलेले टोक होते. (फक्त ब्राह्मणच का तर...क्षत्रिय आणि वैश्य हे वर्ण नंतर कलियुगी नाहीतच ही पौराणिक धारणा होती म्हणुन...तसे पाहिले तर आजही स्वत:ला क्षत्रिय/वैश्य म्हनवणारे आहेतच...आर्यवाद ग्रुहित धरला तर तेही परकीय ठरतात...मग फक्त ब्राह्मणांनीच देशाबाहेर चालते व्हावे हे त्यांना म्हणता येणार नाही.)
प्रतिगामत्वाचे दुसरे सामाजिक रुपही आपल्याला पहायला हवे. सती प्रथा खरे तर भारतात रजपुत या भारतीय क्षत्रीय बनलेल्या पण मुळात सिथियन मुळाच्या परकीयांनी दिलेली देणगी. शक, हुण, कुषाणांतही या प्रथा होत्याच. कारण मुळात या भटक्या टोळ्या. युद्धे झाली तर जिंकलेया पुरुषांना ठार मारायचे आणि स्त्रीयांवर अनन्वित शारीरिक अत्याचार करायचे. समाजशास्त्राचे चिंतक प्रा, हरी नरके याबद्दल म्हणतात "स्त्री हा कोनत्याही सामाजिक अत्याचाराचा पहिला बली ठरतो कारण त्यामागे एखाद्या पराजित समुदायाचा पराकोटीचा अवमान करणे हा मुलभुत हेतू असतो.". मी त्यांच्या मताशी सहमत आहे. खरे तर अखिल मानवी इतिहास हा स्त्रीयांवरील अत्याचाराचा कधीच न लिहिल्या गेलेल्या वेदनांचा इतिहास आहे.
पण सातवाहन काळापर्यंत तरी आपण स्त्रीसत्तेचे मोहक रुप पाहु शकतो. सम्राद्न्यी नागणिकेची महत्ता पाहु शकतो. एवढेच नव्हे तर अनेक राजे आपल्या आयांचे नाव अभिमानपुर्वक लेत आहेत असेही पाहु शकतो. (उदा. गौतमीपुय्र सातकर्णी, वासिष्ठीपुत्र सातकर्णी...)
पण गत सहस्त्रकात स्त्रीयांना संपुर्ण अंधारात फेकले गेले. आणि आस्चर्य असे कि या स्त्रीया बव्हंशी धर्मसत्तात्मक घराण्यातील होत्या. सती प्रथा राजपुत इतिहास पाहिला तर खरे फक्त लढवैय्या घराण्यांत हवी. म्हणजे योद्धा रणात पडला, पराजय झाला तर अत्याचार/बलात्कारांची वेळ येवू नये म्हणुन, विटंबणा नको म्हणुन. भारतीय (इस्लामपुर्व व परकीय शक-हुण-कुशानादी आक्रमकांशीचा) युद्धेतिहास पाहिला तर स्त्रीयांना अवमानास्पद वागणुक दिल्याचे उदाहरण सहजी सापडत नाही. उत्तरकाळातही मराठी सत्ताधारी वर्गातील स्त्रीयांनी सतीप्रथा अभावानेच पाळलेली दिसते, तेही धर्माद्न्या कठोर होवु लागल्यानंतर. जिजाबाई सती गेल्या नाही. शिवाजीमहाराजांची एक राणी सोडली तर सोयराबाई व अन्य राण्या सती गेलेल्या नाहीत. (सती गेलेल्या पुतळाबाईस नेमक्या कोण यावर आता काही लोक वाद घालत आहेत हे वेगळेच!)
परंतु बालविवाहामुळे सर्वच समाज एका धुंदीत गेला. बालविवाहामागे तत्कालीन सामाजिक कारणे असतीलही. पण ती नक्कीच भुषणास्पद नाहीत. इस्लामी अत्याचारापोटी काही काळ अशी प्रथा आली असे समजुन घेतले तरी मग जेंव्हा काही काळ का होईना जेंव्हाही (पेशवाईसह) एतेद्देशीय सत्ता देशावर नांदत होत्या त्याही काळात ही प्रथा चालु ठेवण्यात प्रतिगामीपणाच होता. खरे तर त्याही पुर्वी स्त्रीयांना आपले वर निवडण्याचे स्वातंत्र्य होते. एवढेच नव्हे तर विधवांना हव्या त्या पुरुषाशी संबंध ठेवायला सामाजिक मान्यता होती. (पहा...कामसुत्र...वात्स्यायन...) पण नंतर स्त्रीयांना (त्यांना पुन्हा उजेडाची संधी देण्याची सोय असतांनाही) अक्षरश: गुलामापेक्षा हीण/उपभोग्य पातळीवर आणुन ठेवले कसे गेले?
याचे उत्तर आपल्या प्रतिगामीपणातच आहे. आजही आहे पण ते कसे यावर नंतर.
सती प्रथा ही मुळात अभारतीय/अहिंदु असुनही तिचे अनुसरण करणारा हा महाराष्ट्र. (माद्रीचे उदाहरण खोटे आहे कारण माद्री सती गेली नाही. पांडुचे शव घेवुनच कुंती हस्तिनापुरला आली होती व तेथे त्याचे उत्तरकर्म केले गेले.) स्त्री सती जाणार नसेल तर तिला विद्रुप करण्याची चाल आणनारा हा प्रतिगामी महाराष्ट्र. खरे तर हिंदु धर्मात जेही काही धर्मनियम आहेत त्यातही न बसनारा हा विक्रुत प्रकार महाराष्ट्रात प्रचलित केला तो या प्रतिगाम्यांनी. विधवांनी केशवपन करावे, अंधा-या खोलीत बसावे, लाल वस्त्रे नेसावीत...असे काही कोणत्याही धर्मशास्त्राने लिहिलेले नव्हते.
ज्या बाबी धर्मशास्त्रांतही लिहिलेल्या नाहीत त्या बाबी धार्मिक बनवण्याचा अट्टाहास हे प्रतिगामत्वच होते. पानिपत युद्ध प्रसंगी बळवंतराव मेहंद्ळ्यांच्या पत्नीचे सती जाण्याचे उदात्तीकरण करुन वर्तमानातील साहित्तिकाने सांगणे/लिहिणे हेही प्रतिगामत्वच होते. या प्रतिगामत्वाचा वारसा आपण नुसता जपलाच नाही तर त्याला नवीन आधुनिक आयाम देत फोफावत नेत आहोत याचे भान आपल्या समाजाला नाही.

अर्थव्यवस्थेने निर्माण केलेले प्रतिगामत्व

अर्थव्यवस्था हीसुद्धा एक प्रतिगामित्वाची कारणीभुत सत्ता बनली. या अंधयुगात बलुतेदारी प्रथा व वेठबिगारी सम्स्था निर्माण झाल्या. बलुतेदारी प्रथा सर्वस्वी अन्न्याय्य आणि तत्कालीन प्रागतिकतेला फार मोठा अडथळा बनणारी ठरली. अर्थव्यवस्थेचा पहिला नियम असतो तो हा कि निर्मिती करणा-यास वा सेवा देणा-यास, आपले द्न्यान/कुशलता आपापल्या क्षेत्रात वापरत समाजोपयोगी वस्तु/पदार्थ बनवणा-यास त्याच्या श्रमाचा उचित मोबदला, तोही विक्रेता ठरवेल त्यानुसार मिळायला हवा. बलुतेदारीत हे असंभाव्य झाले. बलुत हा हक्क नव्हे तर भीक बनली. वास्तव मोबदल्याशी नाळ तुटली. त्यामुळे तत्पुर्वी भारतात जी नवनवी संशोधने होत होती, कौशल्यांना वाढवण्याची प्रेरणा मिळत होती वास्तव समस्यांना सोडवण्यासाठी उत्तरे शोधण्याची, प्रयोग करण्याची जी परंपरा होती तीही संपली. शेतीविषयक संशोधनात्मक ग्रंथ एके काळी लिहिले जात होते पण पराशरानंतर अभावानेच त्याबाबत नवीन संशोधन झालेले दिसते.
वेठबिगारी हा प्रतिगामी महाराष्ट्राचा एक चेहरा होता. आज त्याचे स्वरुप बदलले आहे एवढेच. कुशल सेवांचे एक मुल्य असते हा मुळ अर्थशास्त्रीय सिद्धांत या वेठीने पुरता धुडकावून लावला. या वेठीवर सुतार, गवंडी, लोहार, पाथरवट ते महार-मांग शासनांनी राबवुन घेतले. या प्रथेबाबत कोणी सहसा बोलत नाही, कारण ही वेठ व्यवस्था ब्राह्मणांनी नव्हे तर सत्ताधारी समाजाने निर्माण केली. सत्तेचा अंकुश निरंकुशपणे वापरला गेला. त्यामुळे समाजाची आर्थिक प्रगती ज्या प्रमाणात व्हायला हवी होती ती झाली नाही...त्याचीच परिणती म्हणजे समाजाची क्रयक्षमता कमी होणे आणि एकुणातील अर्थव्यवस्थेचा बळी घेणे. बरे या काळातील कररचना/सारापद्धती (शिवकाळातील अपवादात्मक भाग सोडला तर) लुटारुपणाचे हद्दच होती. जित सरदार/सत्ता ज्या खंडण्या लादायचे त्याची वसुली अंतता: प्रजेकडुनच स्वकीय शासक करत. यात आहे त्या विपन्नावस्थेतील प्रजेची केवढे ससेहोलपट होत असेल याची कल्पना आपण करू शकतो.
खरे तर हा साराच मध्यकाळ हा लुटालुटीचा काळ आहे. त्यातुन अपवाद म्हणता येईल असा एकही नाही. येथील जितांनी अन्य प्रांतांच्या लुटी केल्या/खंडण्या वसुल केल्या वा उलटे घदले...पण कोठलाही असो, समाज या आपत्तीतुन सुटला नाही, वा आपल्या जेत्यांनी लुट आणली/खंडण्या आणल्या त्याचा प्रत्यक्ष अर्थशास्त्रीय लाभ येथील जनतेला झालेला नाही.
सातवाहन काळी ते पार राष्ट्रकुट काळापर्यंत शहरोशहरी प्रत्येक जातींच्या श्रेण्या असत. त्यांचे काम आताच्या पतपेढ्यांप्रमाणे तसेच खरेदी-विक्रीतील माध्यमासारखे असे. प्रत्येक व्यावसायिक जात आपापला माल ठिकठिकाणी विकत असे. त्यातुन अर्थव्यवस्थेची सम्म्रुद्ध वाढ होत होती. त्यातुन मराठी जनतेला संपन्नतेचा अर्थ समजत होता. कररचना अत्यंत सौम्य होती. पुढे ही व्यवस्था अल्पांशाने व फक्त अत्यंत मुल्ल्यवर्धीत मालापर्यंत सीमित झाली. अर्थव्यवस्थेचा इतिहास पुरता पुसला गेला आणि तो उरला फक्त युद्धांचा इतिहास. त्यातील हारजीता, पराक्रम, वीरोन्मेष वाचायला लोकांना खुप आवडते, पण समाज हे या सर्वांचे अधिष्ठानच नव्हते याला काय म्हणायचे? युद्धे होतात ती लोकांच्या/स्वकीयांच्या रक्षणासाठी, त्यांच्या स्थैर्यपुर्ण जीवनासाठी...हा मुलभुत गाभा या काळात हरपला होता...एवतेव...हा प्रतिगात्मकतेचा एक आविष्कारच होता.
मग या परिवर्तनाच्या काळात असंख्य व्यावसायिकांना दिवाळे काढावे लागले नसेल तरच नवल. गावातला ब्राह्मण काय आणि महार काय कमीअधिक प्रमानात या व्यवस्थेचा शिकार झाला. वेठबिगारीने त्यावर कळस चढवला. दारिद्र्य वाढत गेले कि मनुष्य दैववादी बनतो. स्व-प्रयत्नांवरील विश्वास उठतो. सारे काही नशीबावर ढकलण्याची व्रुत्ती बनते. जगण्याचा संघर्ष सर्वोच्च प्राथमिकता बनते....अणि ती एका परीने ईश्वरी क्रुपा बनते. मानवी प्रयत्नांना स्थान रहातच नाही. "ठेविले अनंते तैसेची रहावे..." असा मित्थ्यावाद जन्माला येतो. प्रयत्नवाद नव्हे तर दैववाद बोकाळतो. याला धर्म नव्हे तर एकुणातील व्यवस्था जबाबदार असते. सारी पापे धर्मावर ढकलुन उपयोग बसतो.
महाराष्ट्री समाज या समाजमानसशास्त्रीय संक्रमणातुन गेला आहे. आणि असे संक्रमण सहसा पुरोगामी नसते तर प्रतिगामी असते.
ते अशासाठी कि आर्थिक स्त्रोतांच्या अभावी मनुष्य जे काही उपलब्ध होते ते समाधानी होवून त्यातच चरितार्थ चालवावा ही मन:स्थीति नकळत बनते. परलोकवादाचा पगडा अशा स्थीतित वाढत जातो. आजही मनुष्य या मुलभुत प्रतिक्रियेच्या बाहेर पडलेला नाही. अमेरिकेत मंदी आला तर रविवारी चर्चला जाणा-यांची संख्या अभुतपुर्व वाढली होती आणि आहे यात सारे काही आले.
बलुतेदारी आणि वेठबिगारी ही (मी महाराष्ट्रापुरतेच लेखन सीमित ठेवत असल्याने) महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचाच बळी घेवुन थांबली नाही तर प्रागतिकता संपवुनच थांबली. समाज नुसता श्रद्धाळु नव्हे तर अंधश्र्द्धाळु बनत गेला. तो प्रतिगामी होत गेला. याच काळात स्त्रीयांची महत्ता संपली. ती अगदी ब्राह्मणी असली तरी शुद्र ठरली. आपल्या नैराश्याचे बळी प्रथम स्त्रीयाच होतात. आपले नैराश्य त्यांच्यावर काढणे सुलभ असल्याने धर्मनियंते काय आणि त्याच नैराश्यात जगणारे सामान्य काय...स्त्रीयांना सर्वस्वी सर्व पापांचे कारण ठरविण्यात सहज यशस्वी झाले यात नवल नाही.
परंतु यात तत्कालीन समाज अधिकाधिक विवाह करणे, पोसता येता येनार नाही एवढे पोरांचे लेंढार वाढवणे यात कमी नव्हताच. एकपत्नीत्वाची रामायणक्रुत ग्वाही तत्कालीन पुराणीक/किर्तनकार देत नसतील असे नाही...पण त्याचे अनुकरण अभावानेच आणि तेही मानसिकतेला परवडत नसल्याने झालेले असेल. खुप पोरे रोगरायांनी मरत असतील म्हणुन वा वंशाला दिवा असावा म्हणुन अधिकाधिक संतती होत होती एवढे म्हनणे पुरेसे नाही...खरे तर स्त्रीभोगेच्छा, तेही तिचे स्वातंत्र्य नाकारत वाढत गेली हेही या प्रतिगामीत्वाचे कारण आहे.
ते कसे? प्रश्न स्वाभाविक आहे. मानसशास्त्र सांगते कि मानवी समाज जेंव्हा पराभुत मनोवस्थेत येतो तेंव्हा तो सर्वप्रथम आपल्याच सोप्या, सहजप्राप्य लोकांवर अत्याचार करायला प्रेरीत होतो. स्त्रीया त्यातीलच एक अत्याचारित घटक बनल्या. महार/मांग/पारधी/रामोशी....असे समाजातील त्यांनीच ठरवलेले त्याज्ज्य आणि आता पुर्वी होते तसे उपयुक्त न ठरणारे घटक त्यांच्या मनोविक्रुत रोषाला बळी पडले. त्यातुनच कालौघात एकामागुन एक नवे असे तत्वद्न्यान प्रस्रुत होत गेले. आणि ते क्रमशा: प्रतिगामी बनत गेले. आणि दुर्दैव असे कि त्याचा प्रतिकार करनारे समाजात अभावानेच उरले असे आपण द्न्यात इतिहासातुन पाहु शकतो.

म्लेच्छांची सेवा करणे हे काही धर्माने मान्य केलेले नव्हते. कलियुगी भारतावर म्लेंछ राज्य करणार ही भविष्यवानी पुराणांनी केली हे खरे पण एकाही पुराणाची रचना मुळात इसपु. २०० पुर्वी झालेलीच नाहीहे. कलिवर्ज्य प्रकरण समजा इसपु ३००१ मद्धे आले असेल तर तदनंतर जवळपास ४००० हजार वर्षांनी ते प्रकरण प्रत्यक्षात कसे लागु झाले बरे? कलियुगाची सुरवात आजचीही ज्योतीश्बास्कर देतातच कि नाही त्यांच्या क्यलेडरमद्धे? पण हे कलिवर्ज्य प्रकरण भारतीय समाजाने इसच्या पहिल्या सहस्त्रकात तरी स्वीकारलेले दिसत नाही. म्हणजे ती लबाडीच होती. किंवा इस्लामी सतांना येथे सुखनैव राज्य करता यावे यासाठी ही तत्वधारा प्रस्रुत केली गेली. हे पाप कोणाचे यावर सहसा चर्चा होत नाही, पण या निमित्ताने तीही व्हावी ही अपेक्षा. पुराणे ही पुरातन नव्हेत तर त्यांत कालौघात १८ व्या शतकापर्यंत भर पडत गेली आहे हे तर आता सिद्धच आहे. म्हणजे मग म्लेच्छांची सेवा कोठुन आली? तेच राज्य करणार अशी सर्वसमाजावर प्रभाव टाकणारी भविष्यवाणी कोठुन आली?
त्यामागे कोणते धर्मकारण होते?
त्यामागे कोणते राजकारण होते?
आणि गावोगावचा ब्राह्मण असो कि कथित क्षत्रीय....या भविष्यवाणीला बळी पडला कि नाही?
प्रश्न महत्वाचे आहेत आणि त्याकडे नीट लक्ष द्यायला हवे.
येथे प्रश्न आहे एके काळी पुरोगामी असणारा, अगदी कथित शुद्रांनाही शेकडो वर्ष सत्ता गाजवू देणारा, जगानेही तोंडात बोटे घालवीत अशा कलाक्रुती/शैलग्रुहे/शिल्पाक्रुती निर्माण करणारा पहिल्या सहस्त्रकातील महाराष्ट्र एवढा प्रतिगामी कसा झाला? सामाजिक अन्यायाच्या परिसीमा त्याने कशा बिनदिक्कतपणे ओलांडल्या?
मला वाटते वरील मी आधीच केलेले विवेचन त्यासाठी वाचकांस विचारप्रेरीत करेल.

(kramasha:)

Saturday, August 20, 2011

चळवळ समतेसाठी आहे...नव्या मनुवादासाठी नाही!

प्रा. हरी नरके यांच्या लोकप्रभा साप्ताहिकातील क्रमश: प्रकाशित झालेल्या २ लेखांवर श्री. भैय्या पाटील यानी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावरची ही माझी प्रति-प्रतिक्रिया:

सर्वप्रथम, श्री. पाटील यांनी नमुद केल्याप्रमाने, जर हरी नरके यांचे लेखन संदर्भ सोडुन बाष्कळ, द्वेषमुलक आणि थिल्लर असेल तर एका मोठ्या संघटनेच्या महत्वाच्या पदाधिका-याने त्याची दखल घेवून प्रत्युत्तर का द्यावे? (खरे तर प्रा. नरके यांचे लेखन हे खेडेकरांच्या विचारधारेशी संबंधित असल्याने त्यावर त्यांनीच प्रतिक्रिया देणे योग्य ठरले असते.) हरी नरके यांनी बामसेफ़ आणि मराठा सेवा संघाला सोडले आणि लगोलग ब्राह्मनी छावणीने त्यांना (ते बेअक्कल असल्याने आणि नरकेंनी त्यांच्यावर किती टीका केली आहे आणि करत आहेत तिकडे दुर्लक्ष करुन... त्याला बेदखल ठरवुन) लगोलग पदरात घेतले असेही सुचवले आहे त्यांनी. परंतु मग त्यांना सामाजिक जातीय तिढा अद्याप समजलेला नाही असे नाईलाजाने म्हणावे लागते. दुसरे असे कि खेडेकर साहेबांना जसा हवे ते लिहिण्याचा अधिकार आहे तसाच आणि तेवढाच अधिकार त्यांच्या वा अन्य कोणाच्याही लेखनावर टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. तो जर नरकेंनी बजावला असेल तर त्यावरही टीका करण्याचा आपणास अधिकार आहे आणि तो आपण बजावला आहे. परंतु यात मुळ वादाचे केंद्रबिंदू बदलवण्याचा प्रयत्न नाही काय? मुळ टीका ही खेडेकरांच्या जातीयवादी भुमिकेबाबत आणि वंशसंहाराला उत्तेजन दिले आहे त्याबाबत आहे. त्याबाबत श्री. पाटील यांनी मौन पाळुन अप्रत्यक्षरित्या समर्थनच केले आहे असे दिसते.

प्रा. नरके यांनी बामसेफ व मराठा सेवा संघाची साथ सोडली. मला असे वाटते कि आपण ज्यांच्यासाठी, ज्यांच्या कल्याणासाठी बुद्धी राबवत आहोत त्यांचे छुपे हेतु वेगळेच आहेत हे समजले तर विवेकी भुमिका घेत दुर जाणे योग्य कि मेंदू विकुन आहे तेथेच ठिय्या मांडणे योग्य? शाम सातपुते हे संघ स्वयंसेवक आहेत, भा.ज.प. चे नगरसेवक होते हे लक्षात आणुन दिल्याबद्दल त्यांचे आभार. पण मग हाच न्याय आपल्याबाबत लावला तर? म्हणजे आपण स्वत: एके काळी संघाचे स्वयंसेवक होता आणि आता नाही...हे आपल्यातील वैचारिक परिवर्तनच नव्हे काय? प्रा. नरकेंना आपण मोठे केलेत कि त्यांनीच तुम्हाला मोठे केले याबद्दलही विधान केले असते तर बरे झाले असते.

पुढचे असे कि, दादोजी कोंडदेवाचे सत्य स्वरुप समोर आणले कि पुरोगामी आणि वाघ्या कुत्र्याबद्दल लिहिले तर प्रतिगामी...(मुलनिवासी नायकमधील लेख...बातम्या) हा कसला न्याय आहे? आपण नरकेंच्या गार्गी ते सावित्री या गाजवलेल्या भाषणाबद्दल लिहिले आहे. महावीर सांगलीकर व मी या भाषणाला उपस्थित होतो. खरे तर कोणाही बहुजनीयाला अभिमान वाटेल असे ते भाषण होते. गार्गी-मैत्रेयीबद्दल (आणि त्या दोघीही बहुजनीयच होत्या हे आपणास माहित नाही हे आपले दुर्दैवच नव्हे काय?) ते जेम्तेम ५-१० वाक्ये बोलले आणि नंतर अगदि झाशीच्या राणीवरही, केसरीकारांवरही यथायोग्य टीका करत त्यांनी सावित्रीबाईंची महत्ता सिद्ध केली. आपण या भाषणाला उपस्थित नव्हता. मी आणि सांगलीकर होतो. पण हे भाषण भांडारकरमद्धे झाले याबाबतच रोष आहे. तेही कसलीही माहिती नसता. एक जातीविशिष्ट चष्मा घातला कि जे होते तेच आपण केले आहे. नरकेंनी पुर्वी लेन प्रकरणी भांडारकर संस्थेवर संतप्त टीका केली हे आपले म्हणने मान्य करत मी विचारतो कि दोष संस्थेचा असतो कि त्यात कार्य करणा-या लोकांचा? आणि त्या संस्थेतील नेमका कोण दोषी होता हे आजतागायत आपणास उमगले नसता त्याची जाण होवून त्या संस्थेतच विधीवत मार्गाने जावून बहुजनीय विद्वत्तेची महत्ता वाढवणे, त्यात सहभागी होत बहुजनोपयोगी संशोधन योग्य कि त्या संस्थांपासुन फटकुन राहणे योग्य?

आणि श्री. भैय्या पाटील...बाबासाहेबांनीच आम्हाला (बहुदा तुम्ही अनुपस्थित अस्सावेत) शिकवले आहे कि प्रत्येक भारतीय नागरिकाला समान दर्जा आहे...मग तो कोणत्याही जात/धर्म/वर्गीय असो. ब्राह्मणांचा विरोध करायचे म्हणजे नेमके काय हे आपण आम्हाला शिकवावे. त्यांना कसे जाळुन-कापुन मारायचे हेही सांगितले असते तर बरे झाले असते. एखाद्या जातीचे वा विचारधर्माचे लोक ठार मारले म्हनजे तो विचार संपतो हा अलौकिक विचार आपली संघटना मांडत आहे याबद्दल आपले अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. कारण आपण म्हणता ते वास्तवात आणायचे असेल तर सर्वप्रथम घटना दुर्लक्षित करावी लागेल. बाबासाहेबांचे नाव घेता कामा नये. गतैतिहासात धर्मपुरोहित ते सत्ताधा-यांनी जीही काही पापे केली त्याबद्दल फक्त धर्मपुरोहितांबाबत बोलावे...सत्ताधारी मात्र वगळावेत असे तात्विक/बौद्धिक आरक्षण आपणास हवे आहे असे दिसते...म्हनजे इतरांनी आपल्या न्याय्य हकांबाबत बोलले तर ते मात्र भटाळले...आणि तुम्ही म्हणता तसे वागले...बोलले तर मात्र बहुजनीय हा खाक्या कसा चालेल? चालणार नाही...चालत नाही याची जाण आल्याने हा आपला उद्रेक आहे. माझी आपणास संपुर्ण सहानुभुती आहे. जेवढा असा उद्रेक आपण वाढवत रहाल तेवढेच बहुजन शहाणे होत जातील. तुम्ही बदला हे सांगायचा अधिकार अर्थातच मला वा कोणाला नाही...तुम्ही सर्वोपरी आहात...श्रेष्ठ आहात...शत्क्तिशाली आहात हे माहितच आहे. तुम्ही म्हणाल तो इतिहास...बाकी सारी बकवास....हे आपले धेयवाक्यही मी तरी माझ्य ह्रुदयात कोरुन ठेवले आहे. पण फक्त प्रतिवाद करता येतील असे ऐतिहासिक प्रश्न उपस्थित करा ही विनंती.

आणि एकच सांगतो...ज्यांनी खरा इतिहास घडवला...देशाचे पुरातन काळापासुन अर्थशास्त्र...विद्न्यान सांभाळले, गावगाड्यातील चौकटीत का होईना संस्क्रुती वर्धिष्णु ठेवत, सेवा संस्क्रुतीही देवुन याच समाजाला सर्वार्थाने बळ दिले आणि संस्क्रुती निर्माण केली त्यांना आम्ही वारंवार अभिवादन करतो. ज्यांनी फक्त राजकीय फायद्यांसाठी, अगदी शिवाजी महाराजांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि फक्त निर्माणकर्त्यांकडुन खंडन्या वसुल करण्यात धन्यता मानली...आजही मानत आहेत त्यांना सुचवू इछ्छितो कि हे पुढे भविष्यात चालनार नाही...तुमचे जाणते...अजाणते नेते...जाणते राजे...यांनी इतिहास पाजळावा तेवढा पाजळावा...पण गरीब शेतकर-यांच्या छातीत वर्तमानात गोळ्या माराव्यात? स्वता:ला काय परमेश्वर समजतात कि काय? त्याबद्दल तोंड उघडले असते तर बरे झाले असते.

आपले म्हनने आहे कि बहुजनीय स्त्रीयांची पराकोटीची बदनामी ब्राह्मणांनी केली आहे. कोणत्या पुराणात काय नेमके लिहिले आहे याचे संदर्भ न देता (जणू काही कोणीच पुराणे वाचलेच नाहित असा आव आणत) बेधडक विधाने करणे हे काही योग्य नाही. धर्मांमधील सांकेतिकता आणि त्यांचे होणारे कथात्मक रुप हे समजलेले दिसत नाही म्हणुन हा व्रुथारोप आहे. ब्राह्मणांनी ब्रह्मदेवाने आपल्याच मुलीवर कुद्रुष्टी टाकल्याची कथा लिहिली म्हणुन त्याला "बेटीचोद" म्हणता...आणि क्षत्रिय स्त्रीयांनी परशुरामाने प्रुथ्वी नि:क्षत्रीय केल्याने ब्राह्मणांपासुन संतती पैदा केली असे त्यांनीच लिहिले म्हणुन त्यांना बहुजन द्रोही...स्त्रीयांची असह्य बदनामी केली असे म्हनता...पण मुळात या कथांत तार्किकता नाही...इतिहास नाही... परशुरामाचे खरे स्वरुप आहे त्याच पौराणिक इतिहासातुन समजावुन घ्यायचे नाही असे कसे चालेल? दास विश्रामधाममधील (अगदी रामदासांचेही) अत्यंत अनैतिक, ब्राह्मण श्रेश्ठत्वाचे अहंगंडयुक्त लेखन हे निषेधार्हच आहे आणि त्याचा विरोध व्हायलाच हवा. पण हे लोक आजचा समाज चालवतात असे आपणास का वाटते हे समजत नाही. (आपण अर्थात या बाबींचा उल्लेख केलेला नाही.) आणि त्यांनी काही शतकांपुर्वी असे लेखन केले त्याचा बदला आजच्या वर्तमानात कसा घेवू शकता? जे चुक आहे ते पुराव्यांनीशी उघड करणे हे श्रेय कि उगाचच कसलाही संदर्भ न देता खेडेकरांच्या लेखनाचे अंध समर्थन करणे योग्य?

आपण सारेच एका प्रदिर्घ युद्धाचे सहभागी घटक आहोत. हे एक सांस्क्रुतिक युद्ध आहे. या युद्धाचा जय वा पराजय हा केवळ आपल्या बौद्धिक पात्रतेवरच ठरणार आहे...कोण अभिजन कोण बहुजन याचा निकालही यावरच अवलंबुन आहे. संस्क्रुती घडवतो तो अभिजन आणि त्याचे अनुसरन करतो तो बहुजन अशी खरी व्याख्या आहे. जर आपणा सर्वांना संस्क्रुतीचे पुनर्निर्माण करायचे असेल, गतकाळात जे गमावले ते परत प्राप्त करायचे असेल तर आपला समग्र द्रुष्टीकोन बदलायला हवा. आपण व्यक्तीवर टीका करत आहोत कि प्रव्रुत्तीवर याचाही विचार करायला हवा. या लेखात जीही काही टीका आहे ती स्वागतार्ह असली तरी ती व्यक्तिगत आहे, नरकेंनी त्यांची साथ सोडली, मराठा आरक्षणाला विरोध केला म्हणुन वगैरे...हे यामुळे समाजाला तरी समजले हे या लेखाचे फलित आहेच. प्रा. नरके यांनी त्यांच्या लेखांत खेडेकरसाहेबांच्या साहित्याची समीक्षा केली आहे आणि कोणताही समिक्षक समिक्षा करतांना मुळ लेखकाच्या लेखनातील समिक्षार्ह भाग अवतरणांत देतो तसा दिलेला आहे. खेडेकरांचे साहित्य योग्यच आहे असा श्री. भैय्या पाटील यांचा विश्वास असल्याने व तो त्यांनी उपरोक्त लेखात व्यक्त केला असल्याने, व त्याबाबत मुळ लेखकास कसलाही खेद नसल्याचे व्यक्त केले असल्याने मग प्रश्न हा निर्माण होतो कि मग हे प्रत्युत्तर मुळात आहे कशासाठी? समिक्षेची समिक्षा डा. आ. ह. साळुंखे यांनी एकदा फार विद्वत्तापुर्वक केली होती. तशी समिक्षा करायला आणि मुळ लेखकाचे म्हनने योग्यच आहे हे सिद्ध करायला हरकत नाही...किंबहुना तेच अभिप्रेत होते. परंतु नरके कसे भटाळले आहेत, त्यांच्या भुमिकेत कसा बदल झाला आहे, त्यंनी खाकी चड्डी कशी घातली आहे वगैरे...वगैरे...सांगत नरकेंचे व्यक्तिगत शिर्कान करणे हा जर या लेखाचा हेतु असेल तर तो योग्य आहे काय? प्रतिपक्षाला छोटा दाखवून, बदनाम करुन आपण मोठे होत नसतो. मुलनिवासी नायक हा पेपर (?) आणि त्यांचे विद्वान संपादक गेली ८-९ महिने असाच द्वेषाचा गर्भ वाढवत आहेत. त्याचे पतन...अध:पतन होईल तेंव्हा होवो वा गांधारीप्रमाणे १०१ "आदर्श" प्रसवो...त्याची खंत कोणाला असल्याचे दिसत नाही.

परत सांगतो कि जसे ब्राह्मणच ब्राह्मणांचे शत्रु आहेत असे मी वारंवार स्पष्ट करत आलो आहे...तसेच बहुजनच बहुजनांचे शत्रु आहेत हे विलास खरात ते स्वत:ला बहुजनीय च्गलवळीचे कार्यकर्ते समजणारे, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले कथित विचारवंत चळवळीचे शत्रु आहेत कारण त्यांच्यात आपल्याच विचारवंतांना, त्यांच्या वैचारिक अधिष्ठानाला...मान्य करण्याची, मुक्तद्वार देण्याची, त्यांच्याशी वैचारिक लढा देण्याची क्षमता नाही. काही आडमुठे ब्राह्मण स्वता:ला सावरकरवादी/नथुरामवादी/सनातन प्रभात वादी समजत एक ब्राह्मण माहात्म्याचा जयघोष करत एक रोष निर्माण करत आहेत तसेच...आणि त्याहीपेक्षा भयंकर क्रुत्य करायला/विधाने आपण करीत आहात....म्हणुन चळवळींचा म्रुत्यु होतो तो असा. सारे विचारवंत या चळवळीपासुन दुर का पळत आहेत त्याचे कारण यात आहे. हुकुमशाही कोणालाही मान्य असु शकत नाही...ज्यांना मान्य आहे त्यांनी बहुजनीय चळवळीत राहिले काय आणि समाजद्रोही संघटनांत राहिले काय...फलित एकच आहे. चळवळ समतेसाठी आहे...नव्या विषमतेसाठी नाही...नव्या मनुवादासाठी नाही हे क्रुपया लक्षात घ्यावे.


Wednesday, August 17, 2011

If we really are up against corruption….





Let’s assume we all the citizens of India really are up against corruption what really we can do to stop corruption at every level?

1. Don’t give any un-official cash donation to any school/college. If they demand so lodge complaints in writing to the authorities in unison. Follow-up the matter and pursue till the action taken.
2. Do not pay bribe to anyone…if demanded follow the above mentioned line of the action.
3. Do not vote anyone having criminal or corrupt background. Create awareness among common poor people not to accept money for vote. Lodge complaints as much as possible if you hear/see or sure that this or that slum/village has been paid for votes with the election commission. Ensure the matter is investigated.
4. Ensure that the cases pending in the courts about corruption are followed up with higher courts to ensure speedy trials and assist/support witnesses so that they are not threatened as easily as it happens now to change their testimony.
5. make small committees in every area of police jurisdiction, make it a point that at least the committee visits police station, at least for an hour, to observe the status of pending cases under investigation and that the police forces are doing duty in highest possible fair manner. Keep changing members of the committee periodically so that they are not bribed by the police to remain silent.
6. Ensure that if any civil work pending or created unnecessarily is complained for and followed up till either it is completed or stopped. Don’t see the face of your corporators /MLA’s /MP’s at the time of election…keep on meeting them periodically to establish dialogue about civic problems, remedies and ensuring implementations.
7. Always be informed of huge civil or other contracts and the process or conditions under which they are allotted/approved …and ensure that you get the information under RTI. If (don’t go by media hype ever) you find something is amiss or over costing, lodge protests. If needs be complain with the right authorities and forums and follow them up still they are not sized down to realistic values.
8. Keep watch on the people in neighborhood those are spending beyond their actual income abilities, may it be on birthdays/marriages or social functions….and send complaints to the Income tax authorities.
9. Keep an eye on the NGO’s you may come across, try find who are their financers, of Indian Origin or abroad, what really is their actual contribution in the field of their specific field of operation and if not satisfied lodge protests with appropriate authorities…such as Dharmaday Aayukta where they are registered and controlled by.
10. Be yourself a vigilant police. Keep an eye on newcomers in the society you are living in, be careful about neighborhood…you might spot some terrorist….

And most importantly we should decide that neither I am going to pay any bribe nor going to accept it.

This is what all of us can do. Many people have really and successfully done it. Right to Information is a weapon we already have. What we need is just give one hours time every week and Rs. 100/- every year to spend on any issue that might come across you to bring back the system in real fair motion. We have power enough to stop this if we all are really determined to stop this evil. We cannot and should not depend on any agency, no matter Lokpal or janlokpal to look after our own problems and evils. Asking for such things does only mean that we are still not ready to take any civil responsibility.

Hey friends…what do you think?





Tuesday, August 16, 2011

...त्यासाठी एकाही नव्या कायद्याची वा लोकपालाची गरज नाही..

जोवर स्वत:चे काम होत आहे तोवर कोणी कोणाला भ्रष्ट वाटत नाही. भ्रष्टाचार हा आपल्या ख-या योग्यतेपेक्षा अधिक उच्च जीवनमान हवे या हव्यासापोटी जसा सुरु होतो तसाच व्यवस्थेमुळे भ्रष्टाचार करने अपरिहार्य ठरते म्हणुनही होतो. भ्रष्टाचाराला खरा विरोध करणारे नीतिमान या देशात नुसते अव्यवहारी ठरत नाहीत तर तेच खोट्या आरोपांत अडकवले जाउन संपवले जातात. अनेकांचे खुन झालेले आपण पाहिलेले आहे. यामुळेच कि काय असंख्य नागरिक या व्यवस्थेच्या विरोधात असुनही गप्प आहेत. सध्याचा उद्रेक हा भारतीय जनमानसाला भ्रष्टाचाराचा तिटकारा वाटतो म्हणुन आहे कि भावनोद्रेकित फ़्याशन म्हणुन आहे यावर विचार करावा लागतो. जनलोकपालपेक्षा भ्रष्टाचाराच्या केसेस साठी स्वतंत्र द्रुदगती न्यायालये असावीत हा आग्रह योग्य नाही काय? भ्रष्टाचारविरोधी अम्मलबजावणी खाते (anti corruption beuro) अधिक शक्तिशाली करण्यासाठी काय करता येइल? भ्रष्टाचार झाल्यानंतर कारवाई हवी कि मुळात तो होणारच नाही यासाठीची समाजमानसिकता बनवायला हवी? लहानपणापासुन मुलांवर संस्कार होतात ते भ्रष्ट आचरणाचे...बनवणुकिचे, लबाडीचे....याला जबाबदार असनारे पालक दोषी नाहीत काय? कि सारे नैतीक आहेत आणि नियुक्त प्रतिनिधी आणि सरकारी कर्मचारीच तेवढे भ्रष्ट आहेत? खाजगी क्षेत्रातील भ्रष्टाचार (कर्मचारी स्तरावरचा) केवढ्या धोकेदायक पातळीवर जावून पोहोचला आहे याचे द्न्यान व भान सर्वांना आहेच. उच्च स्तरावरील तर विचारायलाच नको. आज नळस्टोप चौकात एकीकडे "मी अण्णा हजारे आहे" अशा टोपीवाल्यांचे आंदोलन सुरु आणि समोर मी पहातोय कि ट्राफिक पोलिस पैसे जमा करतोय....हा विरोधाभास ही आपल्या सामाजिक स्वास्थ्याची विडंबना नव्हे काय? कलमाडी पुढच्या निवडनुकिपर्यंत जरी आत राहिले, त्यांना पक्षाने तिकिट दिले नाही तरी ते तुरुंगातुन उभे राहुन निवडुन येवू शकतात....६०० कोटी खर्च केले कि झाले...पुढच्या ६००० कोटींची तर्तुद पक्की. पुण्यातील गुंड नगरसेवक म्हणुन निवडुन येतात...त्यांचे काय वाकडे झाले आहे? वाकडे झाले नाही याला न्यायसंस्था जबाबदार नसून पैसे घेवून वा दमदाटीला घाबरुन साक्षी बदलनारे आपलेच समाजबांधव जबाबदार नाहीत काय?

कोनत्याही सुसंस्क्रुत समाजात कायद्यांची/नियंत्रनांची गरज कमी कमी होत जाते. जो समाजच भ्रष्ट आहे त्यालाच अधिकाधिक कायद्यांची आणि नियंत्रणांची गरज भासते...आणि अशी नियंत्रणे हवीत यासाठी जेंव्हा आंदोलने होतात त्याचा एकच अर्थ असतो तो हा कि आपण असंस्क्रुतीचीही मर्यादा ओलांडली आहे. आपण मुक्त स्वतंत्र समाजाकडे वाटचाल करत नसून एका बंधित, अधिक नीतिभ्रष्टतेकडे वाटचाल करत आहोत.

मी अण्णांच्या विरोधात नाही. तेवढी माझी योग्यताही नाही. (जे त्यांचे कर्तुत्व पहायचे ते मी १७-१८ वर्षांचा असतांनाच पाहिले आहे....आणि नंतर १९९८ साली त्याचा पुनर्प्रत्यय घेतला आहे.) आज सरकारने त्यांना अटक केली हे निषेधार्हच आहे. याची प्रतिफळे या पक्षाला वाईट मिळतील याचीही शक्यता विरोधी पक्षच जवळपास आस्तित्वहीन आणि भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याची नैतीकता हरवून बसला असल्याने दिसत नाही.

भ्रष्टाचार नको आहे. पण तो आपणच थांबवु शकतो...त्यासाठी एकाही नव्या कायद्याची वा लोकपालाची गरज नाही...माहितीचा अधिकार हे शस्त्र आपल्या हाती अण्णांनीच दिले आहे...त्याचा दुरुपयोग करणा-या शक्तींना विरोध करत त्याचाच चांगला उपयोग करुयात.

Monday, August 15, 2011

SPACE STRESS THEORY & CREATION OF THE UNIVERSE (2)

Why Space essentially is only element?

Before I touch to the very subject, why the present theories have severe discrepancies in providing ultimate complete model of the universe that can explain everything, let me begin with the very Space…and why it has to be the only element that has become the present universe.

We have to look at the facts about the space.

1. Space, though finite, almost impossible to measure to its accuracy, with the present theories.
2. Even within the matter (i.e. atom) it is moreover the Space.
3. Quantum mechanics and field theory accepts that the matter someway modifies the space around it.
4. Space-Time curvature and its resulting to gravity have already been accepted by General Theory of Relativity.
5. hence so far accepted facts are clear that the space somehow is modified by the matter.

What is escaped?

1. The Big Bang theory considers space being abundantly available to consume rapid expansion of the universe.
2. It is conceived that the space has no role of itself in the creation of the universe.
3. Space-Time factors are considered to be together having no separate entity and qualities. This is why General Theory of Relativity holds no water in the case of Quantum Mechanics.
4. As Space is coupled with Time by the Theory in itself is a mistake as relative Time will be independent in case of every cluster, object or galaxy.
5. It is accepted in the big band theory that space can be stretched…they have given an example of a rubbery net upon which if a ball is placed and the net is stretched the distance grows though the ball is in same place. However the idea in itself unscientific as space cannot be stretched. Same time idea of balloon too is baseless.


SPACE: THE ONLY PRIMORDIAL ELEMENT

The western scientists and philosophers are moreover influenced by materialistic philosophy of the Greeks. This philosophy (even science) requires pre-presence of the matter, no matter how dense it was, to explain creation of the universe. It gives little thought or attention to the space than it really has to be given. Big Bang Theory, when Hubble experiment proved that the far away galaxies are rushing away in alarming speed gave birth to the idea that sometime in the distant past the all galaxies must be located at a single point in highly dense form along with all the forces. The originator of the theory Monsignor Georges Henri Joseph Édouard Lemaître was a Belgian priest and professor of Physics. The fact in itself proves that Lemaitre was highly influenced by the church and Pope too agreed to his theory as it suited Christian beliefs. However this theory has not been able enough to explain what force caused the very singular event of the Bang and what was the Space at that event moment that allowed highly rapid expansion of the universe in a moment after the Bang. Also it is not clear from this theory how all four forces separated from each other having entirely different qualities.

Was it any outer force that caused Bang?
Was it internal but not as yet identified force that existed within that highly condensed matter?
We get no answer here.

But, though not in clear words, the theory accepts there existed Space and Time too in some form before and after the Bang.

Thus the theories separate matter and space. Matter is pre-existent and so the space too. Now it doesn’t clarifies of what that early matter was made of and what was the source of that matter. And also of the forces those existed for unknown time in a single form. And blatantly those theories consider space to be infinite and matter finite. If their proposal, space-Time being coupled, Time too becomes infinite.


So this makes clear that there is the serious discrepancy in the Big Bang Theory (and so in Static Universe Theory & Super String Theory.) also it is overlooked that the observations made and supporting this very theory may have other explanations without hurting output of any.

Here I propose Space is finite and so the matter and force is. Matter and space are equivalent to each other. Matter and forces are nothing but the modified space-lets. The modification is owed to the imbalance caused by Space-Time fluctuation. The modification is a constant process and thus either the matter will exhibit more energy signs or decaying energy signs that we observe in the universe. This will happen only because Time and Space are separate entities and independent of each other. Time is absolute as well relative, having dual nature.

This does mean that the universe as we see it, of present or of the distant past, not necessarily mean that the far away seemingly rushing away clusters are really rushing away, as the Frame of the Time that is used for observation and the gravitational pools through which light vibrations of the particular cluster travels towards us only can be an scientifically experienced illusion. (Gravitational Lenses already do it…and is approved by the science that one can see 4 objects though it is one in reality.)

I shall write more on this in next chapter.









Sunday, August 14, 2011

SPACE STRESS THEORY & CREATION OF THE UNIVERSE (1)

I had proposed and published a new model of the universe in the year 2007 in Marathi. Since the theory was published in regional language and as readers were not comfortable with reading research papers in Marathi, now I am herewith presenting the same theory English. (Kindly bear with my English…)

There has been various attempts to theorize creation of the universe, however Theory of everything still is far away from the sight. Through this theory, I am hopeful to answer most of the questions those remain unanswered in other present theories. The observations too support this theory and clarifies event moment of the creation of the universe, gravitation, quantum field gravity, black holes, speed of the light and many other questions those has been baffling mankind even in modern era.

We will discuss this theory in next chapters in detail, however I desire here to write brief gist of the theory:


1. Unmodified, non-geometric primordial space is the only element that existed before creation of the Universe.
2. Being non Geometric and in the presence of absolute time the space was filled up with absolute negative energy.
3. The event moment is shift of absolute time to relative time begins the moment the negative energy has reached to the extreme.
4. The event moment causes distribution of the space in modified space-lets of positive & negative charges in an instant, thus forming new geometry and creating pseudo-energies such as forces (strong nuclear force, weak nuclear force, magnetism and gravitation) thus creating early particles to form primary atoms.
5. Every particle ( & atom) receives the negative space to balance additional positive forces in the particles and this force is gravitation.
6. Matter + forces =space is the universal rule.
7. positive forces in matter – Negative forces in the matter= Gravitation
8. Matter is nothing but modified space in the presence of negative and positive forces.
9. Gravitation not being original force and as it is a pseudo force created to balance extra positive energy, there cannot be black holes those are said to be caused by gravitational collapse.
10. Light cannot have the same speed while traversing through different densities of the Gravitational pools and triangles, light cannot be a medium to measure distances within the stars/constellations/galaxies. Gravitational triangle means a point where gravitation of the different objects join distorting the space-Time to make feel observer either object is coming closer or rushing away…as spectrum might show such which may not be the fact.
11. The universe will be abiding to the relative time as well as absolute time to make isotropic and homogeneous universe. There cannot be anti-matter in the universe or positive gravity.
12. As the rule Space=matter does stand, there cannot be expansion of the universe. Space will always be in the proportion with the matter, hence there wont be additional matter in relation with the space or there cannot be any additional space to consume expansion or extra matter. Hence expansion of the universe is not possible, but as speed of the light is not equal in every reference frame, it may give an illusion that universe is expanding.
13. Universe can not revolve or traverse, though the matter (modified space) may have different velocities that will traverse not in the space…but along with its specific space to form stability within instability.
14. As thus universe is created in an innate condition, and as space=matter + forces, the proportion of imbalanced (decaying) matter will be far less in the universe.
15. there cannot be any kind of extra energy (Negative or positive) to cause explosion (as described in Big bang Theory) of the matter condensed to the zero or cause crunch that is said to be caused by Gravitational collapse.


This is the theory in brief clarifies how the universe came into an existence. The theory solves greater and complex problems than any other theory that has been proposed till recently, including super string theory. This theory also eliminates Hand of the God or any accident in the creation of the universe. This theory proposes the universal laws dose not change with time as there always is co-existence of relative and absolute time.

Also, most importantly, this theory separates Space and Time, though they have co-existence from primordial state of the universe.

This theory proposes that the existence of relative Time is in presence of the geometrical universe and in absence of the geometrical universe it always is absolute Time. The limiting factors cause non-geometric space to form geometric universe because of innate separate independent values.

This theory denies existence of parallel universe or existence of antimatter in the universe.

Also this theory clarifies why the background temperature in the universe is equal everywhere, in each and every frame of the reference ( 3 K).

This theory also clarifies true nature of the heat and light. According to this theory light is neither in wave form nor in quantum form. The light is output (outcome) of the vibrated space, caused by the space-Time fluctuations within the matter….a result of constant re-adjustment of space-Time within the elements in an order to form balance in imbalance. Because of this the light exhibits dual nature…some times in wave form and some times in quantum form….if measured in different reference frames and conditions.

It is well accepted by even quantum gravitation theory that the matter modifies space around it. This does mean that the space is not a passive entity but can be modified by the qualities of the matter in different way….causing gravitation. I have taken the cue here that if matter modifies the space around it in proportion with the qualities of the matter….why it cannot be vice-versa?

If we consider nucleus of an atom is the size of a football, then the electrons revolving around would be at 2000 miles away….This does mean that there is only modified space and space only that form atoms….mostly it is space and space only , though having different qualities. The particles those have half spin (such as bosons, particle Z etc.) and having shortest span of life are none but the internal fusion of the space-Time within the body of the atom.

Here much more to come to explain every phenomenon that baffles we the mankind about the origin and present of the universe. I will be grateful to your comments, as this is the theory first time ever put forward by an Indian.

Saturday, August 6, 2011

आधी कोण? निर्माणकर्ते कि पुरोहित?

हिंदू धर्मासमोरील समस्या - ६


पुरुषसुक्त हे ऋग्वेदात प्रक्षिप्त असून ते नंतर, म्हणजे जन्माधारित वर्णव्यवस्था आकाराला आल्यानंतर ब्राह्मण वर्गाला धर्माधिकार प्रदत्त करण्यासाठी घुसवले गेले हे आपण मागील लेखात पाहिले. प्रत्यक्षात उर्वरीत ऋग्वेद कोठेही वर्णव्यवस्था असल्याचे वा ते समाजाचे अभिन्न अंग आहे असे दर्शवत नाही. परंतू पुढे वर्णव्यवस्था निर्माण करणा-यांना वर्णव्यवस्थेस वेदमान्यता आहे हे दाखवणे भाग असल्याने कोणीतरी पुरुषसुक्तात घाल-घुसड केली आहे हे स्पष्ट आहे. आणि या कथित वेदमान्यतेमुळेच या कथित हिंदू धर्मात वर्णव्यवस्था व नंतर जातीव्यवस्था जन्माधारित करणे सहज शक्य झाले, त्यात मुळ वेदकर्त्या ऋषिंचा दोष नाही.

पुरुषसुक्तानुसार ब्राह्मण सर्वात आधी निर्माण झाला व क्रमाने ईतर वर्ण निर्माण झाले असे पुरुषसुक्तातील ११ व १२ क्रमांकाच्या ऋचा सुचवतात. परंतू समाजेतिहास अगदि त्या सिद्धांताच्या विपरीत आहे. विरुद्ध आहे. अन्नसंकलक मानव जसा शिकारी मानव बनला त्या प्रदिर्घ स्थित्यंतराच्या काळात धर्म तरी होता काय? आणि असला तर तो कसा होता हे आपण आधी तपासून पाहिले पाहिजे.

यच्चयावत विश्वातील एकही धर्म एकाएकी आकाशातून पडलेला नाही. मानवी समाजाने धार्मिक संकल्पना क्रमश: विकसीत केलेल्या आहेत. जन्म आणि म्रुत्युच्या गुढाने त्याला सर्वाधिक भेडसावले असल्याने, भयभीत केले असल्याने, तेच त्याच्या प्राथमिक चिंतनाचे विषय बनणे स्वाभाविक होते. आजही त्या आदिम संवेदनांत फरक पडलेला नाही हे आपण अगदी आधुनिक तत्ववेत्त्यांच्या चिंतनातुन पाहु शकतो. आदि मानवाने प्रतिकुल निसर्गाशी संघर्ष करत असतांनाच या गुढांशी ज्या पद्धतीने वैचारीक सामना केला त्याला तोड नाही. त्याने तेंव्हाच निर्माण केलेली प्रतीके आजही अगदी नव्य धर्मही सोडु शकलेली नाहीत. कारण त्यामागे आदि-मानवाच्या पराकोटीच्या तीव्र जगण्याच्या आणि प्रतिकुलतेवर मात करण्याच्या आकांक्षा होत्या. त्याची खोली समजण्याची आज आपण क्षमता हरपून बसलो आहोत.

धर्म म्हनजे नेमके काय असते हे आपण समजावून घेउयात. धर्म म्हणजे आहे ते विश्व, परिसर, निसर्ग याच्याशी मानवी जीवनाचे तादात्म्य साधत, मानवी समाजातील परस्परसंबंध नियमीत करणारी एक सैल संस्था. धर्म म्हणजे विश्व, त्याचे निर्मितीकारण आणि आस्तित्वाचे कारण समजावून घेत मानवी जीवनाशी त्याचे साधर्म्य कल्पत जात मानवी जीवन त्या विश्वनियमांशी मेळ कसे घालेल हे पाहण्याचे, तसे प्रयत्न करण्याचे तत्वद्न्यान देणारे साधन. धर्म म्हणजे कोणत्याही मानवी घटकाला एकटे न पडू देता त्याच्या आस्तित्वाला अर्थ देणारी संस्था. ही संस्था नुसती सैल असते असे नाही तर मानवी अनुभवांत जसजशी भर पडत जाते जसजसे मानवी द्न्यान पुढे जाते, तसतसे त्यांत परिवर्तन होणे अभिप्रेत असते. ही संस्था द्रुष्य नव्हे तर भावनीक/वैचारीक पातळीवर वावरत असते. या संस्थेचा कोणी एक निर्माता नसतो तर ही संस्था सर्वच मानवी समुदायाचा एक आध्यात्मिक-सामाजिक उद्गार असतो. प्रतीके बदलली, कर्मकांड बदलले तरी सामाजिक नियम फारसे बदलत नाहेत कारण "धारणात धर्ममित्याहू..." (म्हनजे समाजाची धारणा ज्या नियमांनी होते त्याला धर्म म्हणावे.) ही युधिश्ठीरप्रणीत व्याख्याच काय ती शेवटी खरी असते. आणि शांततामय सहजीवन अपेक्षिणारे ते-ते विवक्षित समाज किमान आपापल्या समाजांपुरते तरी समाजधारणोपयोगी सिद्धांत आपसूक विकसीत करत जातात हे आपण जागतीक समाजेतिहास व धर्मेतिहासातुन पाहु शकतो. अर्थात या धारणा कालौघात बदलत असतात याचे भान ठेवावे लागते.

आदिमानवासमोरचे प्रश्न जगण्याचे होते तसेच मरण्याचेही होते. आणि त्याहीपेक्षा महत्वाचा प्रश्न होता तो वंशसातत्याचा. ही भावना मानवच नव्हे तर सर्वच प्राणिमात्रांत निसर्गत: तीव्र असते. स्त्री ही जन्मदात्री आहे हे निश्चयाने मानवाला माहित होते पण तेंव्हा "गोधर्म" (म्हणजे मुक्त लैंगिक संबंध) आस्तित्वात असल्याने पित्रुत्वात आपलाही वाटा आहे हे पुरुष समाजाला माहितच नव्हते. तो एक नैसर्गिक चमत्कार मानला जात होता. त्यामुळे मात्रुसत्ता ही पहिली समाजव्यवस्था बनली. स्त्रीत वंशसातत्त्याची एक अद्भुत शक्ती आहे ही जाणीव व अनुभवातून शक्तीपुजा सुरु झाली. आणि हे जगभर घडले. एकही मानवी समाज त्याला अपवाद नाही. योनीपुजेचे पुरातन अवशेष आजवरच्या असंख्य उत्खननांतुन सापडले आहेत. यालाच आपण शक्तिपुजा म्हनतो. शक्ति हे सर्जनाचे आणि स्त्रीत्वाचे प्रतीक होते. मानवी जनन स्त्रीच्या हाती आहे तसेच विश्वाचे जनन करणारीही कोणी महाशक्ती असनार या आदिम कल्पनेतून जगदंबेची, विश्वजननीची संकल्पना मानवी मनाने विकसीत केली. ही मानवी धर्माची पहिली पायरी होती.

आणि या स्त्रीधर्माचे पुरोहित कोण? तर त्या-त्या टोळीच्या नायिका असत. तेंव्हा स्त्रीसत्ताक पद्धतीचा कालखंड होता. सर्वात जास्त प्रसवशील स्त्रीया आपसूक नायिकेचे स्थान घेत. अर्थात हे पद वंशपरंपरागत असूच शकत नव्हते. अशी स्त्री प्रसवशील असेपर्यंत नायिका असे. तीच आदिमाया मानली जात असे. ऋग्वैदिक अदिती अशीच बहुप्रसवा होती हेही येथे लक्षात घेणे आवश्यक आहे.

पण मनुष्य जसा स्थीर झाला. शेती करू लागला. वस्त्या-वस्त्यांत विखुरला गेला तसे त्याला नवे द्न्यान झाले ते हे कि वंशसातत्यात पुरुषाचाही वाटा आहे....तसा शिव संकल्पनेचाही उद्भव झाला. तरीही स्त्रीसत्ताक आणि पुरुषसत्ताक हा सांस्क्रुतीक संघर्ष होताच. त्यामुळे दोन्ही प्रतीकांची पुजा स्वतंत्रपणेच होत होती. पुढे मात्र शिव-शक्ति हे विभक्त नसुन परस्परावलंबी आहेत या तत्वद्न्यानाप्रत मनुष्य येऊन पोहोचला आणि शिवलिंग या एकमेव प्रतीकाची निर्मिती झाली. हा आदिम धर्माचा पुढचा टप्पा होता. त्यात तत्वद्न्यानाची, पुजात्मक/यात्वात्मक कर्मकांडांची भर पडत राहीली. नाग हे पुरातन कालापासुन पुरुषलिंगाचे प्रतीक मानले गेले आहे तर वारुळ हे योनीचे. आजही नागपुजा/वारुळपुजा आस्तित्वात आहे. भुमी ही स्त्री तर पर्जन्य हे पुरुषवीर्य हे संकल्पनाही अशीच निसर्गाशी मानवी जीवनाचे तादात्म्य साधनारी होती. नांगर हा शब्दही (नांगर भूमीत घुसुन उकरुन सुफलतायुक्त बनवत असल्याने) नाग या शब्दाशी जुळलेला आहे. हे नाग प्रतीक एवढे पुरातन आहे कि आपण नगर, नागर, नागरिक हे नागदर्शक शब्द आपल्या जीवनाचे अविभाज्य भाग करुन बसलेलो आहोत याची सहसा आपल्याला जाणीवही होत नाही. कारण आपण आपल्या या धर्मनिर्मात्या आदिम पुर्वजांच्या गारुडातून आजही बाहेर आलेलो नाही.

थोडक्यात हा शिव-शक्ति प्रधान धर्म हा जगातील पुरातन धर्म होय. हा जगभरच कोठे अनुकरणातुन तर कोठे स्वतंत्रपणे विकसीत झाला. टिकुन राहीला तो फक्त भारतात. असो. याबद्दल विस्ताराने पुढे चर्चा करूयात.

वैदिक धर्माची स्थापना ईसपु २५०० च्या आसपास सरस्वती नदीच्या काठी राजा सुदासाच्या आमदनीत वशिष्ठ ऋषिच्या मार्गदर्शनाखाली अन्य ९ ऋषिकुळांनी केली. पुढे याच १० ऋषिकुळातील जवळपास ३५० ऋषिंनी ऋग्वेद रचला. हा ऋग्वेदरचनेचा कालखंड इसपु १७५० पर्यंत येतो. म्हणजे जवळपास ७००-७५० वर्षे ही रचना सुरु होती.

या धर्माची निर्मिती ज्या काळात झाली त्या कालात वैदिकजन हे स्थिर झालेले होते. ते शेती करत असले तरी पशुपालन हा त्यांचा प्रमुख व्यवसाय होता. सुतार, सुवर्णकार, कुंभार, गवंडी ई व्यवसाय करनारे लोक आस्तित्वात होतेच. युद्धकर्मात सारेच सहभाग घेत.

म्हनजेच ब्राह्मण आधी जन्माला आला आणि नंतर अन्य वर्णीय/जातीय आले असा पुरुषसुक्ताचा दावा खोटा ठरतो. खरा क्रम अगदी त्या उलट आहे हे स्पष्ट आहे. म्हणजे आधी पशुपालक मग शेतकरी, मग सुतार, मग पाथरवट, मग लोहार/ताम्रकार, मग कधी समांतर तर कधी जसे नवे मानवोपयोगी शोध लागत गेले तसे नवे व्यवसाय जन्माला आले. या काळात जोही कोणी मंत्र रचत असे त्याला ब्राह्मण म्हटले जात असे...कारण "मंत्र" या शब्दाचा ऋग्वैदिक अर्थ आहे तो म्हनजे "ब्रह्म". त्याचा वर्णाशी वा जातीशी कसलाही संबंध नव्हता. परंतु जसजसा वैदिक समाज संखेने वाढत गेला तसतसा पौरोहित्याचा व्यवसाय बनणे अपरिहार्य झाले वर त्यातुन सर्वात शेवटी ब्राह्मण या वर्णाची निर्मिती झाली. तरीही हा वर्ण जन्माधिष्ठित नव्हता हेही येथे लक्षात ठेवने आवष्यक आहे.

कोणताही मानवी समाज स्थिर तेंव्हाच होतो जेंव्हा त्याची अन्नासाठीची भतकंती थांबलेली असते. आणि हे तेंव्हाच शक्य होते जेंव्हा तो जीवनयापनासाठी स्वतंत्र शोध लावतो. पशुपालन हा त्याचा आद्य शोध असला तरी त्याने भटकंती फारशी थांबलेली नव्हती. शेतीचा शोध हा त्याला स्थिर करनारा सर्वात मोठा शोध होय. लाकडांचा उपयोग क्रुत्रीम निवारे बांधण्यासाठी होवू शकतो हा शोध ग्रामे-वस्त्या वसवण्यासाठी उपयुक्त ठरला. ते सुताराचे कार्य ठरले. आस्चर्य वाटेल पण ऋग्वेदात अन्य कोणाहीपेक्षा (ब्राह्मणापेक्षाही) सुताराला व लोहाराला अनन्यसाधारण महत्ता आहे. नौका ते रथ सुतार बनवत तर लोहार धातुकर्म ते शस्त्रे-लोहवस्तुंचे उत्पादन करत. तीच बाब कुंभार, सुवर्नकार, वीणकर व पशुपालकांना लागु होत होती. पुढे जसजसे नवे शोध लागत गेले तसतसे उद्योग व्यवसायही वाढत गेले, पण तेंव्हा मुलात एवढेच व्यवसाय विकसीत झालेले होते. ब्राह्मण श्रेष्ठ आहे असा भाव ऋग्वेदात आढळत नाही...कारण मुलात तो वर्णही नव्हता कि जातही.

पुरोहितावर्गाचा उदय हा नेहमी स्थिर समाजाच्या धार्मिक गरजांपोटी होत असतो. संस्क्रुतीचे निर्माण करणारे आपापल्या नित्य उद्योगांत जेंव्हा मग्न असतात तेंव्हा त्यांना आपल्यातुनच धार्मिक आवड/अभ्यास वा विशिष्ट धार्मिक गुण असना-यांना निवडतात व पौरोहित्याकर्माचे वातप करत असतात. कोणताही वर्ण वा जात आभाळातून एकाएकी पडलेले नसतात. आहे त्या समाजातुनच आहे त्या समाजाच्या ऐहिक/धार्मिक गरजा भागवण्यासाठी कार्य विभाजन केले गेलेले असते. ऐहिक गरजा पुर्ण करण्याचे कार्य हे निर्माणकर्तेच करत असतात. त्यांनीच जी धर्मधारा कालौघात विकसीत केलेली असते ती स्थिरत्वाच्या कालखंडात पुरोहिताहाती सोपवलेली असते.

याचाच सरळ अर्थ असा कि अन्य मुलभुत जीवनोपयोगी व्यवसाय करनारे/सेवा देणारे समाजघतक एकाच समाजातुन आधी आस्तित्वात येतात त्यानंतर पारलौकिक गरजांसाठी आवष्यक असनारा पुरोहित वर्गही त्याच समाजातुन निवडला जातो. थोडक्यात तो शेवटी येतो...आरंभी नव्हे...आणि ही दैवी निवड नसून मानवी निवड असते हे येथे लक्षात ठेवले पाहिजे.

म्हनजेच पुरुषसूक्त सांगते म्हणुन ब्राह्मण मुखापासुन आणि शुद्र पायापासून शेवटी जन्माला आला हे मान्य करण्याचे काहीएक कारण नाही. ते धादांत असत्य आहे आणि अवैद्न्यानिक आहे. आधी निर्माणकर्ते येतात मग पुरोहित हेच समाजशास्त्रीय वास्तव आहे.

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...