Wednesday, February 29, 2012

ओबीसींनो "शुद्र" शब्दाचा अर्थ माहित आहे काय? (लेख ७)

गेली काही हजार वर्ष ओबीसी (निर्माणकर्ते) "शुद्र" म्हणुन संबोधले जातात. हीणवले जातात. परंतू आजतागायत शुद्र शब्दाची व्युत्पत्ती मात्र शोधण्याचा आपण प्रयत्न केला काय? शुद्र म्हणजे नेमके काय? शुद्र शब्द संस्क्रुतात आला कोठुन आणि त्या शब्दाचा नेमका अर्थ काय? तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु पाणिनी ते सर्वच सम्स्क्रुते व्याकरनकारांनी नेमक्या याच शब्दाची नेमकी व्युत्पत्ती आणि अर्थ दिलेला नाही. या शब्दाचे मुळ (Root) काय? हा शब्द कसा बनला आणि त्याचा नेमका अर्थ काय, याबाबत ते मौन पाळुन आहेत. का बरे?
आपण उच्चवर्णीयांबाबत मात्र त्यांच्या वर्णाची मुळे व अर्थ दिलेला आहे हे सरळ पाहु शकतो. उदा: ब्राह्मण: या शब्दाच्या कालौघात दोन व्युत्पत्त्या बनलेल्या आहेत वा दिलेल्या आहेत.
ऋग्वैदिक अर्थाप्रमाणे "जो मंत्र (ब्रह्म या शब्दाचा वैदिक अर्थ मंत्र असा होतो.) रचतो तो ब्राह्मण.
औपनिषदिक अर्थाने जो विश्वाचे मुळकारण (येथे ब्रह्म म्हणजे विश्वोत्पत्तीचा कारक) जाणतो तो ब्राह्मण.
क्षत्रियांबाबत खालील उपपत्त्या आहेत.
१. "क्षत्र" म्हणजे राज्यकर्ता वा लढवैय्या. जो ही कर्मे करतो तो क्षत्रीय.
२. "क्षत्र" हा शब्द "क्षत"...या मुळापासुन बनला असू शकतो. क्षत म्हणजे क्षती पोहोचवणारा, हत्या करनारा रक्षण करणारा यातुन क्षत्रीय हा शब्द विकसीत झालेला असु शकतो.
वैश्यांबाबत खालील उपपत्त्या देता येतात:
१. ऋग्वैदिक अर्थाने "विश" म्हणजे ग्राम. ग्रामांत राहणारे ते सारे वैश्य.
२. मनुस्म्रुतीनुसार शेती/पशुपालन करणारे, वस्तुंचे निर्माते व व्यापार करणारे ते वैश्य. येथे "विश" हा शब्द "व्रुद्धी करनारे ते विश" या अर्थाने येतो.
मेगास्थेनीसने लिहुन ठेवले आहे कि भारतात त्याकाळी वैश्य वर्णीयांची संख्या सर्वाधिक होती. वैश्यांना उपनयनाचीही अनुमती होती. हे मी येथे नोंदवुन अशासाठी ठेवतो आहे कि वस्तु उत्पादक, शेतकरी, पशुपालक, व्यापारी हे सारेच एकेकाळी वैश्य मानले जात होते. नंतर व्यापारी वगळता सारेच शुद्र मानले जावू लागले हेही एक ऐतिहासिक वास्तव आहे.
आता आपण शुद्रांकडे वळुयात. हा एकमेव शब्द असा आहे कि याचे मुळ/कुळ व मुलार्थ माहित होत नाही व ह शब्द मुळात सम्स्क्रुतातही नाही, असता तर त्याचे मुळ व अर्थ नक्कीच सांगता आला असता. याचाच दुसरा अर्थ असा कि शुद्र हा शब्द प्राक्रुतातुन आलेला आहे व तो तसाच्या तसा वापरला गेला आहे.
क्षुद्र या शब्दापासुन शुद्र हा शब्द आला असावा असे काही तद्न्यांचे मत आहे पण ते मत कधीच फेटाळुन लावले गेलेले आहे. मुळात संस्क्रुतात क्षुद्र हा शब्द होताच, तर मग तो तसाच्या तसा राहण्यात अडचण नव्हती.
तरीही आधुनिक भाषातद्न्यांनी शुद्र शब्दाचे मुळ शोधण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचा आपण आधी आढावा घेवुयात.
१. "सुत्र" या शब्दापासुन शुद्र हा शब्द निर्माण झाला असे एक मत आहे. "सुत्र" म्हणजे धागा. "ज्यांना धाग्याने बांधुन ठेवले आहे (Bonded) ते शुद्र अशी एक व्युपपत्ती आहे.
२. "शुच" (म्हणजे पवित्र करणे) व मुळ "चा" (म्हणजे बदलवणे) "दा" झाला, म्हनजे या शुचिदा पासुन शुद्र हा शब्द बनला असावा असा छादोग्य उपनिषदाचा हवाला देत हे मत मांडले गेले आहे. :" पवित्र करुन घेत बदलवले गेले ते शुद्र" अशी ही एक व्युत्पत्ती आहे.
३. मुळ इराणी शब्द "सुद्रेह" या शब्दापासुन शुद्र शब्द आला असावा असेही एक मत आहे. पण या भाषेत सुद्रेह हा पुजारी/पुरोहितासाठी वापरला गेल्याचे दिसते.
४. शुभा...म्हणजे वेदना...वेदना देनारा तो शुद्र अशीही एक व्युत्पत्ती आहे.
५. ऋग्वेदातील "जुद्रा" या (ऋ. १०.९०) शब्दापासुन शुद्र हा शब्द आला असावा असेही एक मत आहे. जुद्रा या शब्दाचा अर्थ चवथा असा होतो. परंतु हा शब्द काही ठिकाणी राजांसाठीही वापरलेला आहे असे दिसते.
६. शुद्र हा शब्द द्राविडीयन वा मध्य अशियातील काही भाषांमधुनही आलेला असु शकतो, पण त्या भाषा आज म्रुत असल्याने निश्चित असे मत देता येत नाही अशी हारही भाषातद्न्यांनी मानलेली आहे.
आता वरील तशी एकही व्याख्या "शुद्र" या शब्दाची समर्पक अशी व्युत्पत्ती देत नाही हे लक्षात आले असेलच. संस्क्रुत भाषेत या शब्दाला काहीएक अर्थ नाही हेही आपण पाहिलेच आहे. मग ज्या शब्दाला काही अर्थच नाही तो शब्द एका विशाल समाजाला चिकटवत त्याची धार्मिक, आर्थिक व सामाजिक घोर फसवणुक कशी व का केली गेली असेल हेही पाहणे क्रमप्राप्त आहे.
त्याहुन महत्वाचे म्हनजे व्यापार वगळता क्रुषिकर्म, पशुपालन, उत्पादन, कलादि क्षेत्रातील लोकांना मुळात वैश्यच मानले जात होते. हिंदु धर्म हा मुळात त्रैवर्णिकच आहे अशीच पुराणांचीही बव्हंशी समजुत आहे. ऋग्वेदातील पुरुषसुक्त व त्यातील चातुर्वर्ण्य निर्मान झाल्याची माहिती देणा-या त्या दोन ऋचा कशा बनावट व नंतर कोणीतरी घुसवुन दिलेल्या आहेत याबाबत मी आधी माहिती दिलेलीच आहे. त्यामुळे व शुद्र शब्दाची व्युत्पत्तीच मुळात उपलब्ध नसल्याने येथे वेगळेच चिंतन करणे भाग आहे.
-------------२---------------
पहिली बाब येथे मी स्पष्ट करतो ती ही कि भारतात सर्वात बलाढ्य अशी असुर संस्क्रुती होती. या संस्क्रुतीने सिंधु समाज घडवला. असुर हे मुलता: शैव होते. वैदिक जनही मुळचे याच संस्क्रुतीचे म्हणुन ऋग्वेद रचनेच्या आरंभ कालात ते आपापल्या दैवतांना "असुर वरुण, असुर इंद्र, असुर अग्नि" असे सन्मानाने संबोधत असत. परंतु या मंडळीने शैव सिद्धांत नाकारत नवीन धर्म स्थापन केला. तो यद्न्याच्या माध्यमातुन अमुर्त देवतांना हवि देण्याचा धर्म होता. वर्णव्यवस्था ऋग्वेदाने मांडलेली नाही...पुरुषसुक्त मात्र अपवाद आहे व वर्णव्यवस्थेला पावित्र्य देण्यासाठी तो उद्योग मनुस्म्रुतीच्या काळानंतर केलेला आहे हे मी वारंवार स्पष्ट केलेले आहे. उर्वरीत ऋग्वेदात ब्राह्मण, क्षत्र, विश एवढेच शब्द येतात व ते वर्ण म्हणुन नव्हे हेही येथे लक्षात घ्यायला हवे. हा धर्म/संस्क्रुती फक्त सरस्वती नदीच्या काठावरच्या मर्यादित प्रदेशात निर्माण झाली. उर्वरीत भारत मात्र असुर संस्क्रुतीने व्यापलेला होता.
आजही आपण तीच संस्क्रुती जपत आहोत व म्हणुनच हा सर्वच शैव प्रदेश भाषा व प्रादेशिक संस्क्रुत्या वेगळ्या असुनही अभंग राहिला. यद्न्य संस्क्रुती विशिष्ट समाज वगळता कोणीही जपली नाही. ऋग्वेदाने जे केले नाही ते मात्र नंतर झाले. म्हनजे तीन वर्णीय वाटणारे...पण तसे नसनारे शब्द मात्र वर्णांना लागु केले गेले. परंतु मग तीनच वर्ण होते...
येथे लक्षात घ्यायला हवे ते हे कि वैदिक धर्म न पाळणारे, असुर संस्क्रुतीचे लोक हेच बहुसंख्य होते. त्यांचे विराट सम्राट होते, शासक होते. त्यामुळे वेदबाह्य, वैदिक संस्क्रुती न पाळणा-या लोकांना काहीतरी संबोधणे आवश्यकच होते आणि ते त्यांनी केले. ते स्वाभाविक असेच होते.
आता जी संस्क्रुती आपल्यापेक्षा वेगळी, वेगळ्या धर्मतत्वांवर चालते आणि अवाढव्य आहे अशा संस्क्रुतीतील लोकांकडे हीनत्वाने पाहणे व त्यांची यथास्थित निंदा करणे स्वाभाविक होते. हे आपण जागतीक धर्मेतिहासात स्पष्टपणे पाहु शकतो. मग या असुरांना (याच संस्क्रुतीतुन पुढे वैदिक धर्माचे मारेकरी असे जैन व बौद्ध धर्मही निर्माण झाले.) ते कसे व काय उल्लेखत असतील?
शुद्र या शब्दाची व्युत्पत्ती यातच सामावलेली आहे असे माझे स्पष्ट मत आहे....ते असे...
शुद्र हा शब्द मुळात कोणत्याही व्यवसायाशी निगडीत नाही. असता तर असंख्य शुद्र राजे झाले नसते.
शेतकरी, उत्पादक, पशुपालक, जो वैदिक व्यवस्थेत, त्यांच्या समधर्मी समाजात वैश्य होता त्याला शुद्र म्हटले गेले नसते. ही त्यांच्याच धर्मातील विसंगती ठरली असती.
असुर संस्क्रुतीतील राजे, व्यापारी, उत्पादक, शेतकरी ते चाकरदार वर्ग हे त्यांच्या द्रुष्टीने परकेच असल्याने त्यांच्याबाबत ते हीनतापुर्वक शब्द वापरणार हे उघड आहे. एका धर्माचा माणुस अन्य धर्मियांबद्दल शेवटी कितपत मानवतावादी द्रुष्टीकोन वापरतो?
असुर संस्क्रुतीची भाषा ही पुरातन काळापासुन प्राक्रुत आहे. ऋग्वेद या भाषिकांना "मुघ्रवाच" (अनुनासिक व विसंगत भाषा बोलनारे असे संबोधतो.) असुर हा शब्द सम्स्क्रुताने स्वीकारला तो जसाच्या तसा कि बदल करुन?
संस्क्रुतने ऋग्वेदातील "पवमान" सारखे शब्द प्राक्रुतातुन जसेच्या तसे उचलले आहेत, पण बव्हंशी शब्दांवर संस्क्रुत कलमे केलेली आहेत. पवमान म्हणजे आजच्या (पाणिनीच्या) संस्क्रुतात "प्रवाहमान." पवमान शब्द मात्र मुळचा प्राक्रुत आहे. सम्स्क्रुत हीच मुळात प्राक्रुताचे संस्कारित रुप असल्याने व ऋग्वेद हा पाणिनीपुर्व असल्याने त्यात प्राक्रुत शब्दांची रेलचेल आहे, एवढेच येथे लक्षात घ्या.
संस्क्रुताने असुर हा शब्द पुढे बदलुन घेतला. असुर हा शब्द त्यांनी असुरांना बदनाम करण्यासाठी अवाढव्य कथांची पौराणिक रेलचेल करत बदनाम केला, पण क्रुष्ण हा आईच्या बाजुने असुर तर होताच पण त्याचा नातवाने, अनिरुद्धाने बाणासुराच्या कन्येशी, उषेशी, विवाह तर केलाच पण त्याचसोबत अनेक यादवांनी असुर कन्यांशी विवाह केले. अर्जुनाने नागकन्या उलुपीशी तर जरत्कारुने नागकन्या जरत्कारुशीच विवाह केला. भिमाने हिडिंबेशी कंत्राटी विवाह केला.
आता हे वर्णाभिमानी वैदिकांना सहन कसे होणार? त्यामुळेच कि काय वर्णसंकराची व्यथा वारंवार नुसत्या महाभारतात नव्हे तर खुद्द गीतेतही येते. वर्णसंकरामुळे कुलक्षय कसा होतो म्हणुन तो कसा टाळावा याबाबत विवेचने असुर क्रुष्णाच्याच तोंडी टाकुन या महाभागांनी आपला कार्यभाग साधला.
हे विषय बदलाचे साधन नाही. शुद्र शब्द कसा आणि कसा निर्माण केला गेला याबाबतचेच हे विवेचन आहे.
शुद्र शब्दाची कसलीही व्युत्पत्ती संस्क्रुत व्याकरणकार देत नाहीत हे आपण पाहिलेच आहे. मग हा शब्द आला तरी कोठुन?
व्याकरणाने पहायला जवे तर शुद्र शब्दाची फोड अशी होते...
"शुद,,," या शब्दाला लागलेली विभक्ती म्हणजे "द्र".
शुद या मुळापासुन शुद्ध हा शब्द बनला असु शकेल, पण ते संस्क्रुतात. सर्वच भाषा काही संस्क्रुताचे मुळ भषिक रुप पाळत नाहीत. त्यामुळे हेच मुळ प्राक्रुतातच पहावे लागते कारण तीच मुळची भाषा आहे. पण समजा ही व्युत्पत्ती ग्रुहित धरली तर त्याचा अर्थ असा होईल कि जे मुळचे शुद्धच होते ते म्हणजे शुद्र. पण वैदिकजन एवढे क्रुपाळु वा उदार नव्हते हेही येथे लक्षात घ्यायला हवे. असुर हे नेहमीच त्यांचे शत्रु होते.
त्यामुळे माझ्या मते, असुर...द्र (असुरद्र), म्हणजे जे असुर संस्क्रुतीचे ते. परकीय संस्क्रुतीचे ते. पुढे याच वैदिक संस्क्रुतीने "सुर" हा शब्द शोधुन काढला जो संस्क्रुतात मुळीच अर्थवाही नाही असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात. याचाच एक अर्थ असा कि असुर शब्दाला विरोधी म्हणुन सुर हा शब्द निर्माण केला गेला. असे जर असेल तर आणि अशा भाषिक कोलांट-उड्या वैदिक धर्मियांनी मारल्या आहेतच तर...त्यांनी असुरातील अ काढुन टाकला आणि सुरद्रला शुद्र करुन टाकले असे म्हनणे क्रमप्राप्त आहे. कारण हा शब्द ऋग्वेदात नाही....तो अत्यंत उत्तरकालात, म्हणजे ऋग्वेदनिर्मितीनंतर दोन हजार वर्षानंतर आलेला शब्द आहे....वर्ण म्हणुन...
असुरद्र याच शब्दाचा कालौघातील संक्षेप म्हणजे शुद्र होय! (सुरद्र...सुद्र..शुद्र...)
एकार्थाने शुद्र असने हीच एक अभिमानास्पद बाब आहे. आपल्या पुरातन सांस्क्रुतीक ठेव्याची, विजयांची नि पराभवांची नित्य आठवण देणारी ही ठेव आहे...
वर्ण:
भारतात वर्णव्यवस्था आहे. होती. ते जावुद्या, पण "वर्ण" शब्दाचा सरळ संस्क्रुत अर्थ रंग असा आहे. त्यानुसार जेवढी याबाबत चर्चा झाली आहे तिचा मतितार्थ थोडक्यात असा:
ब्राह्मण हे गोरे, नीळ्या डोळ्यांचे, उंच आणि धिप्पाड आणि सत्वगुणी असतात.
क्षत्रीय हे रक्तवर्णाचे तामसी स्वभावाचे असे लढावू असतात.
वैश्य हे गहु वर्णाचे व्यापारी व्रुत्तीचे असतात.
शुद्र हे तमोगुणी, सेवाव्रुत्तीचे आणि काळ्या रंगाचे असतत.
आता जर तुमच्यासमोर माणसे उभे करुन त्यांचा धार्मिक वर्ण सांगा म्हटले तर तुमची पंचाईत होईल. खुद्द ऋग्वेदात काळ्याकुट्ट लोकांने ऋचा लिहिल्या आहेत. क्रुष्ण हा काळाच होता. आज बव्हंशी ब्राह्मण काळे वा गहुवर्णीय आहेत. त्याच वेळीस शुद्रातीशुद्र हे अत्यंत गोरे व उंच धिप्पाड आहेत. थोडक्यात रंग म्हनजे वैदिक वर्ण ही व्याख्या मुळात लाथाडुन टाकता येईल अशीच आहे.
मग वर्ण म्हणजे नेमके काय यांना अभिप्रेत होते बरे? व्यासही काळा, वाल्मिकीही काळा, रामही काळा अन क्रुष्नही काळा...विट्ठलही काळा...यादी अवाढव्य आहे.
म्हनजेच त्वचेचा रंग हे काही वैदिक/अवैदिक ठरवण्याचे साधन नाही. वंशविभेदाचे साधन नाही. मग चातुवर्ण्य हा मुढ शब्द यांनी कोठुन आणला, हेही शोधणे आवश्यक आहे.
पण ते पुढील लेखात.

Tuesday, February 28, 2012

ओबीसींनो...बळीराजाचे फक्त अर्धे पावूल उचला! (लेख ६)

औद्योगिक क्रांतीमुळे निर्मानकर्त्यांच्या उद्योगव्यवसायांवर कशी भिषण अवकळा आली याचे ओझरते उल्लेख मी आधीच्या लेखांत केलेले आहेत. या अवकळेचे तसे तीन टप्पे पडतात. त्याबाबत येथे विचार करायचा आहे.
इ.स.च्या पहिल्या सहस्त्रकाच्या शेवटापर्यंत (सन १०००) भारतातील खरे सुवर्णयुग क्रमश: संपत आले. तत्पुर्वी भारतात देशांतर्गत व देशाबाहेर मोठ्या प्रमाणावर व्यापार चालु असे. या उत्पादकतेच्या व व्यापाराच्या कालाची सुरुवात इसपुर्व साडेतीन हजार वर्षांपुर्वी, म्हणजे सिंधु संस्क्रुतीच्या काळापासुन झालेली पुराव्यासह स्पष्ट दिसते. सिंधु संस्क्रुतीचे जे अवशेष आता जवळपास देशभर मिळाले आहेत त्यावरुन वस्त्रे, मातीची भांडी, मौलिक मण्यांचे अलंकार, रेशीम, हस्तीदंती वस्तु, धातुंच्या वस्तु/मुर्ती/प्रतिमा, सुवर्णाचे दागिणे, कातड्याच्या वस्तु ते लाकडाच्या ग्रुहोपयोगी वस्तुंची निर्यात होत असे. सिंधु संस्क्रुतीच्या आपल्याच पुर्वजांनी उत्पादनच नव्हे तर अन्य तंत्रद्न्यानांत एवआढी प्रगती केली होती कि त्यांनी लोथल येथे क्रुत्रीम गोदीही बांधली. आजही जगात क्रुत्रीम गोद्या अल्प आहेत...आणि ही जगातील पहिली क्रुत्रीम गोदी. तंत्रद्न्यानाची ती कमालच होती. हे लोक जशा वर सांगितलेल्या व धान्य-फळादि अन्य वस्तुही निर्यात करत असत तशीच आयातही होत असे. त्या सागर व्यापारासाठी लागणारी (शंभर ते हजार) वल्ह्यांची व शिडांची जहाजे बनवण्याची कला आपल्याच सुतार/लोहार/धातुकारांनी विकसीत केलेली होती. अन्यथा असा व्यापार असंभव होता. विदेश व्यापार ज्सा भरात होता तसाच देशांतर्गत व्यापारही तेजीत होता. भारतात प्रादेशिक विविधतेमुळे प्रत्त्येक प्रांताचे काहीनाकाही विशेष उत्पादन कौशल्य होते. आसमंतातील उपलब्ध नैसर्गिक साधनस्त्रोतांचा जीवनोपयोगी वस्तुंत बदल घडवण्याचे अथक कार्य त्यांनी केले. त्यामुळे केरळातील माल उत्तर भारतात तर बंगालमधील माल मध्य भारतात...दक्षिणेत सहज येत असे. त्यासाठी बैलगाड्यांचा शोध अर्थातच महत्वाचा ठरला. आजही अपल्या बैलगाड्या या सिंधु सम्स्क्रुतीत सापडलेल्या डिझाईननुसारच बनतात...तीच बाब नौकांची. ग्रुहबांधणीसाठी भजक्या वीटांचा शोधही तत्कालीन गवंड्यांनी लावला. आजही सिंधु संस्क्रुतीची (त्यात महाराष्ट्रातील जोर्वे, सावळदा इ. ते पार दाक्षिणात्य प्रदेशही आले.) नगररचना व ग्रुहरचना आदर्श मानली जाते.
विदेश व्यापारामुळे आर्थिक संम्रुद्धी तर आलेली होतीच परंतु बाह्य जगाशी नित्य संबंध येत गेल्याने सांस्क्रुतीक देवाण-घेवाणही होत होती. त्यामुळे येथील जनता नव्या द्न्यानाला पारखी नव्हती. अर्थातच त्यामुळे संकुचीतपणाला वावही नव्हता. सातवाहन काळातील माहिती मिळते ती अशी कि राज्या-राज्यांतले उत्पादक आपापला माल घेवुन देशांतरगतही मुख्य बाजारपेठांत जात असत. त्यांच्या व व्यापा-यांच्या सर्वच मुख्य श्रेण्याही असत. (आजच्या भाषेत आपण ब्यंका म्हणतो). या व्यापारासाठी जातांना चोर-लुटारुंचा उपद्रव होवु नये म्हणुन रक्षक दलेही असत. सातवाहन काळात त्यांना महारक्ख म्हटले जायचे. हाच समाज काही काळापुर्वीपर्यंत महार म्हणुन ओळखला जात होता.
यामुळे दोन बाबी साध्य झाल्या. एक तर निर्माणकर्त्यांची आपसुक आर्थिक भरभराट झाली. अधिकाधिक उत्पादने करण्याची, नवे शोध लावण्याची गरज निर्माण झाली. मोठमोठी नगरे, किल्ले, वाडे बांधण्याची व नवी गांवे वसवायची पद्धत आल्याने पार गवंडी ते सुतार/लोहार/चर्मकार/तांबट/वीणकर/साळी/कोष्टी/तेली असे जवळपास सारेच उत्पादक घटक मागणीच्या परिप्रेक्षात आर्थिक सत्तेचेही मोठे निर्माते झाले. या लाटेत कथित वैश्यही (व्यापारी वर्ग) मालामाल झाले.राजसत्तेला कर देणे आणि धर्मसत्तेला दान/दक्षिणा देणे यापलीकडे त्यांना आपल्या व्यवसायांशिवाय अन्यत्र पाहण्याची गरजही नव्हती. तत्कालीन स्थितीत शेत-जमीनींच्या मालक्या या राजे, सरदार, सरंजामदार वा जमीनदारांच्या ताब्यात असुन त्या कुळाने कसनारा क्रुषक वर्गसुद्धा खुप मोठा होता. त्यांना जमीनी गहाण ठेवण्याचा वा विक्रयाचाही अधिकार नव्हता. कारण त्यांची मुळात मालकीच नव्हती.मालकीची भावनाच नसल्याने शेतीउद्योगात नवी तंत्रे विकसीत करण्याची त्यांना भावनीक गरज भासणे अशक्यप्राय होते. तसेच झाले. त्यामुळे आज जरी कुळकायद्यामुळे सात-बा-यावर आपली नांवे लागली असली तरी मनोव्रुत्ती तीच राहिलेली आहे.
या काळात धनगर ते गोपाल हा पशुपालक समाज, जो सर्वात प्राचीन व मानवी संस्क्रुतीचा आरंभ बिंदू आहे, त्याचेही जीवन संम्रुद्ध होते. इतके कि आजही पुज्य असलेल्या बव्हंशी देवता या धनगर/गोपाल निर्मित वा त्यांच्याच पुर्वजांच्या स्म्रुती आहेत. अनेक राजघराणी आजच्या ओबीसींमधुन निर्माण झाली हाही एक इतिहास आहे. चंद्रगुप्त मौर्य, बिंबीसार, सातवाहन, भारनाग, पांड्य अशी शेकडो राजघराणी किमान सहाव्या शतकापर्यंत तरी होवुन गेली. ती घराणी हिंदु धर्माप्रमाने शुद्र (ओबीसी) मानली गेलेली आहेत. सम्राट अशोकाचा नातु ब्रुहद्रथ याचा खुन पुष्यमित्र श्रुंगाने केला त्यामागे ब्रुहद्रथ हा बौद्ध धर्मानुयायी होता हे मुळ कारण नसुन तो शुद्र असल्याने त्याला राज्यावर बसण्याचा अधिकार नाही अशी त्याची वैदिक भावना होती म्हणुन. इसच्या दुस-या शतकापासुन एका प्रदेशिक मर्यादेत वाढलेला वैदिक धर्म पुन्हा उचल खायला लागला त्याची ही परिणती होती.
दहाव्या शतकापर्यंत क्रमश: ओबीसींची महत्ता संपुष्टात येवु लागली. त्याला मी अवनतीची पहिली पायरी म्हणतो. येथे महार/मातंग/रामोशी इ. घटक तेंव्हा फक्त शुद्रच गणले जात असत हे येथे लक्षात ठेवायला हवे.पाचवा वर्ण अस्तित्वात नव्हता. चांडाळ/डोंब/श्वपक या काही अंत्यज जाती सोडता कोणाला अस्प्रुष्य मानले जात नव्हते. महार समाज हा रक्षणकर्ता समाज होता व तो सम्म्रुद्ध खेड्यांचा व व्यापारी ते पार किल्ले/राजवाडे इ.चे रक्षण करण्याची जबाबदारी पेलत होता.
या अवनतीची कारणे थोडक्यात खालीलप्रमाणे सांगता येतील:
१. समुद्र बंदीची घोषणा पुराणकारांनी केली व मुस्लिम शासकांच्या मदतीने तिची अंम्मलबजावणीही केली. परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापार थांबला.
२. देशांतर्गत देशीय सत्ता एकापाठोपाठ नामोहरम होवू लागल्याने उत्पादक व व्यापा-यांचे संरक्षक छत्र नष्ट झाले. थोडक्यात देशांतर्गत व्यापार हा अत्यंत जोखमीचा/धोक्याचा बनला. स्वत:च प्रचंड प्रमानावर संरक्षणाची सोय केली नसेल तर दुरचा प्रवासही अशक्य झाला. ही अवस्था अशी बिकट होती कि काशी यात्रेला जाणारे आपले मरण ठरलेलेच आहे असे समजुन चक्क जीवंतपणी श्राद्ध करुनच यात्रेला जात.
३. या सर्वांचा एकत्रीत परिनाम म्हणजे निर्माणकर्त्याचे काम कमी झाले...कारण स्थानिक बाजारपेठा सोडल्या तर अन्यत्र मालाची मागणी अगदी अपवाद वगळता उरलीच नाही. पर्यायाने आर्थिक स्त्रोत आटत गेले. बाह्य जगाशी संपर्क तुटला. इतका कि तो फार फारतर पंचक्रोशीपुरताच सीमित होवू लागला.
४. त्याच वेळीस परकीय सत्तांचे अन्याय/अत्याचार, सातत्याने होणारी युद्धे व त्यात पराजित होत त्यांना सामील होणारे एतद्देशीय सत्ताधारी यांच्या कचाट्यात ज्यांच्याजवळ जे थोडेफारही धन उरले होते ते लुटले जात राहिले. परिणामी हा वर्ग कंगाल होत गेला.
५. राजसत्ता नेहमीच धर्मसत्तेच्या अनुषंगाने जात असल्याने काशी/कांची/पैठणच्या वैदिक धर्मसत्तेने नव्या मुस्लिम राजसत्तेशी जुळवुन घेतले, पण सर्वसामान्य ब्राह्मनांचेही अंतत: अहितच केले. या ब्राह्मणांनी आपला सुड शुद्रांवर (ओबीसींवर) उगवला तो असा कि त्यांनी निर्माणकर्त्यांतीलच समाज फोडला. महार/मांग/चांभार/रामोशी अशा अनेक जातींना अस्प्रुष्य ठरवुन टाकले. त्यासाठी त्यांना सन १००० ते १६६० पर्यंत सातत्याने पडलेल्या शेकडो भिषण दुष्काळात नुसती मढीच काय...पार नरमांसही खाण्याचे निमित्त पुरले. सत्य असे आहे कि या कालात ब्राह्मण काय कि क्षत्रीय काय यांनाही अन्नच उपलब्ध नव्हते. त्यांनी पोट भरण्याचा हाच मार्ग पत्करला. त्यांनीही नरमांस खाल्ले तसेच म्रुत जनावरांचेही मांस खाल्ले. पण ब्राह्मणांसाठी तो म्हणे आपद्धर्म होता...नाही काय? पुराणात विश्वामित्राने नाही का दुष्काळात म्रुत कुत्र्याची तंगडी खावुन प्रण वाचवले? ऋषि-मुनींना सामान्य मानसांचे नियम लागु होत नसतात...आणि हे सारेच ब्राह्मण लगोलग जणु ऋषि-महर्षि होत त्या पातकातुन सुटुनही गेले...ही कथा त्यांच्या कामी आली. त्यांचा तो आपद्धर्म होता...पण इतरांसाठी तो नियम ते कसा लावतील? त्यात महार/मांगांच्या परंपरागत सेवेची त्यांना गरजही उरलेली नव्हती. लोकच एवढे भिकारी झाले होते कि रक्षणाची गरजच केवढी होती? मातंगांच्या सेवा त्यांच्यासाठी कवडीमोल झाल्या कारण त्याचे दाम देण्याची ऐपतच समाज हरपुन बसला होता.
काहीही झाले तरी त्यांना मात्र सुतार/लोहार/तेली/गवळी/धनगर इ. घटकांची त्यांच्याही जगण्यासाठी अनिवार्य गरज होती, त्यामुळे ते तेवढे अस्पुष्यतेतुन सुटले....पण हीनतेतुन सुटका मात्र केली नाही. ती त्यांचीही (सरंजामशाहीवाले आणि धर्मसत्तेवाले) जगण्याची गरज होती हेही येथे लक्षात घ्यायला पाहिजे. खरे ब्रोकन मेन तेच होते. सत्ताधारी एकामागुन एक पराजित होत आपापल्या घरांतील स्त्रीया जेत्यांकडे पाठवण्यात धन्य होत क्रुपाद्रुष्टी प्राप्त करण्यात तत्पर बनले होते. राजपुतांचे उदाहरण सर्वांनाच माहित आहे. ते तसे सर्वत्रच घडले. य ब्रोकन म्यन्सनी (आत्मसन्मान व नैतीक प्रतिष्ठा हरपुन बसलेल्यांनी) जेत्यांना खुष करण्यासाठी आपल्याच समाजबांधवांना लक्ष्य केले. गुलामीची महत्ता पुराणांतील भविष्यवाण्या सांगत हे कार्य जसे ब्राह्मणांनी केले तसेच उत्तरकाळात जन्माला आलेल्या, नवसरंजामदारीतील सौख्ये भोगु इच्छिणा-या स्वार्थासाठी लाचार अशा मुस्लिम सत्ताधा-यांचे हस्तक अशा समाजानेही केले. आपल्याच गांवांना, आपल्याच समाजांना लुटण्यात त्यांनी कसलीही कसर सोडली नाही.
याची परिणती म्हणजे निर्मानकर्ता आपली निर्मितीची उर्जा हरवु लागला. गांवगाड्यात, गांवातच मिळेल त्या उत्पन्नात/बलुत्यात आपला चरितार्थ चालवु लागला. प्रगतीचा, नवनवीन निर्मितीचा पहिला टप्पा संपुन हा नवा गुलामीचा टप्पा सुरु झाला तो जवळपास सन १००० पासुन. या टप्प्याने समाज हीनदीन झाला. त्याची उर्मी संपली. नवी संशोधने थांबली. (या निर्मानकर्त्यांनी लावलेले एकुणातील शोध हा एक स्वतंत्र ग्रंथाचा विषय आहे.) खरे तर हा टप्पा आला नसता तर कदाचित पहिली औद्योगिक क्रांती याच निर्मानकर्त्यांनी केली असती. जगाला देण्यासारखे खुप काही होत आपण आज रुढार्थाने द्न्यानसत्ता व अर्थसत्ता बनलो असतो. एके काळी होतोच. त्यामुळे ती परंपरा पुढे सुरु राहिली असती तर मी म्हणतो झालेच असते याबद्दल कोणाच्या मनात शंका असु नये.
पण ते तसे व्हायचे नव्हते. नाण्यांत आपल्या सर्जनाची किंमत वसुल करणारा बलुत्याच्या भिकेवर आला तर त्याच्या प्रेरणांची हत्या होनार नाही तर काय? ज्यांनी सर्वच समाजाची रातंदिस रक्षण केले त्यांनाच धर्मबाह्य करत अस्प्रुष्य ठरवले तर कोणते इमान मिळणार? नामदेव चोखा मेळ्याला समजावुन घेवू शकत होता. वेशीच्या पडल्या बांधकामाखाली दडपलेल्या त्याच्या अस्थी शोधु शकत होता...त्याची समाधी करु शकत होता...तेंव्हा हे तथाकथित उच्चवर्णीय कोठे होते? आपले हक्क आणि अधिकाराचे वाद आदिलशहा ते निजामाच्या दरबारात लढत होते. आपल्या जहागि-या कशा रक्षित राहतील यासाठी कोनत्याही थरावर उतरत होते, प्रसंगी भाऊबंदांच्या उरावर बसत त्यांच्याहे कत्तली करण्यात कसुर करत नव्हते.
कुणब्यांची हालत त्याहुन कमी नव्हती. दुष्काळ पडो कि अन्य काही राजकीय आपत्ती येवो, या बिचा-यांना आपल्या पोरी/बायका बटकीनी ते कुणबीनी म्हणुन अक्षरशा विकाव्या लागत...पेशवाईत तर कुनबीनींचे बाजार भरवले जात कारण पोटाचा प्रश्नच तेवढा भयानक होता. म. फुलेंचे शेतक-यांचा आसुड अवश्य वाचा...हे पुस्तक त्यांनी जमीनदारांसाठी नव्हे तर या कसलीही मालकी नसलेल्या स्व-भुमीहीन नागवल्या गेलेल्या प्रजेसाठी लिहिलेले आहे. (अर्थात आज हेच कुणबी स्वत:ला उच्चवर्णीय मराठे समजतात हा भाग वेगळा!)
हा साराच इतिहास उद्विग्न व खिन्न करणारा आहे...तरीही अनेक लोक त्यातही सुवर्णपाने शोधतात त्यांच्या अक्कलेची कीव करावी तेवढी थोडीच आहे!
असो.
हे मध्ययुग एकंदरीत सर्वच निर्माणकर्त्यांना क्रमाक्रमाने संपवत नेणारे ठरले. इज्जत संपली. आत्मसन्मान संपला. हताशा आणि निराशेच्या भरात एक तर रक्तरंजित क्रांती तरी घडते किंवा लोक नियतीशरण होत जेही काही घडते आहे ती इश्वरेच्छा आहे असे मानत गुलामीलाच धर्मतर्क जोडत वांझ जीवन जगु लागतात. भारतात नेमके दुसरे घडले. तुकोबारायांना बायको-मुलगा मेल्याचे दु:ख नाही तर उलट आपल्या अध्यात्ममार्गातील धोंड दुर झाल्याचे सुख आहे. हीण जातीत जन्माला आलो म्हणुन ही रया आहे असा सुर बव्हंशी संतांच्या अभंगांत आहे. बव्हंशी सारेच संत एवढे त्यागमुर्ती आणि संसाराला तुच्छ मानणारे असुनही ते एवढे पराकोटीचे स्वकेंद्रितच का राहिले हा माझा नेहमीचा प्रश्न आहे आणि अद्याप तरी त्यावर कोणी उत्तर दिलेले नाही. खरे तर समाज व विचारक्रांती ते करु शकत होते...किमान तसे विचार तरी देवु शकत होते. वेदविरोध (तोही शक्यतो लटका) सोडला तर पुराणांत व अन्य हिंदु धर्मग्रंथांत सांगितले त्यापेक्षा अभिनव म्हनता येईल असे वेगळे तत्वद्न्यान एकाही संताने दिलेले नाही हे वास्तव आम्हाला समजावुन घ्यायला लागणार आहे. एका अर्थाने ते पौराणिक धर्मतत्वांचेच पाठीराखे होते. धर्मातील काही अश्लाघ्य बाबींबद्दल त्यांची तक्रार होती, पण तिचे निवारणही त्यांनी ईश्वरावरच सोपवले हेच काय ते सत्य आहे.
या सर्वांची अपरिहार्य परिणती म्हनजे समाज धार्मिक आखाड्यातील एक अविभाज्य खेळाडू बनला. त्यांत भर पडणे स्वाभाविक होते. कारण मुस्लिमांचे राज्य गेले आणि इंग्रजांचे आले. ते नुसते मुस्लिमांसारखे राज्य नव्हते. मुस्लिमांचे राज्य हे औरंगझेबानंतर येतद्देशीय हिंदु सुलतानांचे राज्य बनलेले होते. पण आर्थिक पाया हा जवळपास हजार वर्ष होता त्याहीपेक्षा ढासळलेला होता. औद्योगिक क्रांती जर युरोपात झाली नसती तर इंग्रज हा देश कधीच सोडुन गेले असते. पण औद्योगिक क्रांतीमुळे इंग्रजांना तीन गोष्टी समजल्या त्या अशा...एक तर विपुल कच्चा माल जो आज वापरात नाही...अत्यंत स्वस्त मजुर...आणि भारतियांची गुलामी व्रुत्ती...
तिसरी अवनती येथे सुरु झाली. जसे भारतात आधुनिक तंत्रद्न्यानाचे उद्योग सुरु झाले, तसे येथील निर्माणकर्त्यांचे होते ते उरले-सुरले व्यवसाय/उद्योगही क्रमश: बसु लागले. याचा फटका तेल्यापासुन ते वीणकरापर्यंत बसला. इतका की रेडीमेड स्वस्त आणि मस्त चपला बुट येवू लागल्यावर चांभारांनाही बसला. ज्या गोष्टी अद्याप नवीन तंत्रद्न्यानामुळे उपलब्ध नव्हत्या तेवढ्याच बाबतीत गांवगाडा जरा चौकस राहिला. बकी ज्यांनी गांवाचे सेवा केली त्यांचे उद्योग संपले म्हणुन लाड करण्याचे काय कारण होते? तसे ते कोणी केलेही नाहीत. हळु हळु हा उपसर्ग, सुपातले जात्यात या नियमाप्रमाणे, जवळपास सर्वांनाच बसला...व जे काम कधी केलेच नव्हते ते काम पोटासाठी करण्याचा प्रसंग गुदरला.
आणि हे काम म्हणजे शहरांकडे पळणे, हमाली ते कामगार ही बिरुदे मिरवणे. रात्री पुन्हा भजने म्हणणे किंवा कामानंतर दारु पिवून आणि घरी जावुन बायकोला/पोरांना निराशेपोटी झोडपणे. या सर्व वर वर्णिलेल्या इतिहासात पुरुषांपेक्षा मायमाउलींचा इतिहास अधिकच विदारक आहे.. इतका कि पाषाणालाही आसवे उगवतील!
असो. मी निर्माणकर्त्यांचा -हास कसा झाला हे येथे सांगितले. तीन टप्प्यांत त्याने तीन पावले जमीन चालली...जी त्याला पावलापावलाने क्रमशा पाताळात गाडण्यासाठीच होती...आता उरलेले अर्धे वामनावतारी पावुल त्याचे पुरेपुर पाताळात जाण्यासाठीच आहे. अशा घोर अंधकारमय पाताळात कि पुन्हा कोणता द्न्यानाचा, स्वातंत्र्याचा सुर्य कधीही त्याला दिसणारच नाही. वामनाचे व्रत घेतले तर असे होणारच याबाबत तीळमात्र शंका असण्याचे कारण नाही.
लोकशाही यांना समजलीच नाही हेच खरे. हेच लोक भारतीय स्वातंत्र्याचे आणि आजच्या लोकशाहीचे निर्माते होते. म. गांधींच्या मागे हाच समाज अवाढव्य प्रमाणात स्वातंत्र्यासाठी उभा होता. यांनी लाठ्या खाल्या...तुरुंगवास भोगले. पण स्वातंत्र्य खेचुन आनले. म. गांधींना कदाचित त्यांच्या सहस्त्रकातील क्रमाने झालेली पडझड माहित असावी. त्यांनी भारतीय बदललेल्या मानसिकतेला हवा तसा आपला "सांतिक" चेहरा बनवला. तो यशस्वी झाला. उलट रक्तरंजित क्रांतीचे स्वप्न पाहणारे, पण जे गेली हजार वर्ष षंढ होवुन बसले होते, त्यांना एकाएकी रक्तरंजित क्रांती सुचु लागली. त्यांच्या रक्तरंजित क्रांतीचा मतितार्थ एवढाच कि त्यांनी गांधींना गोळी घालुन मारण्याचा विराट पराक्रम केला!
मग लोकशाहीवर (त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही...भारतीय राज्यघटनेवर विश्वास नाही...त्यांचा राष्ट्रगीतावर विश्वास नाही...किती सांगु?) डल्ला मारण्याचा अविरत प्रयत्न केला आणि ज्या पिडीत समाजांनी गांधी व बाबासाहेबांना खरे बळ पुरवले त्यांचा धुव्वा उडवण्याचा चंग विविध पक्षांच्या मार्फत यांनीच स्वातंत्र्योत्तर काळात बांधला. बाबासाहेब हे फक्त महार समाजाचे तर फुले हे फक्त माळ्यांचे. गांधी बनिया...म्हणजे तेही ओबीसी...(हिंदु धर्मानुसार कलियुगात जसे क्षत्रिय नाहीत तसेच बैश्यही नाहीत...कधी विसरु नका हे...हिंदु धर्मशास्त्रांनुसार कलियुगात फक्त दोनच वर्ण असतात आणि ते म्हणजे ब्राह्मण आणि शुद्र...उरलेले अवर्ण...) शुद्र गांधींचे नेत्रुत्व वा त्यांच्या यशाला सलाम हे कसे करणार? त्यांची हत्या जशी अपरिहार्य होती...(ते कारणे काहीही देवुद्यात...!) तशीच ओबीसींची हत्या शिर्कान स्वातंत्र्योत्तर काळात होणारच याबाबतहे शंका असुच शकत नव्हती आणि ती चक्क त्यांनी करुन दाखवलीच आहे आणि याची लाज ओबीसींना नाही, त्याचे गांभिर्य नाही. आणि ज्यांनी आत्मघातच करुन घेत जागायचेच नाही असेच ठरवले असेल तर त्याला कोण वाचवणार बरे?
तेंव्हा फुकाचे अभिमान सोडा...हातानेच तुम्ही आपल्या गळ्याचे माप इतरांना दिले...त्यांनी बरोबर अगदी मापात गळफास बनवला...आता त्यांनी तुम्हालाच फासावर लटकवत गुदमरवुन टाकले असेल तर दोष तुमचाच आहे. कशाला गळे काढता मग? काय अधिकार आहे तुमचा? भिका-यांना निवडीचा अधिकार नसतो. जे थाळीत वाढले जाते ते निमुट घ्यावे हा नियम. अन्यथा जगावे तर उत्तम..काय झाले एक दोन पीढ्या सहनकर्त्या झाल्या तर? शेकडो पीढ्या दैन्यात गेल्या..झगडल्या...मेल्या...त्यांची नोंद कोणीही ठेवलेली नाही वा ठेवायची गरजही भासलेली नाही. कोनत्या भुषणाचे वांझ फुत्कार तुम्ही सोडता मग?
तीन पावलांबाबत मी आधीच लिहिले ज्यांनी अवनती आणली. त्याबाबत व्यवस्थेला/परिस्थितीला एकवेळ दोष देता येईल कदाचित...
पण आज?
पुढचे अर्धे पावुल हे खरे तुमचेच आहे...जागतिकीकरणाचे आहे. एक सहस्त्र वर्षांपुर्वी तुम्ही खरे जागतीकिकरणाचे खरे अध्वर्यु होता...अरबस्तानपासुन ते इजिप्तपर्यंत, ग्रीकांपासुन ते रोमपर्यंत, इंडोनेशियापासुन ते पार मेक्सिकोपर्यंत खरे तत्कालीन स्थितीतील जागतीकीकरण तुम्ही अनुभवले, जगले व लाभार्थीही झाले... प्रादेशिक संस्क्रुतीला जागतीक संस्क्रुती बनवलेत...
विसरु नका...उचला हे उरलेले अर्धे पावुल...ते खरे बळीराजाचे पावुल...
वामन हा खुजा...मग तो मनोव्रुत्तीने असो कि क्रुतीने...बळी हा नेहमीच आकाशव्यापी असतो...तो कोणाचा घात करत नाही...तो उदारच असतो...कनवाळुच असतो...क्षमाशीलच असतो...
मानवतेची सारी मुलतत्वे ध्यानी घेत हे उरलेले अर्धे पावुल उचला...आधीची तुमची तीन पावले तुम्हालाच विनाशापर्यंत घेवुन आलेलीच आहेत...पण तो तुमचा नव्हे तर एकंदरीत व्यवस्थेचा पराभव होता. ते खरे ब्रोकन मेन होते...पराजयांसाठीच ते जन्माला आलेले होते.
तीन पावले आजवर तुम्हीही पराभुतांपाठीच उचलली...
पण हे स्वत:चे...अगदी स्वत:चे...आत्माभिमानाचे...नि फार नव्हे...फक्त अर्धे पावूल....
बस...विजयासाठी उचला!
जग तुमचेच आहे!

Sunday, February 26, 2012

ओबीसींची दिवसेंदिवस आत्मघाताकडेच वाटचाल (लेख ५)

ओबीसी, जो निर्माणकर्ता घटक होता, त्याला आपल्या अस्तित्वाच्या जाणीवांनी एवढे भेडसावलेले आहे कि त्याला आपण ओबीसी आहोत हे सांगायची शरम वाटते. कोणी नसतांनाही स्वत:ला क्षत्रीय म्हनवुन घेतो तर कोणी दैवद्न्य होत ब्राह्मनांशी नाळ जुळवु पाहतात. पण हे धादांत असत्य आहे. निर्मानकर्त्यांना हिंदु धर्मव्यवस्थेने शुद्र आणि फक्त शुद्रच मानलेले आहे हे वास्तव पचवुन घ्यायला ओबीसींना जमत नाही. म्हणुनच कि काय ते आपल्याच जाती-अंतर्गत पोटजातींच्या निमित्ताने एक चातुर्वर्ण्य पाळतात, त्यातही उच्चनीचता पाळतात, तसेच ओबीसींतील अन्य जाती आपल्यापेक्षा हलक्या असल्याचे मानतात व तसा व्यवहारही करतात. म्हणजेच वांझ जाती-अभिमानाच्या पोटी स्वत:चाच नव्हे तर सर्वांचा घात करतात.
ज्या निर्माणाची या समाजाने पुरातन काळापासुन कास धरत संस्क्रुती/अर्थव्यवस्थेचे दिग्दर्शन करत अखिल समाजाची प्रगती साधली, त्यांचे जीवन सुसह्य केले ते आज कसलेही नव-निर्माण न करता, आपल्याच पुरातन व्यवसायांत आधुनिकता आणत प्रगती न साधता केवळ स्वजातीच्या अभिमानात चुर आहेत हे एक भयंकर कोडे आहे. या ओबीसींना निवडनुकांचा काळ वगळता तसे कुत्रे विचारत नाही अशी वास्तव स्थिती आहे. यांचा इतिहास पुसलेला आहे. यांनी तो जपला तर नाहीच, पण इतरांनी मात्र जपायला हवा होता अशा अवास्तव व अविवेकी अपेक्षा आहेत.
ओबीसींमद्धे आज जवळपास सव्वाचारशे जाती आहेत. प्रत्त्येक जातीच्या (पोटजातींच्याही) संघटनाही आहेत. या संघटना सामाजिक प्रश्नांसाठी काम करत असतील असा कोणाचाही (गैर) समज होवू शकतो. पण ते वास्तव नाही. या संघटनांचा एककलमी कार्यक्रम म्हणजे वधुवर मेळावे भरवणे. जणु लग्ने जुळवणे हीच काय ती या समाजाची मुख्य गरज आहे. यासोबत फारफारतर देवळे बांधणे, धर्मशाळा उभारने आणि कधी जमल्यास वस्तीग्रुहे बांधणे यापार हे लोक जातच नाहीत. प्रबोधनाची गरज आहे याची ना जाण आहे ना भान आहे. किमान आपापल्या समाजातील विचारवंतांना/समाजसेवकांना/साहित्तिकांना बळ दिले पाहिजे या भावनेची तर सर्वस्वी वानवा आहे. यामुळे बहुसंख्य ओबीसी लेखक जाणते/अजानतेपणे ब्राह्मणी गोटांची कास धरतात आणि आपल्या समाजालाच तुच्छ मानु लागतात...याला जबाबदार हेच ओबीसी आहेत. त्यामुळेच ओबीसी लेखक आपल्या जातींचे नायक करणे तर सोडाच उल्लेखही टाळतात हे एक वास्तव आहे.
इतिहासाची अक्षम्य हेळसांड हा तर रोगच जडलेला आहे. प्रत्त्येक जातीघटकाचा काही ना काही इतिहास हा असतोच! इतिहास नाही असा समाज असुच शकत नाही. धनगर, माळी, सुतार, तेली-तांबोळी ते पार वंजारी-पाथरवटांचा (वडा-यांचा) इतिहास आहे, त्या प्रत्त्येक जातेघटकाचे सामाज-संस्क्रुतीला पुरातन काळापासुन महत्वाचे योगदान आहे. कोनत्याही जातीला हीनत्वाने लेखावे असा कोणाचाही इतिहास नाही. इतिहासात फक्त राजे-रजवाडेच होवुन गेलेले असले तरच त्याला इतिहास म्हणायचे असा अनैतिहासिक समज लोकांचा आहे, पण ते खरे नाही. परंतु नवे इतिहासकार या द्रुष्टीकोनातुन इतिहासाकडे पहातच नसल्याने ते ज्यावर लिहुन लिहुन चोथा झाला आहे अशा अन्य महापुरुषांवरच लेखणी झिजवण्यात पुन्हा पुन्हा गर्क राहतात. त्यामुळे खरे नवनिर्माण होतच नाही. सर्वच समाजाला आत्मभान येईल असे लेखन होतच नाही. त्यामुळे जे आत्मभान/आत्मसन्मान आणि मुळातील एकतेची जाणीव या अवाढव्य समाजाला होत नाही. वाचनसंस्क्रुती अल्पांश आहे. धार्मिक गाथांचे पठण/सप्ताह साजरे करण्यापुरता बव्हंशी ओबीसींचा संबंध येतो. धर्माचे वेड यांच्यातच सर्वाधिक असुन ते सहजी बुवा-बापुंना बळी पडतात...एवढेच नव्हे तर हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रचाराला बळी पडन्यात व त्यांच्यात सहभागी होत त्यांना बळ पुरवण्यात हेच आघाडीवर असतात. पण यातुन आपला वापरच केला जात आहे व आपण नव्या शोषणाचा मार्ग उघडुन देतो आहोत याबाबत त्यांना जाण येत नाही.
जसे दलित साहित्य गतशतकात पुढे आले, एक विद्रोही चळवळ उभी राहिली व जागतिक साहित्यात प्रतिष्ठा मिळवली तशी ओबीसी साहित्य चळवळ का निर्माण झाली नाही, याचे उत्तर वरील विवेचनात आहे. या समाजाचे प्रश्न वेगळे आहेत, वेदना वेगळ्या आहेत, अन्यायाचे परिप्रेक्ष वेगळे आहेत, जातीय उतरंडीत त्यांना कोणताही सन्मान नाही. पण त्याचे सकस प्रतिबिंब पडेल असे साहित्यच नाही. (उद्धव शेळकेंची ’धग’ हे एकमेव उदाहरण मानता येईल...पण ती किती ओबीसींनी वाचली?) मल्हारराव होळकर एवढे पराक्रमी सरदार असुनही त्यांच्याबाबत पेशवे "शुद्र मातला आहे..." असे विधान करत हे किती जणांना माहित आहे? त्याची खंत वेदना कोणाला वाटते? कि यामागे ते धनगर होते...धनगर पाहुन घेतील, अशीच आप्पलपोट्टी व्रुत्ती आहे?
याच स्वकेंद्रित व्रुत्तीमुळे ओबीसींची सामाजिक/सांस्क्रुतीक व राजकीय हानी होत आहे. मी वारंवार स्पष्ट आणि सिद्ध केले आहे कि सारे ओबीसी मुलच्या एकाच समाजातुन व्यवसायाधिष्ठित कारणांमुळे वेगळे झाले आहेत, पण त्यांच्या संस्क्रुतीची मुळे एकच आहेत. आज तर बहुतेक व्यवसाय नष्ट झाले आहेत वा अन्यांच्या हाती गेले आहेत. भांडवलदारी व्यवस्थेत व औद्योगिकरणानंतर हे अपरिहार्य आहे असे मानले तरी त्यावर पर्याय शोधुन पुन्हा आर्थिक/सामाजिक व सांस्क्रुतीक इतिहास घडवण्यात या समाजाला घोर अपयश आलेले आहे. "वापरुन घेण्यासाठी जन्माला आलेला व तरीही वांझ अहंभावात जगणारा समाज" अशीच या समाजाची ओळख आहे.
या समाजातुन किती अवाढव्य उद्योग उभारणारे जन्माला आले? परंपरागत व्यवसायांना आधुनिकतेची जोड किती जणांनी दिली? शेतकरी तरी नवनवे प्रयोग करतात...यांनी काय केले? यांची कल्पकता/उद्यमशीलता/नवनिर्माणाची उर्मी कोठे गेली? पुर्वी गांवगाड्यात ओबीसीही दासच होता...बलुतेदारच होता. अस्प्रुश्य नव्हता एवढेच. पण जीणे लाजीरवाणेच होते. स्वातंत्र्योत्तर काळातही या स्थितीत विशेष फरक पडलेला नाही. शैक्षणिक/आर्थिक व सामाजिक पातळीवर हा समाज आजही मागासलेलाच आहे. सरकारी नोक-यांत या समाजाचे एकुणातील प्रमाण हे फक्त ४..८% एवढेच आहे. (सविस्तर आकडेवारी मी या लेखमालिकेत पुढे देनारच आहे.) ही टक्केवारी नक्कीच लाजीरवाणी आहे. बावीस टक्के जागा, मंडल आयोगाचा अहवाल स्वीकारुन २० वर्ष झाली तरी, अजुनही भरल्या जात नाहीत, याबाबत कोणाला फारशी खंत असल्याचे दिसुन येत नाही. त्यात या कोट्यातील साडेचार टक्के आरक्षण मुस्लिमांना देण्याचे घाटत आहे. आधीच मुस्लिम ओबीसी या ओबीसी कोट्यात सामाविष्ट आहेतच, त्यात ही नवी भर पडली तर ओबीसींना ती किती महागात पडेल यावर हे लोक कधी चिंतन करनार?
सरकारला ओबीसींचे कसलीही चिंता नाही. ज्यांना वाटते ते सातत्याने यावर बोलतात. उदा. प्रा. हरी नरके यावर जेवढे जागरण करण्याचा प्रयत्न करतात व ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करतात तेवढा कोणीही करत नाही...पण येणारा एकुणातील प्रतिसाद शुण्य आहे असे म्हटले तरी चालेल.
थोडक्यात ओबीसींची दिवसेंदिवस आत्मघाताकडेच वाटचाल सुरु आहे. राजकारणाचे बोलावे तर एकट्या पुण्यात राष्ट्रवादीचे निवडुन आलेल्या नगरसेवकांची संख्या पाहिली तर त्यात ८०% मराठे आहेत व उर्वरीत ओबीसी/बीसी/मुस्लिम असे आहेत. आपल्याच संकुचित आणि मुढपणामुळे सर्वच क्षेत्रांत आपली पीछेहाट होत आहे व नव्या गुलामीच्या दिशेने द्रुतगतीने वातचाल सुरु आहे याचे भान या ओबीसींना कधी येणार?


Thursday, February 23, 2012

सामाजिक विषमता...ओबीसींची दुर्दशा...दोषी कोण? (लेख ४)

मानवी जीवनात अन्न-पाणी-वस्त्र-निवारा याइतकीच महत्वाची गरज असते ती म्हणजे आत्मसन्मान. आत्मभान. आपल्या अस्तित्वाची आणि एकुणातीलच व्यवस्थेतील स्थानाची परिपुर्ण जाण. ही जाण सर्वसामान्य समाजाला आली तर ती जाण आपल्या अस्तित्वाच्याच मुळावर येईल याची जाण सर्वाधिक असते ती धर्मसत्ता आणि राजसत्तांना. ती तशी येवु नये म्हणुन एकीकडे धर्माचे स्तोम वाढवत लोकांना त्या जाळ्यात अडकवत प्रदिर्घ गुंगीत टाकणे आणि अनिर्बंध सत्ता गाजवणे हे आजवर राजेशाहीवादी वा हुकुमशाहीवादी सत्ताधा-यांचे प्रमुख ध्येय राहिले आहे. हा जागतिक इतिहास आहे.
रोमच्या सम्राटाने ख्रिस्ती धर्म स्वीकारला तो काही त्याला ख्रिस्ती धर्माची मुलतत्वे पटली म्हणुन नव्हे तर साम्राज्यवादासाठी या धर्माचा उपयोग होवू शकतो हे ध्यानी आले म्हणुन. भारतात वैदिकवादी, जैनवादी ते बौद्धवाद्यांचा उपयोग विविध राजसत्तांनी करुन घेतल्याचे दिसते. कोणत्यानाकोनत्या वा जमेल तेवढ्यांना रक्षण ते सहाय्य या राजसत्तांनी पुरवले ते काही त्यांना खरेच त्या धर्मतत्वांचे शब्दश: पालन करायचे होते म्हणुन नव्हे तर त्यांच्या सत्तेला आव्हान उभे राहु नये यासाठी. हे विधान थोडे धाडसी वाटेल, पण त्याचे विवेचन खालीलप्रमाणे करता येईल.
ख्रिस्त हा शांतीचा व मानवतावादाचा प्रेषित घोता परंतु त्याच्या धर्माचा उपयोग सर्वस्वी रक्तरंजित कारवाया करत साम्राज्यविस्तारासाठी केला गेला. इस्लामची स्थापना हीच मुळात ख्रिस्ती विस्तारवादाला विरोध करण्यासाठी झाली त्यामुळे हिंसकतेची (जिहादी) तत्वधारा या धर्मात आपसुक येणे स्वाभाविक होते. या तत्वधारेचा उपयोग करुन घेत इस्लामी राजसत्तावाद व विस्तारवाद वाढला. धर्म हे त्यांना साधन म्हणुन मिळाले...पण हा विस्तारवाद धर्मासाठी नसुन साम्राज्यवादासाठी होता. धर्माचा व धर्मसत्तांचा त्यांनी हवा तसा वापर करुन घेतला. भारतातही राजसत्तांनी कधी वैदिक, कधी शैव तर कधी वैष्णव तर कधी जैन तर कधी बौद्ध धर्माचा उपयोग करुन घेतला आहे. याचा उपयोग त्यांनीही राज्यविस्तारासाठी केलेला आहे. धर्माचा वा पंथाचा निमित्त म्हणुन उपयोग केला आहे. सम्राट अशोकाने कलिंग प्रकरणानंतर बौद्ध धर्म स्वीकारला असे सर्वसाधारण जनमत आहे, पण ते खरे नाही. अशोक सत्तेवर आला तोच आपल्या थोरल्या बंधुचा, कालाशोकाचा, खुन करुन. त्याला बौद्धधर्मियांचे पाठबळ होते म्हणुनच तो सत्तेत येवू शकला. त्या बदल्यात त्याने धर्मप्रचार केला खरा पण राज्यविस्तारही केला असेच इतिहासावरुन दिसुन येते. जो धर्म प्रबळ तसे आचरण राजांनी ठेवले. मुघल सत्तांनी धर्म बदलला नसला तरी व्यवहारात त्यांचे हिंदुत्वीकरण झालेलेच होते. हिंदु स्त्रीयांशी त्यांची विवाहपरंपरा पाहिली तर औरंगझेब हा ७५% हिंदु रक्ताचाच होता. सत्ताधा-यांनी सत्तेसाठी सर्व प्रकारच्या तडजोडी केलेल्या आहेत व धर्मनेत्यांनी त्यांना हवे तसे धर्मनियम बनवुन पेश केलेले आहेत. वैदिक धर्मियांनी तर पुरातन काळापासुन राजसत्तांना अशी मदत केली आहे व विरोधी धर्मियांची/पंथियांची खच्चीकरणे राजसत्तांचाच वापर करत करवुन घेतली आहेत. तसे करण्यासाठी धार्मिक नियमांनाही हवे तसे वाकवले आहे. भारतात इस्लामी राजवट सुरु झाल्यानंतरच वैदिक मंडळीने कलिवर्ज्य प्रकरण निर्माण करत भारतावर कलियुगी म्लेंछ राज्य करणार ही पौराणिक भविष्यवाणी प्रस्रुत/प्रचारित केली हा योगायोग नसुन वैदिक धर्मसत्तेने इस्लामी राजसत्तेशीही कसे जमवुन घेतले हा इतिहासही पाहिला पाहिजे. राजसत्तांना अशी मदत करत असतांना आपली धर्मसत्ता त्यांने टिकव्णे स्वाभाविक व अपरिहार्य होते. जगभर असे झालेले आहे. इस्लाममद्धे मुल्ला-मौलवींनी आपली सत्ता टिकवली तशीच ख्रिस्त्यांमद्धे चर्चमार्फत टिकवली गेली.
थोडक्यात धर्मसत्ता आणि राजसत्तेतील ही युती ही आदिम काळापासुन सुरु आहे. या युतीत अनेकदा संघर्षही उडालेले आहेत हेही तेवढेच खरे. पोपची सार्वभौम सत्ता नाकारण्यासाठी इंग्लंडने स्वत:चे चर्च जसे निर्माण केले तसेच रशियातही घडले आहे. इस्लाममद्धे शिया-सुन्नी हे भेद बनले ते राजकीय कारणांनी...धार्मिक नव्हेत.
त्यामुळे आजच्या सामाजिक अवनतींसाठी धर्मसत्तांनाच दोष देण्याकडे सर्वसामान्यांचा कल असतो, पण ते तसे नसुन राजसत्ता या अधिक जबाबदार होत्या असेच म्हणावे लागते. पुरोहित वा मुल्ला-मौलवी सांगतो म्हणुन हवे ते धर्मनियम निर्माण करु देत त्यांची अंमलबजवाणी करायला राजसत्ता मुर्ख नव्हत्या...त्या तशा असुही शकत नाहीत कारण सत्ता अनिर्बंधपणे कशा टिकतात याचे भान धर्मसत्तेपेक्षा राजसत्तांनाच अधिक असते.
वर्ण-जातीव्यवस्थेबाबत व तिच्या कठोर अंमलबजावणीबाबत आजवर आपण धर्मसत्तेलाच दोष देत आलेलो आहोत. पण या व्यवस्थेचा खरा व अंतिम फायदा होता कोणाला? समाजात जेवढी विषमता असेल, समाजाचे जेवढे विभक्तीकरण होईल कि ज्यायोगे लोकांनी व्यवस्थेच्या/सत्तेच्या विरोधात एकत्र येत बंडच करु नये असे कोनाला वाटेल? ब्राह्मणांचा त्यात काय फायदा होता? तसेही लोक पुरोहितावर धर्माच्या बाबतीत विश्वास ठेवतच असतात. आपल्याच पुरोहितांविरुद्ध त्याच धर्माच्या अनुयायांनी बंड केल्याचे उदाहरण नाही. बंडे होतात ती राजसत्तांविरुद्ध. समाज विभक्त व आपापल्या जातीय/वर्णीय कोषात बंदिस्त करण्याचा खरा फायदा राजसत्तांनाच होता व धर्माचा आधार घेत त्याची अंमलबजावणी राजसत्तेखेरीज कोण करु शकत होते? एका ब्राह्मनाने लिहिलेली मनुस्म्रुती फेटाळुन लावण्याचा अधिकार राजाला कधीही होता...पण त्यांनी ते तसे केले नाही कारण त्यात त्यांचा फायदाच होता. ब्राह्मनांनी प्राप्त परिस्थितीचा स्वार्थासाठी उपयोग करुन घेत स्वहिताची कलमे घुसवली असेच फारतर म्हनता येईल.
या सर्वाची अपरिहार्य परिणती म्हणजे समाज हा धर्मवेडा बनवणे ही राजसत्ता व धर्मसत्तेची अपरिहार्य गरज होती. ते त्यात हजारो वर्षांच्या प्रदिर्घ कालात नुसते यशस्वी ठरले असे नाही तर धर्माचे गारुड जनमानसावर असे बसले कि ते दूर होणे अशक्यप्राय व्हावे. या गारुडामुळे प्रचलित व्यवस्थांच्या विरोधात, धर्माच्या विरोधात बोलणे/क्रुती करणे अशक्यच झाले. युरोपात ब्रुनो नामक शास्त्रद्न्याला बायबलाच्या विरोधात जाणारे सिद्धांत मांडतो म्हणुन जीवंत जाळले गेले. ग्यलिलियोला आजीवन कारावासात रहावे लागले. असंख्यंचा पराकोटीचा छळ केला गेला.
पण युरोपच्या विचारवंतांनी ते जनतेनेही शेवटी धर्मसत्ता व राजसत्तेला हादरा दिला. मानवी स्वातंत्र्याचे, समतेचे व बंधुतेचे नवे पर्व फ्रांसमधुन सुरु झाले. विचार, विद्न्यान, कलादि अभिव्यक्ते मुक्त श्वास घेवु लागल्या. सरंजामदारशाहीला व त्यांच्या अनिर्बंध लालसेला लगाम बसला.
पण दुर्दैवाने भारतात त्याची लागण झाली नाही. इंग्रजांचे राज्य आले, ती गुलामीही विनातक्रार स्वीकारली गेली. १८५७चे बंड हे सरंजामदारांचे त्यांच्या व्यक्तिगत मागण्यांसाठीचे बंड होते...जनतेचे ते बंड कधीच नव्हते. ते अपयशी ठरणारच होते व तसे झालेही.
याचे कारण म्हणजे सत्ता कोनाचीही असली तरी जनतेला जनतेचे असे स्वातंत्र्य भारतात कधीच नव्हते. एकीकडे धर्म तर दुसरीकडे येईल ती राजसत्ता...यांच्या कचाट्यात ही जनता सापडलेली होती. आर्थिक अवनतीचा आलेख पराकोटीच्या रसातळाला जावुन पोहोचला होता. अशा स्थितीत धर्माचेच गारुड जगण्याचे निमित्त बनणे स्वाभाविक होते. पंढरीचा राया करेल ते खरे अशी पराभुत मनोव्रुत्ती निर्माण व्हायला आजवरचे धर्मनेते ते सत्ताधारी कारणीभुत होते. जनतेच्या व्यापक कल्याणाची भावना त्यांच्यात नव्हती. शिवाजी महाराजांचे अपवादात्मक एकमात्र नांव घेता येते पण दुर्दैवाने त्यांची सत्ता मर्यादित प्रदेशावरच होती. संतांच्या मांदियाळीने बंड केले असले तरी त्यांची मांडणी ही समाजाला श्रद्धेकडेच नेणारी होती. बहुतेक संत ओबीसींमद्धे व दलितांतच जन्माला का आले याचे कारण या समाजाची परिस्थितीमुळे निर्माण झालेली नियतीशरणता व त्या अगतिकतेपोटी सारा भार इश्वरावर सोपवण्याची व्रुत्ती.
परंतु हे सारे स्वातंत्र्यपुर्व काळातील सरंजामदार व नंतर इंग्रजांच्या गुलामीच्या कालातील परिस्थितीकडे पहात क्षम्य समजता येते. तेंव्हा लोकशाही नांवाची काही बाब असते हेही लोकांना नीटसे माहित नव्हते. प्रत्येकाला अभिव्यक्तीचेच नव्हे तर सत्तेत सामील होण्याचेही स्वातंत्र्य असु शकते याची त्यांनी हजारो वर्षांत कधी कल्पनाही केलेली नव्हती. गांवात मुळात कसली इज्जत नव्हती. पाटील, जमीनदार, भिक्षुक म्हणेल त्यावर मान डोलावणे आणि त्यांची जवळपास फुकट सेवा करणे एवढेच काय ते नशीबी होते. त्यात औद्योगिकरणाने जे व्यवसाय बुडाले त्यांच्यावर तर आभाळच कोसळले. परांगदा होत शहरांकडे जात हमाली ते फुटकळ चाक-या करत पोट जाळणे अनेकांच्या नशिबी आले. त्यामुळे स्वातंत्र्य आले हे खरे, पण ते म्हणजे काय असते रे भौ असा प्रश्न त्यांच्या मनात उठणे स्वाभाविक होते.
त्याची फळे अशी कि त्यांचे जीवनच विस्कळीत बनले. तशीच मानसिकताही बनली. राजकारणापासुन तो तसा दुरच राहिला. त्याची जाण त्याला आली नाही व करुन घेण्याची इछाही झाली नाही. अपवादात्मक नेत्रुत्वे आली, पण ती आपल्या जातीची वा पोटजातीची तर नाहीत ना...मग जावु द्या...अशी उदासिनता वाढत गेली. इतिहासाचे भान नव्हते व आकलनही नव्हते. दलित समाजाला जसे बाबासाहेबांसारखे प्रकांड विद्वत-नेत्रुत्व मिळाले त्याबाबतीत हा समाज मात्र करंटाच राहिला. बाबासाहेबांना समजावुन घेत त्यांच्या विचारांचे जरी आकलन करण्याचा प्रयत्न केला असता तरी काही साध्य झाले असते. पण धर्माच्या व जातीश्रेष्ठत्वाच्या (खालच्या उतरंडीवर असुनही) अहंकारात त्याने बाबासाहेबांना नाकारले हे मात्र सत्य आहे.
हिंदु धर्म का टिकुन राहिला या प्रश्नाचे उत्तर ब्राह्मण समाज नेहमीच हा धर्म श्रेष्ठ असल्याने टिकुन राहिला असे म्हनतात. पण ते सर्वस्वी खोटे आहे. हा धर्म टिकुन राहिला याचे मुख्य कारण (अन्य काही कारणासह) ओबीसींच्या धर्मनिष्ठेत आहे, देवभोळेपणात आहे. आजही बुवा-बापुंचे आश्रम/प्रवचनादि धंदे चालतात त्यांचा सर्वात मोठा ग्राहक हाच समाज आहे, ही एक दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे धर्माचे गारुड जाता जात नाही.
धर्मनिष्ठा आणि धर्मभोळेपणा यातील सीमारेषाच पुसली गेली असल्याने असे घडते आहे हे खरे आहे. सत्ताधारी जातींच्या दडपनाखाली हजारो वर्ष जगत आल्याने त्यांच्याबद्दल नकळत एक भीति व न्युनगंडही या समाजाच्या मनात आहे. आजही गांवपातळीवर सरपंच ओबीसी जरी असला (आरक्षनामुळे नाईलाजाने द्यावी लागते) तरी अंतिम शब्द हा मराठा नेत्रुत्वाचाच असतो, हेही एक वास्तव आहे. याचे कारण म्हणजे सत्तेचे पदर असंख्य बनले आहेत. समजा गांवात एखाद्याला पतसंस्थेतुन कर्ज हवे असेल तर तो कदापि मराठ्यांना दुखवु शकत नाही...कारण बव्हंशी पतसंस्था त्यांच्याच ताब्यात. तीच बाब शिक्षणसंस्थांची. याबाबतचे विवेचन मी पुढे स्वतंत्रपणे करनारच असल्याने येथे एवढे पुरे.
थोडक्यात लोकशाही दुरच आहे. मतदार होण्यापुरतीच एकतर्फी लोकशाही आहे. लोकशाही प्रक्रियेत अपवादात्मक परिस्थिती असल्याखेरीज त्याला शिरकावच नाही. ही अपवादात्मक परिस्थिती काही संख्येने मोठ्या असलेल्या जातींपुरतीच मर्यादित आहे. ती संधी दिली जाते तीही त्या-त्या जातीची स्वतंत्र व्होट ब्यंक तयार करण्यासाठी. "ओबीसी चेहरा" फक्त नांवालाच राहतो...व तोही एवढा पुसटुन टाकला जातो कि जणु तो कधी नव्हताच!
म्हणजेच, पुर्वी जे सरंजामदार होते, सरदार होते, सत्तांचे चालक होते त्यांनी लोकशाहीचा अन्वयार्थ आपल्या पद्धतीने लावुन घेत लोकशाहीच्याच माध्यमातुन नवी सरंजामदारी आणली आहे व तिच्या बेड्या घट्ट करत आणल्या आहेत. आज धर्मसत्ता (तिचे गारुड असले तरी) दुर्बल झाली आहे. कोणताही नवा धर्मनियम काढत जनतेला ठकवण्याची शक्ती हरपुन बसली आहे. काही विद्वान आजही जनतेची दिशाभुल करणारी अनैतिहासिक वक्तव्ये/लेखने करत असले तरी त्यांना उत्तरे देवु शकण्याइतपत व त्यातील दंभ समजावुन घेण्याइतपत आजची पीढी शिक्षित व विचारी झालेली आहे. जातीयवादी पक्षांनी काहीकाळ धुमाकुळ घातला असला तरी त्या पक्षांना फारसे भविष्य उरलेले नाही. भविष्यात धर्माचे गारुड उतरेल अशी आशा वाटण्याइतपत वातावरण बनते आहे.
पण प्राचीन काळापासुन सत्ताधारी असलेल्या सत्ताधारी समाजाचे राजकीय व सामाजिक विषमता वाढवणारे हे नवसरंजामदारांचे वर्तुळ निर्भय होत कसे भेदायचे हेच अखिल समाजासमोरील मोठे आव्हान आहे!

Wednesday, February 22, 2012

...कि ओबीसींचा प्रबळ राजकीय पक्ष नाही म्हणुन? (लेख ३)

खालील प्रतिक्रिया ही श्री मिलिंद यांनी माझ्या "ओबीसींची ससेहोलपट किती काळ?" या लेखावर दिली होती. त्यांच्या या अभ्यासपुर्ण प्रतिक्रियेबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्या या प्रतिक्रित उपस्थित झालेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने या लेखात चर्चा करण्याचा प्रयत्न आहे. त्यांची प्रतिक्रिया खालीलप्रमाणे आहे...

"Sanjay Ji, may be some introspection is needed by the OBC leadership. In Maharashtra the obc leadership consists of people with suspect credibility. And when pushed to corner, they have resorted to castism in past. Whereas in states like Bihar and Gujrath, both Nitish and Narendra Modi belong to OBC castes. Even in UP the top two parties are Yadav (OBC?) and dalit parties. But they have emerged as credible leaders ,who are taking along the entire society with them. That comes with self assurance ,something which is missing in the Maharashtrian OBC leadership. Their political posturing has remained opportunistic than principled. And yes the same can be said about the present upper caste leadership but they at least pretend(?) to take the entire society with them. Taking India forward and making it a caste less society is a huge task and all of us should come together to make it happen. Meanwhile we need a strong leader who will reach out to everyone. I'm a Brahmin /Maratha (By birth which is beyond my control) by caste and I want a leader who will not look at me with the prejudice ,and rather look at me as a fellow Indian/Maharashtrian. I don't care about his caste. Caste politics ultimately presents very complex problems. It turns the voters into narrow castists. So while they will vote for an OBC leader of different caste, will switch the votes to a person of their own caste as soon as they get that option. And as you have mentioned, many vested interests start demanding OBC status for economic and political gains. And while they want the OBC status for material gains ,in reality they get to have the cake and eat it too. We will not get a leader like Babasaheb Ambedkar very easily. But we have intellectuals like you who can become the collective torch bearers and guide us in our collective struggle towards equality. My two cents."

श्री मिलिंद यांनी त्यांच्या प्रतिक्रियेच्या पहिल्या भागात महाराष्ट्रातील ओबीसी नेते मोदी, नितिश वा लालुप्रसाद यादवांप्रमाणे जनतेची विश्वासार्हता का कमवु शकलेले नाहीत असा प्रश्न उपस्थित केला आहे. प्रथम आपण त्यावर विचार करुयात.
लालुप्रसाद यादव यांचा स्वत:चा राजकीय पक्ष आहे. आणीबाणीच्या काळात, त्याविरोधात, जयप्रकाश नारायण यांच्यासोबत त्यांनी जे कार्य केले त्यामुळे त्यांना अभुतपुर्व लोकप्रियता लाभली...आणि तिचा फायदा त्यांना त्यांचा पक्ष विस्तारित करण्यात व सत्तेवरही नेण्यात यशस्वी झाला. रा,ज.द. हा त्यांनी स्थापन केलेला पक्ष. आता या पक्षाची पीछेहाट झाली असली तरी हे एक प्रभावशाली राजकीय नेत्रुत्व आहे. (यादव/अहिर हे ओबीसींत येतात.)
नितिशकुमारही जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनात सक्रिय सहभागी होते. सर्वप्रथम ते १९८० साली अपक्ष म्हणुन उभे राहिले, परंतु त्यांच्याच जातीच्या बाहुबलीने त्यांचा पराभव केला. २००३ साली त्यांनीही जनता दल (युनायटेड) हा पक्ष स्थापन केला आणि २००५ पासुन ते सत्तेत आहेत.
नरेंद्र मोदी हे भारतातील जसे अत्यंत कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणुन ओळखले जातात तसेच ते वादग्रस्तही आहेत. तसे असले तरी राष्ट्रीय पातळीवर मात्र त्यांना (लालु वा नितिश मिळवु शकले तशी) संधी मिळालेली नाही. किंबहुना कोणताही नेता डोइजड होवु नये याची काळजी व्यवस्थित घेतली जात असते, जशी महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांबाबत घेतली जाते.
आता ही तीन उदाहरणे घेत (तशी अनेक आहेत.) तुलना केली तर असे लक्षात येईल कि ज्या ओबीसी नेत्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करत विविध ओबीसी, दलित व ब्राह्मण यांची सुयोग्य सांगड घातली त्यांना सत्तेत येता तर आलेच पण ओबीसी समाजांतील असंख्यांना प्रतिनिधित्व करण्याच्या संध्या मिळाल्या. कार्यक्षमताही दाखवण्याची संधी मिळाली. मोदींनी आपण विकासाचे राजकारण कसे करु शकतो (गुजरात वांशिक दंगलींचा भागही आहेच...त्याबाबत मी मोदींचा नेहमीच निषेध करत आलो आहे.) हे मात्र सिद्ध करुन दाखवले आहे.
या पार्श्वभुमीवर आपण आता महाराष्ट्राचा विचार करुयात. महाराष्ट्रात मंडल आयोगाची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर मात्र तत्पुर्वी जी स्थाने ओबीसींना, अगदी मुख्यमंत्रीपदेही दिली जात, ती मात्र सर्वस्वी बंद झाली. मंडल आयोगामुळे ओबीसींचे प्रतिनिधित्व वाढण्या ऐवजी घटवण्यातच आलेले स्पष्ट दिसते. याचा अर्थ लक्षात घ्यायला हवा. मंडल आयोगाला मराठा समाजाचा पराकोटीचा विरोध होता. तो लागु झाला तर त्याचे परिणाम म्हणजे ओबीसींना सत्तेत अधिक वाटा द्यावा लागेल हे लक्षात आल्यानंतर त्यांनी जी योजना राबवली त्याची परिणती म्हणजे ओबीसींना पद्धतशीरपणे सत्तेच्या शर्यतीतुन बाजुला सारण्यात आले. ओबीसी नेतुत्वे गौण करणे, नव्यांना उभारु न देणे अशी जी छुपी योजना राबवली गेली तिचे दु:ष्परिणाम आता ठळक होवु लागले आहेत.
मुंढे व भुजबळ या बलाढ्य ओबीसी नेत्यांची मजल अधिकाधिक उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचु शकली आहे, वा त्यांना तेथेच रोखत पुन्हा त्यांची गच्छंती केली गेली आहे. मुंढे हे भाजपचे राष्ट्रीय महासचीव व खासदार असले तरी केंद्रिय मंत्रीपदापर्यंत जाणे शक्य झाले नाही...अर्थात त्यांच्या पक्षानेही तसा पर्फोर्मन्स नंतर दाखवलेला नाही, पण समजा भाजप सत्तेत आली असती तर मुंढेंना मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळाले असते काय, हाही एक प्रश्नच आहे. अलीकडे भुजबळांना अकारण उप-मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडले गेले तर मुंढेंवर पक्षत्याग करण्याइतपत अवमानास्पद वेळ आणली गेली होती. दोन्ही नेत्यांनी निमुटपणे अपमान गिळले आणि आहे त्यात समाधान मानुन घेतले. त्यासाठी अन्य ओबीसी घटकांनी जो आवाज उठवायला हवा होता...वा या आताच्या निवडनुकांत मतपेटीतुन जो रोष व प्रतिसाद द्यायला हवा होता तो तसा दिलेला नाही.
याचा अर्थ त्यांची विश्वासार्हता कमी झाली असा मी घेत नसुन जाणीवपुर्वक त्यांचे स्थान डळमळीत करत आपल्या अंकुशाखाली ठेवण्याच्या प्रयत्नांचे हे फलित आहे. पण याचीही कारणमिमांसा केलीच पाहिजे.
आपण नितिश-लालु-मुलायमबाबत जे पाहिले ते हे कि त्यांचा स्वत:चा पक्ष आहे. भले युती करुन का होईना सत्ता स्थापन करण्याचा मार्ग त्यांना खुला आहे. कोणाला उमेदवारी द्यायची आणि कोनाला नाही हेही ठरवण्याचा त्यांचा अधिकार आहे. मायावतींबाबतही अगदी असेच म्हणता येईल. सोशल इंजिनियरिंग त्या यशस्वीपणे करु शकल्या कारण त्यांचा स्वत:चा पक्ष आहे.
पण महाराष्ट्रात श्री. महादेव जानकरांचा "राष्ट्रीय समाज पक्ष" सोडला तर ओबीसी नेत्यांनी सर्वांसाठी म्हणुन स्थापिलेला असा एकही पक्ष नाही. जानकर हे उच्च विद्याभुषित असले, तरुण व नि:स्प्रुह असले तरी त्यांच्या मागे अद्याप धन व कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ व राज्यव्यापी संघटन उभे रहायचे आहे. उपद्रवी मुल्याचा अभाव आणि प्रसार माध्यमांपासुन घेतलेली फारकत यामुळे ते फारसे प्रसिद्धीतही नसतात..पण ग्रामीण भागात पक्ष उभारणीचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु असले तरी त्यांना अद्याप खुप मोठी मजल मारायची आहे.
मुंढे व भुजबळ यांची राजकीय शक्ती तुलनेने मोठी आहे. परंतु ते उच्चवर्णीयांच्या पक्षाचे पाईक आहेत. त्यांचे महत्व घटवण्यासाठी वारंवार कुटील डावपेच आखले जातात आणि नेमका हा तिढा अन्य ओबीसींच्या लक्षात येत नसल्याने ते अपप्रचारांनाच बळी पडतात व आपल्याच नेत्यांना एक प्रकारे तोंडघशी पाडतात हेही एक वास्तव आहे. खरे तर भुजबळ आणि मुंढेंनी जेथे जेथे शक्य झाले आहे तेथे ओबीसींचे संघटन करण्याचाच प्रयत्न केला आहे. भुजबळांनी अनेक राज्यांत अवाढव्य ओबीसी मेळावे घेवुन यशस्वी केले आहेत. ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेची मागणी मान्य करुन घेणे हे भुजबळ, मुंढे व लालुंचेही एक यश आहे. पण तरी स्वतंत्र राजकीय पक्ष काढण्याइतपत व त्यासाठी एकत्र येण्याइतपत त्यांची (मुंढे-भुजबळ) रणनीति सध्या तरी दिसुन येत नाही.... भविष्यात असे घडु शकणारच नाही असे नाही, परंतु त्यासाठी मुळात ओबीसींमद्धेच राजकीय आकांक्षा निर्माण करण्यासाठी जी व्यापक जनजाग्रुती करावी लागणार आहे तिचा अजुन तरी अभाव आहे.
श्री. मिलिंद यांनी "सर्वांना बरोबर घेवुन जाणा-या" नेत्रुत्वाची अपेक्षा केली आहे. ती अत्यंत रास्त अशीच आहे. किंबहुना एकाच कोणत्याही जातीच्या हाती सत्ता एकवटणे हे लोकशाहीला मारकच आहे व त्याचे दु:ष्परिणाम आपण सध्या पहातच आहोत. जाता जाता एक गोष्ट सांगतो... जानकरांनी त्यांच्या पक्षाच्य तिकिटावर एका मराठ्याला आमदारकीवर निवडुन आणले...निवडुन येताच त्या पट्ठ्याने राष्ट्रवादीमद्ध्ये प्रवेश केला, हेही येथे नमुद करुन ठेवतो. वळचळणीचे पाणी शेवटी कोठे जाते हे आता वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.
मुद्दा असा कि महाराष्ट्रातील ओबीसींना तारणासाठी ओबीसींच्या पक्षाची गरज आहे. महाराष्ट्रात ओबीसींमद्ध्ये आज जवळपास सव्वा चारशी जाती सामाविष्ट आहेत. ही मोठी जाती संख्या ऐक्याच्या मार्गातील अडथळा आहे असे वरकरणी जाणवु शकते, परंतु या सर्वांत एक अत्यंत महत्वाचा समान धागा आहे व तो म्हणजे हे सारे निर्माणकर्ते आहेत. त्यांची आर्थिक व सामाजिक अवस्था जवळपास समान आहे. अत्यंत हलाखी व भवितव्याचा आणि अस्तित्वाचा प्रश्न यात समानता आहे. हे सारेच एक समान इतिहासाचे व संस्क्रुतीचे नुसते भागिदारच नव्हे तर मुळचे निर्माते आहेत.
त्यामुळे ओबीसींचाही सर्वांसाठीचा पक्ष असणे व तो यशस्वी होणे अशक्य नाही. हे शिवधनुष्य समविचारी लोकांना पेलावेच लागणार आहे. जानकरांनी तशी सुरुवात केलीच आहे. पण राजकीय व सामाजिक स्वातंत्र्याची चळवळ अत्यंत व्यापक करत नेत ओबीसी ऐक्य साधावेच लागणार आहे. सर्वाधिक सव्वाचारशे जातींचा पक्ष असला तर तो ख-या अर्थाने प्रतिनिधिक, लोकशाही मुल्ल्यांना बळ देणारा आणि जो खरा मुख्य प्रवाह आहे त्याला सत्तेत घेवुन जावु शकेल.
सध्याचे पक्ष हे विशिष्ट जातींच्या सर्वोच्च नेत्रुत्वाखाली असल्याने त्यांच्याकडुन तशी समान न्यायाची अपेक्षा बाळगणे हेच मुळात चुकीचे व अव्यवहार्य आहे. "आपलीच जात एकमेव सर्व-सत्ताधीश" रहावी असे त्यांना वाटत असेल व ते तसा प्रयत्न करत असतील तर त्यांना फारसा दोष देता येत नाही. एकाच जातीच्या हाती सत्ताकेंद्रे एकवटली तर त्याचे भविष्यात काय दुष्परिनाम होनार आहेत, व त्यांनाही अंतत: फटकाच बसणार याची त्यांना जाणीवही नाही आणि करुन घेण्याची इच्छा आहे असेही दिसत नाही. अन्यथा ओबीसींच्या जागा बोगस कुणबी सर्टिफिकेट्स पेश करत त्यांनी का गिळल्या असत्या? भुजबळांनी याबाबत आवाज उठवला होता व "बोगस कुणबी उमेदवारांना मते देवु नका" असे जाहीर आवाहन केले होते. त्यांचे नाशिकला पानिपत का केले गेले याचे मुळ या आवाहनात होते हेही येथे लक्षात घ्यायला हवे. थोडक्यात सत्ताकेंद्रांचा हव्यास हा असा आहे आणि तो दिवसेंदिवस ओबीसींना खड्ड्यात नेणार हे स्पष्ट दिसत आहे.
पुर्वग्रहदुषित नजरेने ही मंडळी अन्य सर्वच (ब्राह्मणांसहित ते दलितांपर्यंत) जातींकडे पाहते हे एक वास्तव आहे. पुण्यात या वेळीस अत्यंत कर्तबगार अशा श्याम देशपांडेंसारख्या उमेदवाराला क्रोस वोटींग करत पाडले गेले. सर्वच राजकीय पक्षांनी दलितांचा फक्त उपयोगच करुन घेतला आहे, प[अण त्यांच्यही तोंडाला पानेच पुसलेली आहेत व वर त्यांच्यातच फुट आहे असा आक्रोश करणारेही हेच आहे...पण ही फोडाफोडीची नीति कशी राबवली गेली आहे व त्यामागे कोनत्या शक्ती आहेत हे तपासले तर धक्कादायक नि:ष्कर्ष बाहेर येतात. ब्राह्मणांनाही आम्ही संधी देतो असे दाखवत मोरेश्वर घैसासांच्या पत्नीला तिकिट दिले पण तेही फक्त पाडण्यासाठीच. मोरेश्वर घैसास गुरुजी हे माझे पुण्यातील एक नावडते व्यक्तिमत्व आहे हेही मी येथे नमुद करतो...पण अशा राजकीय खेळ्या किती घ्रुणास्पद बनल्या आहेत हेही येथे लक्षात घ्यावे लागते.
त्यामुळे जातीय पुर्वग्रह नाही, कर्तबगारालाच संधी, व्यापक विचार, नेत्रुत्त्वाचे विकेंद्रीकरण व पुरेसे स्वातंत्र्य अशा काही घटकांधारित पक्ष असने ही ओबीसींची खरी गरज आहे असे मला वाटते. आहेत ते पक्ष ओबीसींना न्याय देवु शकत नाही आणि ओबीसींनी भिकारी होत लाचार होण्याची, अवमानास्पद राजकीय जीवन जगण्याची आवश्यकता नाही असे मला स्पष्टपणे म्हणावेसे वाटते.
महाराष्ट्रात मराठा ही जात प्रामुख्याने सत्ताधारी असल्याने त्यांचा अनिवार्यपणे स्पष्ट उल्लेख करावा लागत आहे. परंतु खुद्द या समाजाच्या नेत्यांनी ओबीसी सोडा पण आपल्याही बहुसंख्य समाजाचेही वाटोळेच केले असल्याचे दिसुन येते. ठराविक घराणीच सत्तेत असुन आपल्या भावी पीढ्यांची राजकीय व अर्थिक बेगमी करण्यातच ते धन्यता मानतात हेही एक वास्तव आहे. स्वकियांनाही प्रसंगी चिरडु शकणारे ते ज्यांना कसलाही आवाजच नाही, जे मुक आहेत...त्यांचे ते काय करु शकतात याची एवढी उदाहरणे आहेत कि एक वेगळा ग्रंथच लिहावा लागेल. त्यामुळे येथे "मराठा" हा शब्द जेथेही मी टीकेसाठी वापरत आहे त्याचा अर्थ "सत्तेत असनारे, सत्तेत अन्य कोणालाही प्रवेशु न देण्यासाठी वाट्टेल त्या स्तरावर उतरणारे सत्ताभिलाशी मराठे" असाच अर्थ घ्यावा. ही नव-सरंजामदार शाही लोकशाहीचा गळा घोटत आहे हे सर्वांनीच लक्षात घेणे आवश्यक आहे.
मिलिंदजींचे मी पुन्हा आभार मानतो व त्यांच्या वरील लेखावर प्रतिक्रियेची वाट पहातो.

Monday, February 20, 2012

ओबीसी संख्येत ५२%...सत्तेत...? (लेख २)

ओबीसींची ससेहोलपट किती काळ? या माझ्या लेखावर प्रसिद्ध पत्रकार श्री. सुर्यकांत पळसकर यांनी खालील अत्यंत महत्वाची प्रतिक्रिया नोंदवलेली आहे व त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर चर्चा होणे आवश्यक आहे. त्यांची संपुर्ण प्रतिक्रिया मी येथे आधी देत आहे. या लेखात त्याधारितच चर्चा करणार आहे...

"मा. श्री. संजय सोनवणी साहेब,
मी तुमचा ब्लॉग नियमित वाचतो. तुमचा अभ्यास दांडगा आहे, हे लेखांवरून स्पष्टच दिसते. ओबीसींबाबत तुम्ही व्यक्त केलेली खंत योग्यच आहे. विशेषत: बोगस जात प्रमाणपत्रांचा मुद्दा फारच गंभीर आहे. तथापि, आपले हे विश्लेषण बरेचसे मोघम झाले आहे. स्थळ-काळ आणि व्यक्तींचे संदर्भ दिले असते, तर मोघमपणाचा दोष टाळता आला असता. तसेच अनुत्तरीत राहिलेल्या काही प्रश्नांची उत्तरेही कदाचित मिळाली असती.

ओबीसींचा जो आकडा तुम्ही सांगता आहात तो पचायला जरा जड जातोय. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ओबीसींचा आकडा खरोखरच ५२ टक्के असेल, तर ओबीसी नेत्यांना कोणाच्या आधाराची गरजच काय? त्यांची एकहाती सत्ता राज्यात यायला हवी. पण परवाच्या निवडणुकांत दिसलेली वस्तुस्थिती फार वेगळी आहे. छगन भुजबळांचा नाशिक जिल्ह्यात धुव्वा उडाला आहे. गोपीनाथ मुंडे यांना बीडमध्ये फार चमत्कार दाखविता आलेला नाही. भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद भूषविणारे गोपीनाथ मुंडे परळीसारख्या एका तालुक्यात अडकून पडले होते.

५२ टक्के लोकसंख्या असूनही जर ओबीसींना सत्ता मिळविता येत नसेल, तर त्याचे अनेक अर्थ निघतील. तुमचा लेख वाचून माझ्यातील पत्रकाराला अनेक शक्यता दिसल्या. त्या पुढे थोडक्यात देत आहे.

१- ओबीसी समाजाला सत्तेत रस नसावा.
२- सत्ता हाती घेण्यापेक्षा ओबीसी जनतेला आपल्याच नेत्यांचा पराभव करून त्यांची मानहानी करण्यात जास्त रस असावा.
३- सत्तेत रस आहे, पण सत्ता हाती कशी घ्यायचे याचे ज्ञान त्यांना नसावे.
४- सत्ता ताब्यात घेण्याएवढे संख्याबळच ओबीसी समाजाकडे नसावे.
५- सत्ता ताब्यात घेण्याजोगे संख्याबळ असले तरी, ओबीसी समाज उदार अंत:करणाने दुसèया जातीच्या हाती सत्ता सोपवित असावा.
६- ओबीसी समाजाचा कोणी तरी बुद्धिभेद करीत असावे. त्यामुळे त्यांना सत्ता ताब्यात घेणे जमत नसावे.

आणखीही अनेक शक्यता वर्तविता येतील. पण नमुना म्हणून एवढेच पुरे.
बोगस प्रमाणपत्रे घेऊन निवडणुक लढविणे हे पापच आहे. पण, येथे प्रश्न फक्त बोगस प्रमाणपत्राचा नाही. प्रश्न आहे संख्याबळाचा. बोगस प्रमाणपत्र घेणाèया उमेदवाराचा संख्याबळाच्या आधारे सहज पराभव करता येतो. झेडपी, पंचायत समित्या, qकवा नगरपालिका निवडणुकीचे क्षेत्र फार मोठे नसते. सर्व जण उमेदवारांना नावनिशी ओळखत असतात. हा प्रश्नांचा तिढा कसा सोडवायचा? तसेच, संख्याबळ असतानाही भुजबळ, मुंडेसारख्या नेत्यांना अपमानित करण्यामागील ओबीसी जनतेचा हेतू काय, हेही येथे अस्पष्टच राहते. आपण मोघम न लिहिता स्थळ-काळ आणि व्यक्तिनामासह विश्लेषण केले असते, तर या प्रश्नांची उत्तरे कदाचित मिळू शकली असती.

लोकशाहीत ताकद असतानाही कोणी सत्ता ताब्यात घेत नाही, इतकेच नव्हे तर दुसèया कोणाच्या तरी हाती सत्ता सोपवून दिले जाते, हे मनाला पटवून घेताना जरा जड वाटतेय. काही तरी चुकते आहे खास. काय चुकते आहे?"


ओबीसींची टक्केवारी:

ओबीसींचा आकडा ५२% आहे व ही टक्केवारी मंडल कमिशनच्या अहवालावरुन घेतली गेलेली आहे. आता जातनिहाय जनगणना होत असल्याने, व दरम्यानच्या काळात त्यात काही जातींचा समावेश करण्यात आला असल्याने या टक्केवारीत अधिकची भर पडण्याचीच शक्यता आहे. जातनिहाय जनगणनेला अनेक नेत्यांनी व राजकीय पक्षांनी विरोध केला असला तरी संसदेत श्री समीर भुजबळ व श्री गोपिनाथ मुंढे, लालुप्रसाद यादव आदिंच्या आग्रहाने या वेळीस जातीनिहाय जनगणना होत आहे. प्रसिद्ध विचारवंत प्रा. हरि नरके यांनी या मागणीला अनेक लेख लिहित सैद्धांतिक व वैचारिक बळ पुरवले हेही येथे लक्षात घ्यायला हवे.
या जातनिहाय जनगणनेला विरोधाचे मुख्य कारण हेच होते कि ओबीसींना आपली खरी संख्या समजली तर शक्तीही कळेल आणि कदाचित राजकीय समीकरणेही बदलतील. जातनिहाय जनगननेमुळे जातीयवाद वाढेल असा विरोधकांचा दावा होता, परंतु धर्मनिहाय जनगणना, जी आजवर होत आलीच आहे, तीमुळे जर धार्मिक तेढा निर्माण झाला नाही तर जातनिहाय जनगणनेमुळे जातीयवाद कसा वाढेल असे प्रतिपक्षाचे मत होते आणि तेच शेवटी ग्राह्य झाले.
त्यामुळे ओबीसींची संख्या ही लोकसंखेच्या प्रमाणात किमान ५२% आहे हे तर नक्कीच आहे. ओबीसींमद्धे हिंदु ओबीसीच नव्हेत तर मुस्लिम, ख्रिस्ती, जैन व शीख ओबीसीही आहेत हेही लक्षात घ्यायला हवे. सध्या ओबीसींना २७% एवढेच आरक्षण आहे व त्यातही क्रीमी लेयरची पाचर आहे. त्याचे दु:ष्परिणाम नेमके काय होत आहेत याबाबत स्वतंत्र लेखातच चर्चा करावे लागेल एवढा हा भाग व्यापक आहे.

५२% लोकसंख्या असुनही ओबीसींना सत्ता का मिळत नाही?

श्री. पळसकर साहेबांचा हा पहिला प्रश्न अत्यंत रास्त आहे. श्री. छगन भुजबळांचा महानगरपालिका निवडनुकांत नाशिकमद्धे धुव्वा उडाला असुन श्री. मुंढेही बीडमद्धे विशेष चमत्कार दाखवु शकलेले नाहीत हे श्री. पळसकर यांचे निरिक्षण योग्य असेच आहे. मुंढे राष्ट्रीय स्तरावरील नेते असुनही त्यांनी बीडमद्धेच का अडकुन पडावे हाही प्रश्न अत्यंत योग्यच आहे. या प्रश्नांचा वेध घेणे हे एक आव्हान आहे. पण आधी आपण यामागील कारणे तपासुन पाहुयात.
१. ओबीसी हा मुलचा निर्माणकर्ता समाजघटक होता. जीवनोपयोगी साधनांची निर्मिती करणे वा सेवा देणे हे त्याचे शतकानुशतके चरितार्थाचे साधन होते. गांवगाड्यात त्याला बलुत्यावर तर कुणब्यांना शेतमजुर ते पट्ट्याने (खंडाने) जमीनी कसुन उपजिविका करावी लागत असे. कुलकायद्यामुळे कुनब्यांची नांवे किमान सात-बा-यावर आली तरी, परंतु ओबीसींचा आर्थिक खात्मा तत्पुर्वीच झालेला होता. अठराव्या शतकापासुन सुरु झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे या वर्गाची गरजच जवळपास संपली. हस्तकौधल्ल्यावर आधारित असलेल्या बव्हंशी उद्योगांची वाट लागली. त्यामुळे जे आर्थिक संक्ट कोसळले त्यामुळे हा वर्ग उत्पन्नाची नवी साधने शोधण्यासाठी बाहेर पडला....मजुरी ते कामगार/हमाल/नोकर अशी नवी चरितार्थाची साधने त्याला शोधावी लागली. गायराने, चरावु कुरणांची संख्या कमी होत गेल्याने धनगर समाजाची वेगळीच ससेहोलपट सुरु झाली. परंपरागत माळीकाम करनारे अद्रुष्य होत नवीनच तंत्रे पुढे आल्याने त्यांचीही पीछेहाट होत गेली. याला अपवाद आहेत, पण अपवादानेच नियम सिद्ध होतो.
या सर्वाचा एकत्रीत परिणाम म्हनजे पोटाच्या प्रश्नाने भेडसावल्या गेलेल्या व नवीन अवस्थेशी जुळवुन घेण्याची कसरत करु लागलेल्या या समाजाला मुळात आत्मभानच आले नाही. त्यामुळे राजकीय आकांक्षा कोठुन येणार? आपण संख्येने किती आहोत, त्याचे राजकीय गणित काय असु शकते, राजकीय गणित साधले तर ओबीसींच्या सामाजिक व आर्थिक हितासाठी काय करता येणे शक्य आहे या जाणीवाच मुळात विकसीत झाल्या नाहीत.
अलीकडे (हा लेख मी महाराष्ट्रापुरता मर्यादित ठेवला आहे.) काही प्रमाणात जनजागरण सुरु झाले आहे. ते पुरेसे नसुन ते एका व्यापक चळवळीत बदलले पाहिजे हे खरेच आहे. मुंढे व भुजबळांची समस्या नेमकी वरील विवेचनात आहे. पण ती मी येथे अधिक स्पष्ट करतो.
मुंढे हे वंजारी समाजाचे असुन बीड भागात या समाजाचे प्रमाण मोठे आहे. मुंढेंना किमान त्यांच्या व अल्प प्रमानात अन्य ओबीसींचा पाठिंबा आहे. मागील विधानसभा निवडनुकीत "वाजवा तुतारी: हाकला वंजारी" अशा घोषणा राजरोसपणे दिल्या जात होत्या. मुंढे हे ओबीसींचे नेते नसुन वंजा-यांचेच आहेत कि काय असे चित्र राजकीय पक्षांनी तसेच माध्यमांनीही निर्माण केले आहे. व हे नेत्रुत्व पुन्हा बीजेपी सारख्या पक्षाशी निगडीत असल्याने परंपरागत कोंग्रेसी ओबीसी हा दुर राहतो हेही एक वास्तव आहे. (पण ते पक्षीय राजकारणात सर्वांनाच लागु आहे.) मुंढेंना बीड/परळीतच का अडकुन पडावे लागते याचे उत्तर त्यांना आपला मतदारसंघ सांभाळणे याचेच आव्हान जास्त मोठे आहे.
भुजबळांबाबत म्हणायचे तर नाशिकमधील पानिपत अपेक्षित असेच होते. ऐन निवडनुकीच्या तोंडावरच नव्हे तर त्याही आधीपासुन त्यांची अकारण पदावनती करत त्यांचे पंख कापायला सुरुवात झालेली होतीच. अत्यंत सक्रिय मराठा लोबीने भुजबळांना नाशिकात "त्यांची जागा" दाखवुन देण्यचा प्रयत्न केला. यशस्वीही झाले. यातुन लवकरच काहीतरी वेगळे निघेल असे दिसते. लोबीने (कोणत्याही पक्षातील असो.) तीच गेम मुंढेच्या बाबतीत केली...पक्षातील त्यांचे स्थान धोक्यात आनले गेले...त्यांच्याच घरात फोडाफोड करुन खेळली गेली. ओबीसी नेत्रुत्व शक्यतो निर्माण होवु द्यायचे नाही, झाल्यास त्यांना डोईजड होवु द्यायचे नाही हा खेळ महाराष्ट्रात कोणती सत्ताधारी जात खेळते आहे हे मी सांगण्याची आवश्यकता नाही...पक्ष कोणताही असो. माळ्यांच्या बाबतीत गेल्या विधानसभा निवडनुकीत...वाजवा टाळी...हाकला माळी" अशा घोषणा देण्यत येत होत्या हेही येथे लक्षात घेतले पाहिजे.
माळी-वंजारी यांबरोबरच विस्त्रुत मोठा असलेला समाज म्हणजे धनगर. या वर्गाला तर जवळपास शुन्य प्रतिनिधित्व आहे. महादेव जानकरांनी राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केला. शरद पवारांच्या विरोधात उभे राहुन लाखभर मते मिळवली. हे खरे असले तरी हा समाजही राजकारणात नगण्य आहे.
अशा स्थितीत जर माळी-वंजारी-धनगर हे लोकसंख्येने ओबीसींतील मोठे जातीघटक असतांना त्यांची ही अवस्था आहे तर शिंपी, सोनार, साळी, तेली, कोष्टी, धोबी, न्हावी, सुतार इ. ना कोण विचारतो? आणि ते कोणत्या बळावर राजकीय स्वप्ने पाहतील? या अन्य जातीयांची जातनिहाय संख्या अखिल महाराष्ट्रातच मुलात ५-१० लाखांवर नाही...त्यांची वोट ब्यंकच नाही...आणि सारे ओबीसी एक आहेत, सारेच एकाच समाजघटकातुन व्यवसायानुसार कालौघात वेगळे झाले आहेत...आता ते व्यवसाय उरलेले नाहीत...त्यामुळे पुन्हा एकत्र या असे सबळ आवाहन करत तात्विक पायावर त्यांना एकत्र आणेल असे नेत्रुत्व मुलात उपलब्ध नाही. श्री. महादेव जानकर हे एकमेव कि जे या दिशेने प्रयत्न करत आहेत...परंतु त्यांच्या प्रयत्नांना अजुन व्यापक रुप यायचे आहे आणि त्यासाठी सामाजिक पाठबळही उभे व्हायचे आहे. भुजबळांनी समता परिषदेच्या माध्यमातुन तसे प्रयत्न आधीच सुरु केले आहेत, परंतु त्याची फळे नाशिकात तरी त्यांना विशेष मिळालेली दिसत नाहीत. आणि जोवर फक्त "माळी" हा शिक्का आहे तोवर वेगळे काही होईल अशी शक्यता दिसत नाही.
याचा अर्थ श्री. पळसकर म्हनतात तसाच घ्यावा लागतो कि ओबीसींना आपल्याच नेत्यांना पाडन्यात आनंद वाटतो कि काय? त्यांचा कोणी बुद्धीभेद करतो कि काय? खरे आहे. ही कटु वस्तुस्थिती मान्य केलीच पाहिजे. लोकसंखेच्या प्रमाणात सत्ता हवी असेल तर ती माळी,धनगर, वंजारी आहे म्हणुन नव्हे तर "ओबीसी" आहे म्हणुनच मिळु शकते, विशिष्ट ओबीसी जातीचा म्हणुन नव्हे हे जोवर ओबीसींतील सर्वच जाती लक्षात घेत नाहीत, त्यांच्यात तेवढा विश्वास निर्माण केला जात नाही, त्यांना (ओबीसींतील सर्वच जातीयांना) कोणत्या ना कोनत्या प्रमानात, कोठेनाकोठे प्रतिनिधित्व मिळेल अशी खात्री देता येत नाही तोवर ओबीसी एकीकरण ही एक अवघड बाब आहे. परंतु ती अशक्य नाही. किंबहुना ती सुरुवात झालेलीही आहे, परंतु त्याची फळे दिसायला वाट पहावी लागेल.
माळी/वंजारी व धनगर असे शिक्के मारल्याने अन्य ओबीसींचा बुद्धीभेद होतो, किंबहुना तसा प्रचार करण्यामागे असा बुद्धीभेद करणे हेच कारण असते हेही एक वास्तव आहे. वंजारी पडला तर कोळ्याने का वाईट वाटुन घ्यायचे...धोबी उभा असेल तर मग पाडलाच पाहिजे अशी काहीशी मनोव्रुत्ती ओबीसींची आहे हे अमान्य करता येत नाही.
अन्य जातीयांना सत्ता देण्यात ओबीसींना रस आहे असे नसुन मुळात उमेदवार निवडीतच ओबीसींना फाटा दिला जातो. त्यामुळे मतदान तर होतेच...ज्यांना निवडुन यायचे ते येतात...फक्त त्यात ओबीसी नसतात...एवढेच! जेथे ओबीसी आरक्षण असते तेथे बोगस कुनबी असतातच...खटले भरले तरी त्याचा निकाल लागेपर्यंत टर्म संपलेली असते. मग ख-या ओबीसीने काय करायचे?
आणि हेच वास्तव आता ओबीसींना समजावुन घ्यावे लागणार आहे. समजवुन सांगावे लागणार आहे. या समाजाचे बहुसंख्य असुनही जे पराकोटीचे विभक्तिकरण झाले आहे त्यालाच आधी रोखत, समान सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय प्रश्नांसाठी तरी एकत्र यावे लागणार आहे. नाहीतर हा समाज गुलाम तर होताच...पुढे तो अशा गुलामीत जाईल कि कोणत्याही क्रांतीची संभावनाच संपुन जाईल.
चुकते आहे ते येथेच कि सकारात्मक शक्यताच हा समाज विसरला आहे. या चुका येथेच थांबत नाहीत तर त्यांची संख्या अजुन मोठी आहे...पण त्याबद्दल पुढे.
मी श्री. पळसकर साहेबांचा खुप आभारी आहे कि त्यांनी ही चर्चा पुढे न्यायला अनमोल मदत केली आहे. त्यांचेही या विवेचनावरील विचारांची प्रतिक्षा आहे.


Saturday, February 18, 2012

ओबीसींची ससेहोलपट किती काळ? (लेख १)

कोणत्याही राष्ट्रात जेंव्हा विशिष्ट वर्गाच्या/पंथाच्या वा जातीच्या हाती सत्ता एकवटु लागते तेंव्हा लोकशाहीच्याच मुलभुत संकल्पनेचा विध्वंस होत असतो. सत्तेचे विविध समाजघटकांत समान वितरण होणे हे खरे तर निकोप लोकशाहीला अभिप्रेत असते. ज्या समाजघटकांना सत्तेच्या प्रवाहात आणले जात नाही ते घटक लोकशाहीबाबत उदासीन होत जाणे हे जेवढे स्वाभाविक आहे तसेच कधी ना कधी त्या घटकांचा उद्रेक होणेही सहज स्वाभाविक आहे. भारतीय लोकशाही ही लोकशाही नसुन विशिष्ट सत्ताधारे जातींच्या, व त्यातही विशिष्ट कुटुंबांच्या हाती एकवटलेली सरंजामशाही आहे. येथील लोकशाही म्हणजे या सत्ताबाह्य समाजघटकांनी या जातीय सत्ताकेंद्रांना मते देण्याचा अधिकार असण्याबाबत अवशिष्ट उरलेली आहे, परंतु त्यांना सत्ताकेंद्रांत प्रवेशायची सहजी मुभा मात्र नाही.

ओबीसी (निर्माणकर्ता समाज) हा देशात जवळपास ५२% इतका आहे. हा समाज सर्वसमावेशक असुन या घटकात जैन, ख्रिस्ती ते मुस्लीमही आहेत. पुरातन काळापासुन मानवोपयोगी शोध लावत, त्यांचा व्यवसाय बनवत उद्योग व अर्थव्यवस्था याच घटकांनी सांभाळलेली आहे. महार/मातंगादि समाजघटकांचे सहाय्य या घटकाला झाले तसेच कथित उच्चवर्णीयांनाही झालेले आहे. परंतु जातीव्यवस्थेमुळे हे सरेच शुद्रातिशुद्रात परंपरेने टाकुन त्यांचे अपरिमित आर्थिक-सामाजिक शोषण केले. या शोषणात धर्मसत्ता जेवढ्या सामील होत्या त्यापेक्षा सत्ताधारी जातींचा वाटा मोठा होता. या निर्मानकर्त्या समाजाला अक्षरश: वेठीवर राबवले गेले. त्यांच्या निर्मितीचा/सेवांचा उचित मोबदला त्यांना दिलाच जात नव्हता. एकार्थाने ही राजकीय व धार्मिक गुलामगिरी होती.

स्वातंत्र्यानंतर तरी या परिस्थितीत बदल घडेल अशा अपेक्षा होत्या. घटनाकारांनी या घटकांना आरक्षणाची तरतुद केली याचे सर्वात महत्वाचे कारण व धोरण केवळ आर्थिक वा शैक्षणिक हे नसुन, ज्या समाजघटकांना पुरेसे राजकीय प्रतिनिधित्व नाही ते मिळवुन देणे असे होते. कारण देशातील या जवळपास ७०-७५% मानवी समुदायांना सत्तेत किमान एक हजार वर्ष सहभाग मिळाला नव्हता. मिळण्याची शक्यताही नव्हती. लोकशाहीचे मुलतत्व म्हणजे सर्वच समाजघटकांना राजकीय प्रवाहात सामील करुण घेणे. त्याशिवाय लोकशाही ख-या अर्थाने लोकांची कशी बनु शकेल? संसद ही ख-या अर्थाने संपुर्ण देशाचे प्रतिनिधित्व करत आहे असे चित्र कसे दिसेल?

परंतु दुर्दैवाने, या विराट समाजांच्या हाती अवघी १५-२०% एवढेच प्रतिनिधित्व आहे व तेही नाईलाजाने द्यावे लागते म्हणुन. अन्य जागा सत्ताधारी जातींकडुन दडपशाहीने, प्रसंगी खोटेपणा करत, लबाड्या करत लुबाडल्या जात आहेत. महाराष्ट्रातील चित्र तर भिषण असेच आहे. जवळपास ७०% सत्ताकेंद्रे ही एकाच सत्ताधारी जातीच्या हातात आहेत. ओबीसींच्या राखीव जागांवर बोगस कुणबी उभे केले जात आहेत. त्यांनी बहुदा क्रमश: ओबीसींना राजकारणातुन बाहेर फेकुन देत पुरेपुर गुलाम बनवण्याचा चंग बांधला आहे हे उघड आहे. जेथे ते बोगसपना करु शकत नाहीत तेथे अन्यांना तुकडे फेकावे तशी काही दुय्यम/तिय्यम दर्जाची केंद्रे दिली जातात हे खरे आहे, परंतु त्यांना अंतत: याच जातीच्या हुकुमशाहीसमोर वारंवार मान तुकवावी लागते. लाचार व्हावे लागते. स्वतंत्र आवाज उठवला कि त्यांचे पंख कापले जातात. संपवले जाते. राजकारणातुन/समाजकारणातुन उठवण्याचा प्रयत्न होतो. महाराष्ट्राने अलिकडेच काही घटनांतुन हे चित्र पाहिले आहे, त्यामुळे मी यावर अधिक भाष्य करत नाही.

राजकीय पक्ष हेच मुळात बव्हंशी उच्चवर्णीय स्थापित असल्याने व त्यांना बदलाची मुळात गरजच भासत नसल्याने ते या घटकांना समतेच्या सिद्धांतावर विश्वास ठेवुन न्याय्य वाटा देतील ही अपेक्षाच आता निरर्थक अशी बनली आहे. "वापर करुन घेणे, स्वार्थ साधुन घेणे आणि मग पायतळी तुडवणे." हा सिद्धांत अक्षरशा अंमलात आणला जात आहे. छॊटे पक्ष अथवा गट अनेक असले तरी ते स्वबळावर या धनदांडग्यांशी लढत देवु शकत नाहीत. यामुळे या सर्वच समाजघटकाची अक्षरशा: ससेहोलपट होते आहे.

स्थिती ही मी सांगतो त्याहीपेक्षा गंभीर आहे. त्याचे भावी परिनाम हे देशाच्या लोकशाहीच्या अंतात परिवर्तीत होणार आहेत. या सत्ताधा-यांना अजुनही लोकशाहीची चाड येणार नसेल तर त्यांच्यावर समुळ बहिष्कार घालने ओबीसी व अन्य शोषित घटकांना भाग पडणार आहे. रस्त्यावर उतरावे लागणार आहे. कारण नव्या गुलामीत जाण्याची आता कोणाचीही तयारी नाही. आणि ही गुलामी आता जवळपास आलेलीच आहे.

विशिष्ट वर्गाच्या हाती सत्ता एकवटने हे कोनत्या भिषण परिणामांकडे नेईल यावर आत्ताच विचारमंथन करत जाग्रुती करावी लागणार आहे. एकीकडे सत्ता हाती असल्याने त्यांचे नुसते अर्थकारनच वेगळे बनले आहे असे नसुन प्रशासन/पोलिस/ न्याय/ माध्यमे त्यांच्या दावनीला बांधली गेली आहेत. पक्ष वेगळे असले तरी त्यांचे अंतर्गत सुत्र एकच आहे ते म्हनजे सत्ता एककेंद्रित राहिली पाहिजे. अणि असे धोरण हे मुलत लोकशाहीविरोधी जसे आहे तसेच राष्ट्रद्रोहीही आहे हे समजुन घ्यायला हवे.

ओबीसींना व अन्य शोषितांना जर आताच जाग आली नाही तर भावी पिढ्या त्यांना कधीही माफ करणार नाहीत. राष्ट्रनिर्माणाचे कार्य कधीही होनार नाही...फक्त जीवनभर घोटाळ्यांच्या याद्या वाचत बसावे लागेल.

एके काळी याच समाजघटकांनी संस्क्रुती घडवली, अर्थव्यवस्था घडवली, जग अचंबित होईल असे भव्यदिव्य निर्माण केले, व्यापाराच्या निमित्ताने जग जवळ आनले, जगचे पोट भरले...आजही भरतो आहे...तो आज मात्र हीण-दीन आहे. भिकारी आहे...लाचार आहे. आपले आत्मभान हरपुन बसला आहे, विसरुन बसला आहे. कारण त्यांनी लोकशाहीचे मर्म आणि वर्म ओळखले नाही, म्हणुनच धनदांडगे सत्ताधारी जमातीतील लोक त्यांचा न्याय्य वाटाही राजरोसपणे लुटत चालले आहेत. ही लोकशाहीची लुट आहे. लोकशाहीवरचा बलात्कार आहे. हे राज्य लोकांचे लोकांसाठी नसुन विशिष्ट जातीचे त्या जातीसाठीच आहे आणि दिली तर थोडीफार भीक आहे.

भिकारी बनायचे कि आपले आत्मभान जागे करत समानतेच्या पायावर आपले हक्क मिलवायचे यावर आता गंभीर विचार करण्याची आवश्यकता आहे.

Friday, February 10, 2012

आता तरी जागे होणार आहात काय?

धर्म-जात-प्रांत-वंश या आधारावर संघटना बांधणे सोपे जाते हे मी आधीच्या अनेक लेखांत म्हटलेच आहे. अन्य जातीय, धर्मीय, प्रांतीय वा वंशांचा द्वेष हा मुलभुत पाया असल्याखेरीज संघटन करणे सहसा सोपे जात नाही आणि ज्यांना दीर्घकालीक धोरणच नसते वा पुरेसा वैचारिक/सैद्धांतिक आधारच नसतो त्यांना द्वेषमुलक चळवळी उभ्या कराव्या लागतात. पण यातुन साध्य काय होते? नेमके काय घडते?
१. हिटलरी पद्धतीने एकचालुकानुवर्ती संघटन निर्माण होत चळवळीचा प्रवास बहुदिश न होता एक-दिश होवुन जातो.
२. स्वजातीय/धर्मीय/प्रांतीय/वंशीय पुरातन असलेले-नसलेले महात्मे शोधुन काढले जातात, त्यांच्या दैवत्वीकरणाची प्रक्रिया सुरु होते आणि चिकित्सा नाकारली जाते. चिकित्सा करणारे या चळवळींचे शत्रु ठरवले जातात. प्रसंगी हिंसक होत वैचारिकतेला दडपले जाते.
३. इतिहासाला सोयिस्करपणे बदलले जाते. विरुद्ध पक्षीयांच्या दैवतांना हीनवत, चारित्र्याची मोडतोड करत स्व-जाती/धर्म/प्रंत/वंश अभिमान वाढवण्यासाठी अपार बौद्धिके घेतली जातात. "आपल्यावर अन्यांनी केवढा भीषण अत्त्याचार केला आहे" याचे कधी अतिरंजित तर कधी खोटे चित्रण केले जाते.
४. हे सारे करीत असतांना, चळवळीतील फौज वाढवली जाते परंतु या फौजेचा स्वता:चे डोके वापरण्याचा अधिकार हिरावून घेतला जातो. त्यांचे brain washing एवढे केले जाते कि ते सारासार विवेकी विचार करणेच विसरलेले असतात. थोडक्यात बौद्धिक क्लोन बनवले जातात.
५. शत्रु पक्षावर लिखित तर कधी हिंसक हल्ले करणे आणि दहशत माजवणे हेच एकमेव कार्य बनुन जाते. शत्रु पक्षीय संघटनाही प्रत्त्युत्तर म्हणुन हेच कार्य करत जातात आणि त्यातच अराजकाची बीजे पेरली गेलेली असतात हे कधीच या चळवळींच्या लक्षात येत नाही.
६. या चळवळी स्वर्थासाठी अन्य संघटनांशी प्रत्यक्ष वा वैचारिक युती करत असतात, जेथे समान स्वार्थाचे काही धागे गुंफले गेलेले असतात. उदा. बौद्ध, जैन व शिख धर्म हे हिंदु धर्माचेच भाग आहेत असे आर.एस.एस. वाले सांगत एक क्रुत्रीम नाळ बांधायचा प्रयत्न करतात...दुसरे तर दलित आणि मराठे हे नागवंशीयच असल्याने एकच आहेत असा प्रचार करु लागतात. ऐतिहासिक वास्तव आणि वर्तमान यांचे धागे विक्रुत पद्धतीने उसवत तर्कविसंगत तत्वप्रणाल्या निर्माण केल्या जातात ज्या एकुणातीलच सर्व समाजाला घातक ठरत जातात. ऐक्य करणे हे स्वागतार्ह आहे...पण त्यासाठी चुकीचे तत्वद्न्यान वापरणे हे विसंगत आहे. कारण ज्या कारणासाठी ऐक्य हवे त्यामागे जेंव्हा स्वार्थपिडित भावना असते तेंव्हा असे तत्वद्न्यान बाष्कळ बनुन जाते. "समान शत्रु शोधा आणि एकत्र या, त्यासाठी इतिहासाचा बळी द्या" असा हा धंदा यातुन सुरु होतो. हिटलरने आर्य सिद्धांत जमेस घेत ज्युंची सर्रास कत्तल केली. भारतात गुजरात मद्धे मुस्लिमांची कत्तल केली गेली. दलितांच्या असंख्यवेळा कत्तली होत आल्या आहेत. उद्या कधी भारतात ब्राह्मणांची कत्तल केली गेली तर आश्चर्य वाटणार नाही कारण अनेक ब्राह्मणद्वेषी संघटनांचा पवित्रा तोच आहे. द्वेषाचा विखार वीषवल्लीप्रमाणे वाढत जात असतो आणि त्याचे कधी विस्फोटात रुपांतर होईल हे कोणीही सांगु शकत नाही. ही द्वेषमुलक परंपरा बदलत मानव्यवादी भुमिकांत चळवळ जात नाही तोवर चळवळीच विनाशाप्रत पोहोचनार हे उघड आहे. हा द्वेष वरकरणी समाजात पसरवला गेला तरी अंतर्गत स्वहिते पाहनारे मात्र आतुन हातमिळवणी करुनच असतात असाही जगाचा इतिहास आहे. फसवणुक होते ती प्रामाणिक कार्यकर्त्यांची आणि समाजाची.

कोणत्याही समाजात जाग्रुत लोकांची, लेखक-पत्रकार-विचारवंतांची गरज असते. प्रसंगी अप्रिय होत सत्य सांगण्याचा प्रयत्न होण्याची गरज असते. पण असे लोक या सर्वच प्रकारच्या संघटनांना अडचणीचे ठरत असल्याने त्यांचे काटे काढले जातात हाही इतिहास आहे. किती विचारवंतांना तुरुंगात सडावे लागले आहे वा प्रसंगी त्यांना ठारही मारले गेले आहे. तरुणांना प्रश्न विचारायला प्रेरीत करतो म्हणुन सोक्क्रेटिसला विषाचा प्याला घ्यावा लागतो. कम्युनिस्ट रशियाने किती जणांना ठार मारले, हद्दपार केले वा सैबेरियात शिक्षा ठोठावत पशुवत जीवन जगायला भाग पाडले हे सर्वांना माहितच आहे. तालीबानी राजवटीत तर कहर झाला आहे. डा. आनंद यादवांना आपली कादंबरी मागे घ्यावे लावणारे, साहित्य सम्मेलनाचा राजिनामा द्यायला भाग पाडणारे तालीबानी आपल्या महाराष्ट्रात नाहीत कि काय? डा. कुमार केतकरांवर न्रुशंस हल्ला करणारे याच भुमीत नाहीत कि काय? वैचारिक स्वातंत्र्याची मुभा जेथे नाकारली जाते...तेथे लोकशाही नव्हे तर एक छुपी हुकुमशाही वावरत असते. किंबहुना जगाचा इतिहास हा अशा क्रुरातिक्रुर हुकुमशाही घटनांनी भरला आहे. आजही स्वत:ला आधुनिक समजणारा मानव त्यातुन बोध घेवु शकलेला नाही हे जगाचेच दुर्दैव आहे.

खरे तर संघटना द्वेषविरहित प्रागतिक कार्य करु शकतात-रचनात्मक होवू शकतात. हा असा मार्ग थोडा प्रदिर्घ असेलही पण त्यातुन मानवी समुदायाचे प्रदिर्घकालीन हित होवु शकते. येथे मला महाभारत समाप्तिसमयी व्यासांनी केलेली आर्त विनंती आठवते ती: "उर्द्व बाहू विरोम्येश:: न:कशित श्रुणोति माम..." उर्ध्व बाहु उभारुन मी आक्रंदन करत आहे कि ज्यायोगे अर्थ, काम, मोक्ष साधला जाईल असा धर्म का आचरत नाही?" येथे धर्म हा शब्द
religion या अर्थाने वापरलेला नसुन मानवी स्वभावधर्म या अर्थाने वापरलेला आहे. (आता व्यासांचे नाव घेतले तर बहुजनवादी म्हनणा-यांना राग येईल. ते व्यासपीठ हा शब्द न वापरता विचारपीठ हा शब्द वापरतात. व्यास हे कधीच ब्राह्मण नव्हते हे त्यांच्या लक्षातही येत नाही. महत्तेला स्वीकारण्याची लाज वाटु नये. द्वेषाने आंधळे झालेले आपल्याच लोकांना कसे पायतळी तुडवतात त्याचे हे एक उदाहरण.)

संघटना आवश्यक असतात त्या त्या-त्या जाती-समुदायावरील, समाजगटावरील, मानवी समुदायावरील होणा-या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी. अन्याय न्यायात बदलवुन घेण्यासाठी. चळवळीचा अर्थ असतो तो मानवी समाजाला आहे त्या स्थानापासुन पुढे नेण्यासाठी, वैचारिक, मानसिक, आर्थिक, आध्यात्मिक आणि राजकीय प्रगल्भता विकसीत करण्यासाठी... दुस-यावर अन्याय होणार नाही पण आम्हालाही न्याय मिळावा यासाठी. स्वातंत्र्यासाठी. समतेसाठी. आपल्यावर अन्याय झाला म्हणुन दुस-यावर अन्याय करावा हे काही महावीराने वा गौतम बुद्धाने वा शिवाजी महाराजांनी सांगितलेले नाही. संघटना आवश्यक असतात त्या आपापल्या समाजघट्कांना आर्थिक, वैचारिक आणि सामाजिक द्रुष्ट्या उंचावत त्यांना प्रगल्भ करण्यासाठी. त्यांचे वैचारिक, सामाजिक, आर्थिक दारिद्र्य घालवण्यासाठी...ख-या अर्थाने आपापल्या संघटीत म्हनवणा-या समाजाचे नैतीक उत्थान व्हावे यासाठी. संघटनांचे हेच खरे नैतीक कर्तव्य असते. अशाच रितीने देशाचा आणि म्हणुनच जगाचाही खरा अभ्युदय होवू शकतो. नाहीतर २१व्या शतकातही आपण आदिमानवाचा हिंसक टोळीवाद जपणारे आहोत हे सिद्ध करत आम्ही कसलीही मानसिक प्रगती केलेली नाही हे वारंवार सिद्ध करत जातो...जात आहोत...आणि असेच सारेच रसातळाला जावून पोहोचणार आहोत...मग वाचवायला ना क्रुष्ण येणार ना बुद्ध...ना शिवाजी महाराज ना सावरकर...ना गांधी. मानवी जगताच्या पापाचे घडे या असल्या द्वेषमुलक विचारांमुळे, वर्चस्ववादी भावनांमुळे आणि त्यांना समर्थन देना-या संघटनांमुळे भरतच चालले आहेत. वर्तमान जग या मानसिकतांना थारा देण्याच्या अवस्थेत नाही...ते या नव्या जगाला परवडणारही नाही...या चलवळी म्रुत्युपंथाला लागणार हे नक्कीच...

पण जर याच चळवळी सकारात्मक झाल्या तर? आपले भवितव्य उज्ज्वल असेल...यात शंका बाळगण्याचे काहीच कारण नाही.

आता तरी जागे होणार आहात काय?

Wednesday, February 8, 2012

"मराठ्यांनो षंढ झाला आहात काय?" - डा. बालाजी जाधव




मी डा. बालाजी जाधव यांचे "मराठ्यांनो षंढ झाला आहात काय?" ही पुस्तिका वाचली. डा. जाधव बहुदा तरुण असावेत आणि तरुणांमद्धे जो एक स्वाभाविक उद्रेक आणि संताप असतो त्याचे दर्शन त्यांचा या पुस्तिकेत दिसते. परंतु असे लेखन करत असतांना आपणच आपल्या मुळ विचारांशी प्रतारणा करत जातो याचे भान उद्रेकी तरुणांनी ठेवले पाहिजे असे वाटले म्हणुन हे परिक्षणवजा विचारमंथन मी मांडत आहे. उदाहरनार्थ जाधवांना धर्मवीर ही संद्न्या नको आहे...पण क्षात्रवीर म्हटलेले चालते. (प्रुष्ठ २९-३०). याचा अर्थ ते नकळत चातुर्वर्ण्य मान्य करतात. संभाजी महाराज हे ना क्षात्रवीर होते, ना धर्मवीर...ते राष्ट्रवीर होते असे म्हणणे अधिक संयुक्तिक राहील. परंतु यात लेखकाची चुक नसुन जे संस्कार जाणीवपुर्वक काही हिंदुत्ववादी संघटना घडवत आले आहेत त्याची ही अन्याय्य परिणती आहे.

तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठगमन झाले नसुन त्यांची हत्त्या झाली असे डा. जाधव म्हणतात आणि ते तार्किकद्रुष्ट्या बरोबरही आहे. किंबहुना मी एकमेव चित्रकार आहे ज्याने तुकारामांच्या खुनाचे चित्र काढले आहे. परंतु याच तुकारामांचे दशावतारी स्वरुपात जेंव्हा देहुत शिल्पे उभारली जातात तेंव्हा मात्र मराठावादी संघटना काय करतात हा प्रश्न आहे. "मराठा ही एक लढवैय्यी जात आहे..." असे ते आपल्या पहिल्याच प्रकरणात लिहितात. ते खरे असेल एके काळी, परंतु सध्या तरी मराठा ही सत्तेसठी हपापलेली आणि स्व-बांधवांना, स्वजातेयांना वापरुन घेत त्यांना पायतळी तुडवत वाट्टेल त्या तडजोडी करत स्वनाशाकडे वाटचाल करणारे जात बनली आहे हे दुर्दैवाने नमुद करावे लागते.

दुसरे असे कि गोतिये नामक रास्ववादी, जन्माने फ्रेंच माणसाने अलीकडेच पुण्यात लोहगांवात शिवाजी महाराजांचे मंदिर उभारले. मी त्या विरोधात तीन महिन्यांपुर्वी एकामागोमाग तीन लेख लिहिले. निवडनुक आचारसंहिता वगैरे त्या मधल्या दोन महिन्यांच्या काळातही एकाहे मराठा संघटनेने त्या दैवत्वीकरणाचा निषेध केला नाही. उलट अलीकडेच या मंदिराचे उद्घाटन झाले. त्या महान कार्यक्रमात राष्ज्ट्रवादीच्या महान नेत्याची पत्नी सुहास्य हजर होती...हे राजकारण आहे असा युक्तिवाद मला नंतर याच चळवळीतल्याच काही मराठा बांधवांनी ऐकवला. परंतु तुम्ही करता ते राजकारण...बाकी मात्र ब्राह्मणांचे हस्तक असा युक्तिवाद करतांना आपणच आपली घोर फसवणुक करुन घेत आहोत याचे भान असायला नको काय? राजकारण जेंव्हा समाजकारणापेक्षा श्रेष्ठ आहे असा आभास होवु लागतो त्यातच त्या-त्या समाजाच्या अवमुल्यणाची बीजे रोवली गेलेली असतात हे भान मराठ्यांनी करुन घ्यायला हवे असे मला या पुस्तकाच्या निमिताने वाटते.

मराठा समाज हा एका दलदलीत अडकला आहे. सत्ताकारणाचा हव्यास हा मराठा समाजाचा मुलमंत्र बनला आहे. सर्वसामान्य मराठे या वातावरणात एवढे मश्गुल आहेत कि स्वत:ची लाजीरवाणी स्थिती त्यांच्या लक्षातच येत नाहीय. म्हणुन ते इतिहासाचे मुडदे उखडण्याच्या मागे लावले गेले आहेत. इतिहास हा अफुची गोळी बनवला जात आहे. इतिहासाचे तटस्थ विश्लेषन करणे व त्या इतिहासापासुन शिकणे व चुका दुरुस्त करणे हे वेगळे, परंतु प्रतिइतिहास लिहिण्याच्या नादात आपण वर्तमानाच्या बेड्या मात्र घट्ट करत नेत आहोत याचे भान यायला हवे. खरे तर ब्राह्मणांनी गतकालात जी पापे केली असतील ती केली, परंतु वर्तमानात मात्र
प्रत्यक्षात मराठा नेतेच त्यांचे पाय-पंख कापत चालले आहेत याचे भान त्यांना नाही. मराठे आणि ब्राह्मण समाज यांचे साटेलोटे आजचे नाही. कार्यकर्त्यांना ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात अदकावुन द्यायचे आणि नेत्यांनी मात्र ब्राह्मनी संस्था-पक्षांशी आतुन सौदेबाजी करायची ही बाब या भाबड्या मराठा तरुणांच्या लक्षात येत नाही हे एक दुर्दैव आहे. राष्ट्रवादीने अक्षरश: वेदाचार्य (म्हणजे सध्या तरी एवढा कर्मठ माणुस सापडणार नाही) मोरेश्वरशास्त्री घैसासांच्या पत्नीला तिकिट दिले याचा निषेध या मराठ्यांनी (म्हणजे मराठावादी संघटनांनी) का केला नाही याचे उत्तर जर "राजकारण" हे असेल तर मराठा हे षंढ आहेत हे बालाजी जाधव यांचे मत योग्य आहे असे नाईलाजाने म्हणावे लागेल.

ब्राह्मणशाही कि मराठाशाही यात कोणाला निवडायचे हा प्रश्न आता उद्भवु लागला आहे याचे कारण मराठा राजकारणात आहे. गोतिये शिवाजी महाराजांचे मंदिर बनवतोय...वाईट वाटते...पण मतदार राजा दुखवायचा नाही...मग असुद्यात कि ते...काय बिघडले...हे मराठेच म्हणनार...मग लेखकाच्या पुस्तकाचे शिर्षक योग्यच आहे असे म्हणने भाग आहे.

म्हनजे शिवाजी महाराजांचे दैवतीकरण कसल्याही स्थितीत होता कामा नये यासाठी संघर्ष करणारे, नवे नवे शत्रु अंगावर ओढुन घेणारे आम्ही मर्द महामुर्खच कि!

शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे नांव घेत वारंवार ब्राह्मणी कथा जशा येतात तशा विरोधी अर्थाने नव्या बनवत आणि प्रचार करत समाज एकत्र येईल आणि मराठ्यांचे नव सांस्क्रुतीक वर्चस्व स्वीकारेल असा भ्रम या नव-विचारवंतांना झाला आहे कि काय असा प्रश्न उपस्थित होतो. डा. बालाजी जाधव हे एन्याय्य व्यवस्थेविरुद्ध पोटतिडिकेने लिहितात, परंतु अभ्यास आणि अधिक चिंतनाची आवश्यकता आहे. मराठा समाजात वानवा आहे ती तटस्थ चिंतकांची. रा.स्व.वाद्यांनी मुस्लिमांना टार्गेट करायचे, पण घातपातांसाठी त्यांचीच मदत घ्यायची हे नाटक देशपातळीवर जसे सुरु आहे तसेच येथे ब्राह्मनांना जाहीरपणे शिव्या द्यायच्या आणि आतुन त्यांचीच मदत घ्यायची आणि बहुजनांना ठकवायचे हा उद्योग तरुणांच्या तरी ध्यानी यायला हवा. "प्रुथ्वी नि:ब्राह्मण करा..." असे डा. जाधव एका प्रकरणात (प्रुष्ठ २१) म्हणतात. रा.स्व. वाले मुस्लिमांच्या कत्तलीची भाषा करतात तसेच हे विधान आहे. मुस्लिम विरोध केला तर हिंदु एकत्र येतील आणि ब्राह्मण विरोध केला तर मराठेतर बहुजन मराठ्यांच्या मागे येतील हे समजने हे सत्ताकेंद्रित भावनेपोटीचे राजकारण आहे. रास्ववाद्यांना या घोषणेचा फायदा जसा झाला नाही तसाच तो मराठावादी संघटना व पक्षालाही होत नाही. द्वेषाच्या पायावर कोनतेही राजकारण किमान या देशात तरी यशस्वी होत नाही...होनार नाही हा बोध किमान विचारवंतांनी तरी घ्यावा ही या लेखामागील तळमळ आहे.

बरे इतिहासाचे पुनर्लेखन करतांना शिवाजी महाराजांपुर्वीचा इतिहास आणि संभाजी महाराजांनंतरचा इतिहास सांगायला का टाळाटाळ केली जाते? ताराराणी, राजाराम महाराज यांबाबत किती लेखन आहे बरे? शिवपुर्व काळातील इतिहासाबद्दल का लेखन होत नाही? याचे कारण आहे जिजाऊ, शिवाजी व संभाजी यांच्या नांवाचा वर्तमानात राजकारंणासाठी, भावना पेटवण्यासाठी उपयोग सहजी करता येतो म्हणुन कि काय?

संत तुकारामांबद्दल सर्वांनाच आदर आहे. पण मराठ्यांना तो अलीकडेच वाटु लागला. तोही केंव्हा तर मराठा हे कुणबी आहेत असा जावईशोध त्यांनी लावला तेंव्हा. तुकोबा हे कुणबी होते आणि त्यांनी त्यांच्या अभंगात अभिमानाने म्हटलेच आहे. परंतु तुकोबांनी कोठेही आपण मराठा असल्याचा उल्लेख केलेला नाही हे का विसरले जाते? मराठा आणि कुणबी या सर्वस्वी वेगळ्या जाती आहेत. अभिप्रायार्थचे हे पुस्तक सरळ मराठा जातीबद्दल असल्याने मी हे स्पष्ट करत आहे. काही मराठा संघटना आपण बहुजनवादी आहोत असा आव आणत होत्या परंतु आरक्षणाच्या लढाईत उतरत त्यांनी आपला खरा चेहरा दाखवला यावरही व्यापक चिंतन व्हायला हवे. मराठ्यांनी आपले हित पाहु नये कि काय? मी म्हणतो अवश्य पाहिलेच पाहिजे, त्यासाठी बहुजनवादी बुरखा घेण्याची मुळीच आवश्यकता नाही.

बालाजी जाधव यांच्या लेखनात मराठ्यांच्या हलाखीची वर्णने आहेत. ती खरीच आहेत. मी सहमत आहे. महाराष्ट्रातील दीड-दोनशे मराठा घराणी सोडली तर उर्वरीत मराठे हे पुर्ण-ते अर्धवेळ बेरोजगार आहेत. राजकारण्यांच्या-राजकारणाच्या नादी लागत कसलीही सर्जनात्मकता (अपवाद आहेत) न दाखवता, स्व प्रगतीचे मार्ग न धुंडाळता आपापली आयुष्ये सत्तेच्या स्वप्नात वाया घालवत आहेत. परंतु प्रत्येक राजकीय घराण्यांनी (यात मराठाच नव्हे तर अन्यही आले) त्यांची भावी पिढ्यांचीही सोय लावुन ठेवली आहे. अशा स्थितीत इतरांना तर सोडाच खुद्द मराठा नव-नेत्यांना हुजरेगिरी केल्याखेरीज संधी नाही हे उघड आहे. आणि ही हुजरेगिरी म्हणजे समाजाला अलेली षंढता आहे हेच जाधवांचे म्हणने खरे करते.

त्याच वेळीस जेथे जमेनींचे भाव चढे आहेत तेथे बापजाद्यांच्या जमीनी गुंठेवारीत विकुन रातोरात कोट्याधीष होत तेच पैसे वारांगणांवर, वारुणीवर ते लगोलग नगरसेवक ते ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी तयार आहेतच! भिकारी व्हायला किती वेळ लागतो? मग हेच "भुमीपुत्र" म्हणत ज्या जमीनी कारखान्यांना विकल्या तेथे ठिय्या मांडुन नोक-यांची भीक मागायला तयारच कि! लग्नावळेंवरचा मराठा समाजातील खर्च हा अचाट वाढला आहे. जेथे स्वत: खर्च करने शक्य नाही तेथे खोटी कर्जे काढत हे उद्योग पार पाडले जातात, हे काय मराठा तरुणांना समजत नाही? मी मला स्वत:लाच माहित असलेली शेकडा उदाहरने तरी देवु शकतो. शिक्षण, द्न्यान, उद्यमशीलता आणि कष्ट यांना प्रतिष्ठा देत प्रगती साध्य करण्या ऐवजी मराठा तरुनांना दास करण्याचे या नव-सरंजामदारी नेत्यांचे लांगुलचालन करण्यात जर मराठा तरुणांना धन्यता वाटत असेल तर शिवशंकर त्यांचे भले करो एवढेच मी म्हणु शकतो.

हे प्रबोधन कोणतीही मराठा संघट्ना करत नाही. उलट मराठ्यांना आरक्षणाचे गाजर दाखवत आपल्या स्वार्थासाठे पुढे रेटत नेतात आणि हे मेंढरांसारखे त्याच वावटळीत आपले भविष्य शोधतात. शेवटी त्यांचा कडेलोट अपरिहार्यपणे होतो हे वास्तव डा. जाधवांसारख्या तरुणांनी मांडायला हवे असे मला कळकळीने वाटते.

मी "मराठ्यांनो षंढ झालात काय?" या पुस्तिकेतुन मी जो अन्वयार्थ काढतो तो असा कि अरे मराठ्यांनो षंढ होवु नका. राजकारणापेक्षा ख-या अर्थकारणाकडे अधिक लक्ष द्या. सत्ता ही सर्वांना मिळु शकत नाही. ज्या घराण्यांच्या , मग ते कोणत्याही जातीचे असोत, ताब्यात ती आहे ते अन्य कोणाला शक्यतो त्यात प्रवेशु देनार नाहीत. सत्ता ते आपल्याच आणि फक्त आपल्याच भावी पिढ्यांसाठी आरक्षित करुन ठेवनार. मराठ्यांना आरक्षण मिळेल तेंव्हा मिळेल...पण त्याची वाट पाहण्यात स्वत:चीच ससेहोलपट आहे हे लक्षात घ्यावे लागेल. हे सरंजामदार तुमचा वापरच करुन घेणार. आणि जे आपला वापर करु देतात ते षंढच असतात याबाबत शंका असण्याचे काहीएक कारण नाही. मराठ्यांनी मराठ्यांचे अहितच केले आहे हे तरी समजावुन घ्या. तुमचे नेते...मग ते सामाजिक असोत कि राजकीय...त्यांची युती धर्मसत्तेच्या प्रतिनिधींशी...बळकट होत चालली आहे...मग तुमच्या या ब्राह्मण द्वेषाला काडीइतकाही अर्थ रहात नाही.

उलट आज आपण काय घालवत चाललो आहोत यावर विचार करायला हवा. बालाजी जाधवांचा संतप्त उद्गार हा बंव्हंशी अन्यायाच्या जाणीवेपोटी आहे...पण अन्यायाची रुपे सर्वांगीनपणे त्यांनी पहावीत तरच त्यांचा विचार हा खरा स्वागतार्ह ठरेल. त्यांचे पुढील लेखन हे अधिक व्यापक सामाजिक विचारांवर आधारित असेल आणि ते समाजाला पुढे नेण्यासाठी अधिक विचार मांडतील अशी अपेक्षा त्यांच्याकडुन ठेवावी असेच त्यांचे मुलभुत विचार आहेत.

मराठ्यांनो षंढ झालात काय?
लेखक: डा. बालाजी जाधव
प्रकाशक: पंचफुला प्रकाशन, औरंगाबाद
मुल्य: रु.३०/-

Monday, February 6, 2012

दादोजी कोंडदेव...पुन्हा-पुन्हा...निरर्थक!

गजानन भास्कर मेहंदळे यांनी म.टा. ला दिलेल्या मुलाखतीत दादोजी कोंडदेवांची भलावन करणारी व त्यांचा पुतळा उखडण्याबद्दलचा रोष व्यक्त करणारी काही विधाने प्रसिद्ध झाली होती. खरे तर हा प्रकार म्हनजे शिळ्या कढीला उत आनण्याचा प्रकार होता. त्याचा प्रतिरोध म्हणुन मी खालील व्यापक भुमिका मांडली होती जी म.टा. ने प्रसिद्ध केली. ती अशी...



इतिहाससंशोधन विश्वसनीय कसे होणार?
1 Jan 2012, 0000 hrs IST

संजय सोनवणी

इतिहास हा मानवी मनावर प्रभाव गाजवणारा फार महत्त्वाचा घटक असतो. इतिहास हा कसा सांगितला गेला आहे, यावर समाजाचे त्याबाबतचे आकलन अवलंबून असले तरी सामान्य माणसांवर प्रत्यक्ष घडलेल्या इतिहासापेक्षा वदंतांचा अधिक प्रभाव असतो. इतिहास हा जेत्यांचा वा समाजवर्चस्ववादी घटकांच्या वा वर्चस्ववादी होवू पाहणाऱ्यांच्या मानसिक तुष्टीकरणासाठी लिहिला जात असल्याने तो तटस्थ व निरपेक्ष असतोच असे नाही. दुसरे असे की, इतिहासकार हासुद्धा एक मनुष्यच असल्याने त्याच्या लेखनावर त्याच्या समजुती, पूर्वग्रह आणि त्यानुरुप असलेल्या त्याच्या व्यक्तिगत आकलनाचा प्रभाव पडत असतो. अनेकदा एकाच पुराव्याचे आकलन/विश्लेषण इतिहासकारपरत्वे बदलत असते. या नियमाला अपवाद नसतात असे नाही. परंतु मग त्यांनाही त्यांच्या नव्या संशोधनामुळे सामाजिक पूर्वग्रहांना, रुढ समजुतींना धक्का बसत असल्याने लोकांच्या रोषाला तांेड द्यावे लागते आणि त्यातून जी वादळे निर्माण होतात त्यामुळे पूर्वग्रहविरहित, संपूर्ण ज्ञान-चिकित्सात्मक इतिहाससंशोधनास खीळ बसते.

खरे तर सातत्याने इतिहास संशोधने यासाठीच व्हायला हवीत की कोणावरही अकारण अन्याय होऊ नये, तसेच कोणाचे अकारण उदात्तीकरण झाले असेल तर तेही लोकांसमोर यावे. पण मूळ इतिहास हा वर्चस्ववादी भूमिकेतून लिहिला गेला असल्याने, कोणाचे उदात्तीकरण करायचे, कोणाला बदनाम करून ठेवायचे आणि कोणाला गडप करून टाकायचे ही एकाअर्थाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणत त्याप्रमाणे 'इतिहासविघातक प्रवृत्ती' होती आणि आजही ती शेष असावी हे एक महाराष्ट्राचे दुदैर्र्व आहे.

शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समोर आणला जात असताना, ज्येष्ठ-श्रेष्ठ आणि रात्रंदिवस राबून अनमोल कार्य केलेले संशोधकही दुदैर्र्वाने या इतिहासविघातक दृष्टीपासून मुक्त राहिले नाहीत. खरेतर आज इतिहास अधिकाधिक नि:पक्षपाती होत जाण्याची गरज आहे. परंतु अशा उज्ज्वल इतिहासात आपल्याही जातीघटकाचे वर्चस्व कोणत्या ना कोणत्या रूपात असले पाहिजे, या भावनेतून प्रत्यक्षाप्रत्यक्षरित्या संत रामदास आणि दादोजी कांेडदेवांबाबतचे समज गतशतकापासून जोपासले जात आहेत. दादोजी हे बालपणीचे गुरु तर रामदास हे मोठेपणीचे गुरु अशी ही मांडणी आहे. ते खरे असते आणि निविर्वाद पुराव्यांनी सिद्ध झाले असते तर ते मान्य करायलाही कोणाचीही हरकत नव्हती. पूवीर् न. र. फाटकांनी रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते हे सत्य खणखणीतपणे मांडले होते. पण अजूनही अनेक इतिहासकार वारंवार तिय्यम दर्जाच्या बनावट साधनांचा आधार घेत वारंवार शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न करत असतात. ज्येष्ठ इतिहासकार गजानन भास्कर मेहंदळे यांनी 'शिवाजी : हिज लाइफ अॅण्ड पिरियड' या नव्या चरित्रात्मक ग्रंथाच्या निमित्ताने महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत (१७ डिसेंबर २०११), शिवाजी महाराजांचे कोणीच गुरु नव्हते असे म्हटले आहे. ते म्हणतात, 'शिवकालाविषयी जे अस्सल पुरावे आहेत त्यात कोठेही दादोजी कांेडदेव हे शिवरायांचे गुरु होते असे म्हटलेले नाही. तसा उल्लेखही कोठे सापडत नाही, हे मी ३० वर्षांपूवीर्च लिहून ठेवले आहे. परंतु त्याचबरोबर माझे असेही म्हणणे आहे की, दादोजी हे चांगले गृहस्थ असल्याची आणि त्यांच्या न्यायदानाविषयी शिफारस करणारी शिवाजी महाराजांची स्वत:ची चार पत्रे उपलब्ध आहेत. म्हणजे तो माणूस नालायक तर नव्हता? शिवाजीराजे किंवा शहाजीराजे यांनी जी कामगिरी सोपवली ती सुविहितपणे पार पाडली होती. मग इतिहासात होऊन गेलेल्या त्या व्यक्तीसाठी एवढा गहजब का?'

इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे मात्र जवळपास तीच इतिहासाची साधने वापरत दादोजी कांेडदेव हे शिवाजी महाराजांचे शिक्षक होते, दादोजींबद्दल शिवाजी महाराजांना पराकोटीचा आदर होता व दादोजींच्या निधनानंतर त्यांना खूप शोक झाला, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात.

दादोजी हे आजीवन आदिलशहाचे कांेडाणा व दौंड प्रांताचे सुभेदार होते. या सुभेदारीच्या प्रदेशातच शहाजी महाराजांची पुणे व ३६ गावांची जहागिरी होती. दादोजी जे वतन/जमीनींच्या वादांबाबत निवाडे करत ते आदिलशहाचा सुभेदार या नात्याने, त्याच्या सुभेदारीच्या क्षेत्रात. तेही मलिक अंबरने घालून दिलेल्या महसुल पद्धतीनुसार. मलिक अंबरची ही महसुलाची पद्धत जवळपास देशभर स्वीकारली गेली होती. त्यामुळे ते प्रदेश आपल्या स्वामित्वाखाली आणल्यानंतर त्यासंबधीचे दादोजींचे निवाडे पुढेही शिवाजी महाराजांनी कायम ठेवले, एवढेच त्या चार पत्रांवरून सिद्ध होते. पण यातून त्यांनी शिवाजी महाराज वा शहाजीराजांचे सेवक या नात्याने ते निवाडे केले होते हे कोठे सिद्ध होते?

दादोजी हे आदिलशहाचे मृत्युपावेतो सुभेदार होते. महसुलाच्या हिशोबात काही गफलत झाल्याने आदिलशहाने घोरपडे सरदारांना कांेडाण्यावर चालून जायला सांगितले होते व दादोजींची हार झाल्यानंतर खरे तर देहान्त शासनच व्हायचे, परंतु ब्रह्माहत्या हे महत्पापात गणले गेले असल्याने हातावर निभावले. या संदर्भातील पुरावे दुर्लक्षिण्याचे कारण काय? ते असत्य असतील तर त्याबाबत संशोधनपर चर्चा करून त्यांचा निकाल का लावला जात नाही? 'मग इतिहासात होऊन गेलेल्या या व्यक्तीचा पुतळा उखडून फेकण्याचे कारण काय?' असा प्रश्न गजानन मेहंदळे यांनी विचारला आहे. तो समजा रास्त मानला, तर मग दादोजी व शिवाजी महाराज वा शहाजी महाराज यांचा नेमका संबंध काय, हेही अस्सल पुराव्यांनिशी सिद्ध करायला हवे. दादोजींनी आपल्या हयातीत कांेडाणा शिवाजी महाराजांना का मिळू दिला नाही यावरचेही संशोधन मांडायला हवे. दादोजींबाबत ज्यांना आदर आहे त्यांच्यासाठी त्यांचा स्वतंत्र पुतळा नक्कीच असू शकतो, परंतु ज्या इतिहासाशी त्यांचा संबंध आदिलशहाचा सुभेदार या नात्याने आहे तो बाजूला ठेवून त्यांना शिवेतिहासातील महत्त्वाची व्यक्ती कसे म्हटले जाऊ शकते?

१६३० साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. इतका की लोक मृत जनावरे आणि शेवटी तर मृत माणसांचेही मांस खाऊन जगायचा प्रयत्न करत होते. गावेच्या गावे ओस पडली होती. या दुष्काळाला थोरला दुष्काळ म्हणतात. या दुष्काळाचे हृदयदावक वर्णन व्हॅन ट्विस्ट या डच व्यापाऱ्याने लिहून ठेवले आहे. तुकाराम महाराजांनीही आपल्या अनेक अभंगांत या प्रलयंकारी दुष्काळाची वर्णने केलेली आहेत. दादोजींनी दुष्काळ ओसरल्यानंतर गावे पुन्हा वसवण्याची कामगिरी सुरू केली, ती त्या प्रांताचा सुभेदार या नात्याने. ती त्यांची जबाबदारीच होती. त्यात त्यांची कार्यक्षमता मान्य करायलाच हवी, पण शहाजीराजे आदिलशाहीत गेले ते १६३६ मध्येे हेही येथे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे शहाजीराजांच्या आज्ञेने त्यांनी गावे वसवली हा दावा निराधार ठरतो. घटनाक्रमात अशी अदलाबदल करून काय साध्य केले जातेे? याला इतिहास संशोधन म्हणायचे का, असा प्रश्न प्रत्येक इतिहासकाराने स्वत:लाच विचारला पाहिजे.

इतिहासकाराच्या सदसद्विवेकबुद्धीवर सर्वसामान्यांचा पराकोटीचा विश्वास असतो. सारी साधने त्यांना सर्वांना अभ्यासने शक्य नसते. इतिहासकाराने इतिहासाचे केलेले मूल्यांकन त्यांच्या दृष्टिकोनात, ज्ञानात नवी भर टाकत असते. त्यातून समाजऐक्याची भावना निर्माण होत असते. आधीचज जातीय अस्मिता टोकदारच नव्हेत तर काटेरी होत आहेत, हे आपण अनुभवत असताना किमान जातीसापेक्ष अहंगंड सुखावण्यासाठी काही विधाने संबंधित पुरावे चचेर्तही न घेता केली गेली तर तो इतिहास, कितीही शिस्त असली तरी, अविश्वसनीय होणार नाही का? इतिहाससंशोधन वर्चस्ववादी मानसिकतेतून झाले तर आपण आपले भवितव्य कसे घडवणार?


खरे तर या लेखात मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर द्यायला हवे होते ते श्री मेहंदळे यांनी. पण बहुदा त्यांना उत्तर सुचले नसावे... पण बराच वेळ घेवुन प्रत्युत्तर दिले ते श्री कौस्तुभ कस्तुरे यांनी माझ्या वरील लेखातील मुख्य मुद्द्यांना पुर्ण बगल देत, लेनचा विक्रुत विषय जो मी टाळला होता तो करत दादोजींना त्यांच्या समाजाचे महापुरुष ठरवत अगदी विनाकारण रामदासांनाही वेठीला धरले. त्यांचा माझ्या वरील लेखाला प्रत्य्त्तर देनारा हा लेख...


वर्चस्ववादी मानसिकता
22 Jan 2012, 0000 hrs IST

SMS NEWS to 58888 for latest updates
कौस्तुभ कस्तुरे

गेल्या काही दिवसात दादोजी कोंडदेव हे मराठ्यांच्या इतिहासातलं वादग्रस्त प्रकरणं ठरलं आहे. इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांनी त्यांच्या मुलाखतीत दादोजी कोंडदेव यांच्या केलेल्या समर्थनाचं संजय सोनवणी यांनी जोरदार खंडन केलं होतं. सोनवणी यांच्या मतांचा प्रतिवाद करणारा हा लेख...

' इतिहास संशोधन विश्वसनीय कसे होणार?' (रविवार, दि. १ जाने.) हा संजय सोनवणी यांचा, ज्येष्ठ इतिहास-संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या प्रतिपादनाचा प्रतिवाद करणारा लेख वाचला. मेहेंदळे हे अत्यंत निरपेक्ष आणि श्रेष्ठ असे इतिहास संशोधक आहेत. त्यांनी दादोजी कोंडदेव मलठणकरांविषयी मांडलेली मतं (संवाद - १८ डिसें. २०११) योग्यच आहेत. दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचे उल्लेख असणारे प्रत्यक्ष पुरावे नसले तरीही, ते चांगले गृहस्थ असल्याची आणि त्यांच्या न्यायदानाविषयी खुद्द शिवाजी महाराजांची शिफारसपत्र उपलब्ध असताना दादोजींच्या चारित्र्यावर चिखलफेक करणं हा कोणता पराक्रम? कोण कुठला तो जेम्स लेन आणि त्याने त्याच्या पुस्तकात काहीतरी मूर्खासारखं लिहिलं आणि आमच्याच सरकारने आमच्याच महापुरुषाचा पुतळा भर मध्यरात्री दिवाभीतासारखा उखडून टाकला. आजही महाराष्ट्राला संस्कृतीपेक्षाही विकृतीच जवळची वाटते हेच यावरून दिसून येतं. मेहेंदळे यांनी उपस्थित केलेला पुढचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे - 'शिवाजी महाराजांचे दादोजीच नव्हे, तर इतर कोणीच गुरू नव्हता, तसा एकही पुरावा उपलब्ध नाही!' तर मग शिवाजी महाराजांचे गुरू नसलेल्या अनेकांचे पुतळे अजूनही उभेच आहेत त्यांचं काय? देहुरोडमधील तुकाराम हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचा लेखी अस्सल पुरावा आज उपलब्ध आहे का? असेल तर तो आधी सादर व्हावा!

सोनवणी म्हणतात की, मूळ इतिहास हा वर्चस्ववादी भूमिकेतून लिहिला गेला आहे आणि कोणाचे उदात्तीकरण वा कोणाला बदनाम करायचे हे आधीपासूनच ठरले होते. अर्थातच याविषयी बोलताना एका कटू पण सत्य गोष्टीकडे लक्ष वेधावे वाटते, ती गोष्ट म्हणजे अर्थात 'जातीयवाद'! दादोजी आणि समर्थ हे दोघेही ब्राह्माण असल्याने ब्राह्माण इतिहासकारांनी त्यांचे स्तोम माजवले, असा अपप्रचार केला जातो. परंतु अस्सल पुरावे मात्र वेगळंच सांगतात. महाराजांच्या समकालीन असणाऱ्या कृष्णाजी अनंत मजालसी उर्फ सभासदाच्या बखरीत किंवा खुद्द परमानंद गोविंद नेवासकरांच्या 'शिवभारता'त, जो अत्यंत विश्वसनीय पुरावा मानला जातो त्यात शहाजीराजांनी दादोजींना जिजाऊ आणि शिवाजी महाराजांसोबत कारभारी म्हणून पाठवले आणि इतकेच नव्हे तर त्यांना 'सरकारकून' म्हणजे 'मुख्य कारभारी' म्हणून नेमल्याचे उल्लेख आहेत. शिवाय भारत इतिहास संशोधक मंडळाच्या 'शिवचरित्र साहित्य खंड' यामध्ये पुणे आणि कर्यात मावळ पुन्हा वसवण्याचे काम दादोजींनी जिजाऊंच्या सल्ल्याने केल्याचा (आदिलशाही सुभेदार म्हणून नव्हे!) स्पष्ट उल्लेख आहे. 'रानातल्या जनावरांचा अन चोरांचा पंतांनी बंदोबस्त केला (संदर्भ : एक्याण्णव कलमी बखर).' इतिहासाचार्य राजवाडे यांनी त्यांच्या 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' या ग्रंथाच्या सतराव्या आणि अठराव्या खंडात दादोजींनी केलेले अनेक 'महजरनामे' प्रसिद्ध केले आहेत. याच्या चौथ्या खंडात महाराजांनी दादाजी नरसप्रभू गुप्ते यांना लिहिलेले एक पत्र आहे त्यात महाराज म्हणतात - 'श्री रोहिरेश्वर तुमचे खोरियातील आदि कुलदेव तुमचा डोंगरमाथा पठारालगत स्वयंभू आहे. त्याणी आम्हांस यश दिल्हे... राजश्री दादापंतांचे विद्यमाने (दादोजी कोंडदेवांच्या मदतीने) बाबाचे व तुमचे व आमचे श्रीपासी इमान जाहले...' म्हणजेच शिवाजी महाराजांच्या कार्याला दादोजींचा पाठिंबा होता, ते आदिलशाहीचे 'नाममात्र' सुभेदार होते हे स्पष्टच कळून येते. यातच सोनवणी यांनी उपस्थित केलेल्या 'दादोजींनी शिवाजी महाराज वा दादोजींचे सेवक या नात्याने निवाडे केले हे कोठे सिद्ध होते?' या प्रश्नाचे उत्तर सहज मिळते.

दादोजींनी १६३० ते १६३६च्या दरम्यानची अनेक कामे 'आदिलशाही सुभेदार' या नात्याने केली असतीलही, परंतु १६३६मध्ये त्यांना शहाजीराजांनी आपला कारभारी नेमल्यानंतर या म्हाताऱ्या निष्ठावंत सरकारकुनाने अखेरपर्यंत भोसले घराण्याची सेवाच केली आणि १६३६नंतरची बहुतांश कामे जिजाऊंच्या आज्ञेने केल्याचे अनेक उल्लेख सापडतात. त्यांनी केलेली सुधारणेची कामे ही दुष्काळानंतरची असण्यापेक्षाही आदिलशाही सरदारांनी पुणे प्रांतात घातलेल्या जुलूमी धुमाकूळानंतरची आहेत हेही लक्षात घेतले पाहिजे. इतिहासलेखन हे वर्चस्ववादी भूमिकेतून झाले असे बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा वरील अस्सल साधने तपासून इतिहासाचे मूल्यमापन करणेच अधिक इष्ट ठरेल.

' तथाकथित शिवप्रेमी' केवळ ब्राह्माणद्वेषाने सत्य इतिहास दडपून नवीन प्रतिइतिहास मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे 'महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळा'च्या इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील दादोजींचे उल्लेख वगळून 'शिवरायांचे शिक्षण शहाजीराजांच्या देखरेखीखाली' झाल्याचे दाखवले आहे. हे पाहून हसावे का रडावे तेच समजेनासे झाले आहे. इ.स. १६३६च्या सुरुवातीसच शहाजीराजांची 'निजामशाही' मोंगल आणि आदिलशाहाने बुडवली. शाहजहानने आदिलशहाला बजावले की, राजांना महाराष्ट्रात न ठेवता दूर कर्नाटकात पाठवावे. त्याप्रमाणे आदिलशहाने राजांची पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूरची जहागीर पूर्ववत चालू ठेवून राजांना कायमचे कर्नाटकात पाठवले. राजे दूर बंगलोरला (बंगळुरु) स्थायिक झाले व अखेरपर्यंत ते पुन्हा परत महाराष्ट्रात आल्याचे उल्लेख नाहीत; तर मग पुण्यात राहणाऱ्या बाल शिवबांचे शिक्षण त्यांच्या देखरेखीखाली कसे झाले?

सोनवणी म्हणतात की, दादोजींचा शिवैतिहासाशी संबंध नसून ते फक्त आदिलशाही सुभेदार होते. तेव्हा सोनवणी यांनी वरील पुरावे तपासून पहावेत. पेशवाईतही महादजी शिंद्यांनी दिल्लीच्या बादशहाकडून स्वत:ला 'वकील-इ-मुतालिक' ही पदवी घेतली होतीच की! परंतु म्हणून काही महादजी पेशव्यांना सोडून मोंगलांचे 'मनसबदार' झाले नव्हते. ते पद फक्त नाममात्र होते. नेमकी हीच गोष्ट दादोजींच्या बाबतीतही आहे.

सोनवणी म्हणतात ते खरे आहे- आधीच जातीय अस्मिता टोकदारच नव्हे, तर काटेरी होत आहेत. मात्र आजपर्यंतचे बहुतांश इतिहाससंशोधन हे निरपेक्षपणे झालेले आहे. म्हणायचेच झाले, तर सध्याच्या तो़डफोड करणाऱ्या शिवप्रेमींची मानसिकता पाहता इतिहासाचे 'कथित पुनलेर्खन' हे वर्चस्ववादी मानसिकतेतून होऊ लागले आहे. दादोजी कोंडदेव मलठणकर आणि रामदासस्वामी हे त्याचे पहिले बळी ठरले.


या लेखाला माझे खालील उत्तर प्रसिद्ध झाले...शक्य असतांनाही मी त्यात दादोजी खुनी कसा होता...त्याच्या हात कापण्यामागील इतिहास सांगत बसलो नाही...कारण त्यांच्या व्यक्तिगत चारित्र्याशी मला काही घेणे-देणे नव्हते. मुख्य मुद्दे होते ते मी खालील प्रत्युत्तरात मांडले आहेत...




खरे वर्चस्ववादी कोण?
5 Feb 2012, 0000 hrs IST

SMS NEWS to 58888 for latest updates
शिवाजीमहाराजांचे गुरू मानल्या गेलेल्या दादोजी कोंडदेव यांच्याविषयी ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदेळे यांनी केलेल्या विधानांवर संजय सोनवणी यांनी आक्षेप घेतला होता. नंतर सोनवणी यांच्या लेखाचा प्रतिरोध करणारा आणि मेहेंदळे व दादोजींची बाजू मांडणारा लेख कौस्तुभ कस्तुरे यांनी लिहिला होता. आता कस्तुरे यांच्या लेखाला उत्तर देणारा संजय सोनवणी यांचा हा लेख छापून, या वादावर इथेच पडदा टाकत आहोत.

कौस्तुभ कस्तुरे यांची 'वर्चस्ववादी मानसिकता' ही गजानन भास्कर मेहंदळे यांनी दादोजी कांेडदेव यांच्या संदर्भात केलेल्या विधानांचे खंडन करणाऱ्या माझ्या 'इतिहास संशोधन विश्वसनीय कसे होणार?' या लेखावरची प्रतिक्रिया वाचली. गजानन भास्कर मेहंदळे या निरपेक्ष आणि श्रेष्ठ अशा इतिहासकाराची दादोजी कोंडदेव मलठणकरांविषयी मांडलेली मते योग्यच आहेत, असा त्यांचा अभिप्रायही वाचला. मूळ मुद्याला बगल देत कसे लेखन करावे हे कस्तुरे यांच्याकडूनच शिकायला हवे हेही पटले. परंतु त्यांनी 'नाममात्र सुभेदार' असे दादोजींचे वर्णन करताना ही 'पदवी' कोठून शोधून काढली हे ते लिहायला विसरलेले दिसतात. त्यांना मोगलकालीन प्रशासनव्यवस्थेचे काडीएवढेही ज्ञान नाही, हे त्यांनीच सिद्ध केले आहे. किंबहुना हीच लबाडी आजतागायत केली जात आहे. किमान दादोजी आदिलशहाचे सुभेदार होते (मग ते नाममात्र का म्हणेनात) हे मान्य तरी केले याबद्दल त्यांचे आभार मानलेच पाहिजेत!

पण कस्तुरेंच्या माहितीसाठी सांगतो की 'सुभेदार' हा नेहमीच केंद्रीय सत्तेचा प्रतिनिधी असे. महसुल/जमीन सीमादींचे वाद-विवाद याबाबत निवाडे करण्याचे अधिकार सर्वस्वी सुभेदाराच्या हाती असत. गावे वसवणे, ज्यायोगे महसूल वाढेल अशी अधिकाधिक जमीन लागवडीखाली आणणे, ही कर्तव्ये सुभेदारालाच करावी लागत. कंेदीय सत्ता कधीही महत्त्वाचे किल्ले (उदा. कांेडाणा, पुरंदर) जहागीरदारांच्या नव्हे तर, आपल्यामार्फत सुभेदाराच्या अखत्यारित ठेवत असत. जहागीरदारांच्या अखत्यारित असलेच तर दुय्यम दर्जाचे किल्ले असत. जहागीरदारांना प्रशासकीय प्रक्रियेत व न्यायदानासंदर्भात कसलाही अधिकारच नव्हता. महसूल आणि न्यायदान (प्रशासकीय व्यवस्था) हेच कंेदीय सत्तेची सार्वभौमता ठरवत असते. अशा स्थितीत शहाजी महाराज (व इ.स.१६४२ नंतर स्वराज्याची स्थापना करेपर्यंत शिवाजी महाराज) जहागीरदार असल्यामुळे त्यांना न्यायदान करण्याचा अधिकारच नव्हता, तर मग त्यांचे कारभारी असलेल्या दादोजींना कसा असू शकेल, हा साधा प्रश्न या इतिहासकारांना पडला नसेल (वा माहीत असूनही ते सांगत नसतील तर) आणि 'दादोजी असले तर आदिलशहाचे नाममात्र सुभेदार', होते असे खुळचट विधान केले जात असेल तर ज्येष्ठ-श्रेष्ठ आणि निरपेक्ष म्हणवून घेणाऱ्या इतिहासकारांचीच वर्चस्ववादी दांभिक भूमिका वारंवार स्पष्ट होते.

दादोजी कोणत्याही स्थितीत शहाजीराजांनी नियुक्त केलेले कारभारी नव्हते, असूही शकत नाहीत. कारण सुभेदाराचा दर्जा हा कारभाऱ्यापेक्षा मोठा असतो आणि दादोजी आजीवन सुभेदारपदावरच होते, हे मान्य करायला एवढे लाजायचे कारण काय? त्यांचे निवाडे स्वतंत्र झाल्यानंतरही शिवाजी महाराजांनी कायम ठेवले याचा एवढाच अर्थ निघतो की, मलिक अंबरच्या महसूल पद्धतीचे उत्तम आचरण दादोजींनी केले होते. त्याबद्दल त्यांना शाबासकी देता येते. ती देऊ, पण शिवाजीमहाराजांशी त्यांचा संबंध जोडण्याचे काय कारण?

रामदासांचा मुद्दा कस्तुरंेनी जाणीवपूर्वक घुसवला आहे. ते विसरतात की ज्ञानेश्वर, एकनाथ, चक्रधरादि ब्राह्माणांचा बहुजनांनी नेहमीच सन्मान केला आहे. मग वाद रामदासांबद्दल का? कारण भाकड कथा निर्माण करून, त्यांना येनकेनप्रकारेण शिवाजी महाराजांचा आध्यात्मिक गुरू बनवले गेले. कसलेही बनावट दुय्यम-तिय्यम दर्जाचे पुरावे फेकायचे आणि त्यांना अस्सल म्हणवत आपलेच घोडे पुढे रेटायचे हा वर्चस्ववाद कस्तुरंेना वा त्यांच्या समर्थकांना समजत नाही असे नाही. 'ते करतात ते इतिहास संशोधन आणि इतर करतात ते जुने गाडलेले मुडदे उखडणारे विवेचन' अशी त्यांची अत्यंत बालिश मांडणी आहे.

' आमच्याच सरकारने आमच्या महापुरुषाचा पुतळा भर रात्री दिवाभीतासारखा उखडून टाकला', हे कस्तुरंेचे विधान हे मेहंदळंेच्या मुलाखतीतील विधानाची पुढची आवृत्ती आहे. दादोजीसमर्थक दंगा करून शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आणतील ही भीती सरकारला असल्याने त्यांनी रात्री पुतळा काढला. ही भीती रास्त होती हे कस्तुरंेनीच सिद्ध करून दाखवले आहे. त्यामागे दादोजींचे नाव काही कारण नसताना शिवचरित्राशी जोडले गेले होते, हे एक कारण तर होतेच; पण लेन नामक कथित इतिहासकाराने पुण्यातील वावड्यांचा हवाला देत ( Street Joke ) शिवाजी महाराजांच्या जैविक पितृत्वाचे श्रेय दादोजींना दिले होते. असल्या नीच मानसिकतेला लाल महालातील अनैतिहासिक पुतळा जर बळ पुरवीत असेल, तर तो तेथून हलवणे हे शासनाचे कर्तव्यच होते आणि शासनाने ते बजावले. तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराजांच्या देहुरोड येथील पुतळ्याबदल कस्तुरंेनी विषय सोडून विधान केले आहे. तो पुतळा मुळात वादग्रस्त नाही. दादोजीहटाव प्रकरण नुसते लेनमुळे नव्हे, तर ज्या विकृती विशिष्ट समाज गेली २५-३० वर्षं खाजगीत चघळत आला आहे, त्याची अपरिहार्य परिणती होती. आजही दादोजींबद्दल खोटे पुरावे देत 'ते गुरु नव्हते, पण भले माणूस तर होते. मग त्यांचा पुतळा उखडायचे काय कारण?' असा आलाप करून जी मानसिकता दर्शवली जात आहे ती बघता लेनचे बोलवते धनी कोण हे ओळखायला मोठ्या बुद्धिमत्तेची गरज नाही. कोणाला दादोजींसारख्या भल्या माणसाचा पुतळा हवा असे वाटत असेल तर तो त्यांनी हवा तेथे उभारावा, मात्र तो जिजाऊ आणि बालशिवरायांसोबत असूच शकत नाही. कारण दादोजींचा शिवैतिहासाशी संबंध असलाच, तर आदिलशहाचा सुभेदार म्हणून आहे. दादोजींना एकाच वेळीस दोन चाकऱ्या करू द्यायला आदिलशहा नक्कीच दुधखुळा नव्हता. सुभेदार आणि सरकारकून यात मोठा कोण असतो? सुभेदाराचा सरकारकून झाला तर ती पदावनती असते, पदोन्नती नव्हे. हे ज्यांना समजत नाही त्यांनी इतिहास सांगण्याच्या फंदात पडू नये आणि आधी स्वत:च वर्चस्ववादी भावनेतून बाहेर येऊन मोकळेपणाने इतिहास स्वीकारावा. सर्वजण त्यांचे स्वागतच करतील.



वरील चर्चा वाचता सुद्न्य वाचकांच्या लक्षात येईल कि खरी कळ अकारण कोण काढत आहे? त्यामागे नेमक्या कोणत्या भावना आहेत? अशा पद्धतीने समाज गाडा द्वेषविरहीत कसा चालणार? आम्हाला खोटा इतिहास कितीवेळा कधी उघड तर कधी आडुन सांगणार? कशाला? का उगा त्या शिळ्या कढीला उत आणताय? जे खरे चांगले आहेत त्याबद्दल बोलुयात ना! कशाला दादोजींचे वस्त्रहरण करायला भाग पाडताय? तेही तुमच्याकडे कसलीही उत्तरे नसतांना? आणि कस्तुरे यांना वकील-ए-मुतालिक या पदाचा अर्थच जर माहित नाही तर उगा कशाला इतिहासाबाबत गळे काढावेत आणि दादोजींना नाममात्र सुभेदार म्हणावे? हा सारा बाष्कळपणा सुद्न्यपणे थांबवावा ही त्यांना नम्र सुचना. आजतागायत तुम्ही इतिहासाचा स्वयंपाक करुन हव्या त्या डिश आम्हाला वाढल्या...धन्यवाद...पण आम्ही कधीच या लबाड्या समजु शकणार नाही या भ्रमात राहु नका. वर्चस्ववाद सोडा...




ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड

  ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड करणे आणि लोकांची दिशाभूल करणे हा भाजपाचा पूर्वीपासून उद्योग राहिलेला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नुकतेच नेह...