Sunday, June 25, 2017

मोहम्मद अयुबची निघृण हत्या


Ayub Pandith lynching


काश्मिरमध्ये गुरुवारी रात्री मोहम्मद अयुब पंडित या डीएसपीची कर्तव्य बजावत असतांना हिंसक जमावाने निघृण हत्या केली. श्रीनगरमधील ऐतिहासिक असलेल्या जामा मशिदीबाहेरच ही घटना घडली. ती शब-ए-कद्रची रात्र होती. ही रात्र मुस्लिम आपल्या पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रार्थनांत घालवतात. साध्या वेशातील मोहम्मद अयूब मशीदीबाहेर येणा-या लोकांची छायाचित्रे त्यांच्या ड्युटीचा एक भाग म्हणून काढत होते. लोकांनी त्याला नुसता आक्षेप घेतला नाही तर ते हिंसक बनू लागले. सर्व्हिस रिव्हाल्वर मधून चिडलेल्या जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबारही केला. लोकांनी तरीही त्यांच्यावर हल्ला करत त्यांना विवस्त्र करत पाशवी मारहाण करत दगडांनी ठेचायला सुरुवात केली. त्यात त्यांच मृत्यू झाला. त्यांचे प्रेत मखदूमसाहिब या सुफी संताच्या कबरीच्या चौकापर्यंत फरफटत नेण्यात आले.

ज्या सुफी संतांच्या शिकवणुकीवर आपण चालत आहोत असा अभिमान काश्मिरी मुस्लिम बाळगत होते त्या संताच्या कबरीच्या दारात अयुबचे प्रेत फरफटवत आणने हा सुफी तत्वज्ञानाचा खुनच नाही काय असा प्रश्न पडल्यास नवल नाही. मशिदीबाहेर येणारे लोक आपल्या जीवनातील पापाची क्षमा मागून आलेले होते. नवे पाप करायला आपण मोकळे झालो आहोत असे त्यांना वाटले असेल. या घटनेने काश्मिर समूळ हादरला. मुस्लिमांकरवी होणा-या मुस्लिम हत्या काश्मिरमध्ये गेली तीन वर्ष नव्या दमाने सुरु झालेल्या हिंसाचारात नवीन नाही. पण सरकारी अधिका-याची हत्या व तीही रमजानमधील एका पवित्र दिवशी ज्या पद्धतीने केली गेली आहे ती इस्लामियांना शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे.

या घटनेने १९९८ सालची अजून एक निघृण घटनेची आठवण काही पत्रकारांनी काढली आहे. शब्बे कद्रच्याच रात्री एका गांवात काश्मिरमध्ये २३ पंडितांची अशीच ठेचून निघृण हत्या केली गेली होती. या हत्याकांडाबद्दल खुद्द काश्मिरी मुस्लिमांत संतापाची लाट उसळली होती. पण आता झालेल्या शब्बे कद्रच्या रात्रीची हत्या राजकीय व सरकारी अधिका-यांच्या गोटातील संताप व निषेधात्मक प्रतिक्रियांपुरती उरलेली दिसते. याची शरम अन्य मुस्लिमांना वाटतेय असे काही अद्याप तरी दिसलेले नाही. 

प्रश्न केवळ पवित्र रमजानचा वा शब-ए-कद्रच्या दयावंत रात्रीचा नाही तर एकुणातच काश्मिरी मुस्लिमांत भडकत असलेल्या निघृणतेच्या भावनांचा आहे. सरकारवर त्यांचा विश्वास उरलेला दिसत नाही. सरकार विश्वास मिळवायचा प्रामाणिक प्रयत्न करते आहे असेही दिसत नाही. अनेक टाळता येवू शकणा-या बाबीही केल्या जातात व असुरक्षिततेला खतपाणी घातले जाते. अयुब साध्या वेशात असायला हवे होते काय? ड्रेसवर असते तर ते वाचू शकले असते काय? हे प्रश्न जरी पडले तरी प्रशासनाचीही चूक होते आहे. रात्रीच ही घटना घडली पण प्रेत पुरते ठेचलेले असल्याने ओळखही पटलेली नव्हती. सकाळी सहा वाजता अयुबच्या घरच्यांचा "मोहम्मद अयूब अजून घरी आलेले नाहीत..." हा फोन जाईपर्यंत ते प्रेत अनोळखीच राहिले. डीएसपी स्तरावरच्या अधिका-यासोबत दुसरे काही पोलिसही असायला हवे होते असे त्यांच्या वरिष्ठांना का वाटले नाही? एक रिपोर्ट सांगतो की त्यांच्यासोबत एक पोलिस होता, पण जमाव हिंसक झाल्यावर तो पळून गेला. तो पोलिस सांगतो की त्याला मोहम्मद अयुबनेच रिलीव्ह केले होते. खरे काय ते समजेल किंवा समजणारही नाही, पण झाली घटना ही प्रशासनालाही खाली मान घालायला लावणारी आहे.

काश्मिरमध्ये, विशेषत: दक्षीण भागात पुर्वी कधी न ऐकलेली "काश्मिरी तालीबान" ही नवीच संघटनाही उदयाला आली आहे. अल कायदा तर आहेच. फुटीरतावादी दहशतवादी हत्याकांडांना नागरिक व मुलांची दगडफेकही सामील झाली आहे. काश्मिर पुर्वी धुमसत होता, आता ज्वालामुखी फुटतो आहे. अयुबच्या हत्येकडे एक गंभीरतेचा इशारा म्हणून पहात तातडीने सामंजस्याचे व मनोमिलनाचे प्रामाणिक प्रयत्न करने ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. हा राजकारणाचा विषय नाही. धार्मिक तेढ माजवणा-यांच्या मुजोरीला खपवून घेण्याचा तर आजीबात नाही. हा राष्ट्रीय प्रश्न आहे. सर्वांनीच तो सुटण्याच्या दिशेने वाटचाल करण्याची गरज आहे.

अपूर्व मेघदूत



आषाढाच्या पहिल्याच दिवशी कवीकुलगुरू कालिदासांचे मेघदूत रंगमंचावर जिवंत अवतरलेले पहायला मिळणे हे भाग्यच आहे. मेघदूत हा निवांत वाचत अनुभवण्याचा विषय अशी सर्वसाधारण समजूत असल्यास नवल नाही. कालिदासाची प्रतिभाच एवढी की काव्याविष्कारात जेव्हा तो बोलतो तेव्हा तो हृद्य प्रतिमांच्या विलक्षण जगात घेऊन जात असतो. मेघदूतात त्याने विरही यक्षाचा पत्नीला संदेश देण्यासाठी निवड केलीय तीही एका मेघाची. कालिदासाशिवाय मेघ-दूताची निवड तरी कोण करणार? हे अजरामर काव्य मंचित करण्याचा विचार करणे हाच एक वेडाचार असे कोणीही म्हणेल. ज्यांना मेघदूत माहीत आहे ते तर नक्कीच. पण तसे झाले आहे. पण हे येथेच संपत नाही. मेघदूताचे नाट्यरुपांतर करणे, त्याच्या काव्याचा अनुवाद तितक्याच समर्थपणे करत रुढ नाट्यसंकेतांना फाट्यावर मारत काव्याने ओथंबलेले, कसलेही नाट्य नसलेले, विशेष घटनाही नसलेले आणि तरीही नृत्य व कालिदासाच्या प्रतिभेला कोठेही न उणावता येणारी गीते हे घेत रंगावृत्ती बनवणे आणि नाट्याचा परमोत्कर्ष त्यात साधता येणे हाही तसा सामान्यपणे अशक्यप्राय प्रकार!
आणि सर्वाहून अशक्यप्राय बाब म्हणजे सर्व अंध कलाकार घेऊन कालिदासाच्या प्रतिभेला जिवंत करत अक्षरश: डोळ्यांचे पारणे फेडायचा विचार करणे तर या मर्त्य भूतलावर तर अशक्यच! पण हे झाले आहे. अशक्यप्राय आव्हाने पेलायला घ्यायची सवय असलेल्या स्वागत थोरात या माझ्या मित्राने हे कालिदासाचे मेघभरले आभाळ पेलले आहे. रंगावृत्ती करणारे प्रतिभाशाली लेखक गणेश दिघे यांनी मेघदूताचे शाश्‍वत सौंदर्य त्यांच्या रंगावृत्तीत उतरवलेले आहे आणि अद्वैत मराठे, गौरव घावले, प्रविण पाखरे ते रुपाली यादव, तेजस्विनी भालेकर इत्यादी 19 त्याच ताकदीच्या खर्‍याखुर्‍या भूमिका जगणार्‍या कलावंतांनी या खरेच अपूर्व असलेल्या मेघदूतात कालजेयी रंग भरले आहेत. ज्यांनी पाहिले नाही त्यांनी काहीच पाहिले नाही. ज्यांनी ऐकले नाही त्यांनी काहीच ऐकले नाही.
अपूर्व मेघदूत या नाटकाच्या सुरुवातीसच परागंदा झालेला वयोवृद्ध, जर्जर असा कालिदास येतो आणि आपल्याला मेघदुताच्या कथागाभ्यात घेऊन जातो. यक्ष म्हणजेच कालिदास याची खात्री सुरुवातीलाच पटते. कालिदास आपल्यास्थानी यक्षाला कल्पितो हीच त्याच्या प्रतिभेची दिव्य खूण. यक्ष म्हणजे तसे सुखासीन, दैवी सामर्थ्य असलेले, कुबेराचा अलकापुरीत सुखनैव राहणारे लोक. या यक्षाला विरहाचा शाप मिळतो आणि प्रियेच्या, आपल्या यक्षिणीच्या विरहात त्याला एका पर्वतावर झुरावे लागते. हा विरही यक्ष आषाढाच्या पहिल्या दिवशी दिसणार्‍या मेघालाच आपला दूत बनवतो आणि आपला निरोप तिला द्यायला सांगतो. या काव्यात कालिदास वाटेत येणारी नगरे, अरण्ये, पर्वत यांचे हृदयंगम वर्णन करत आपल्या प्रियेला ओळखायचे कसे याचे परमोत्कर्षकारी काव्यमय वर्णनही करतो. नाटकात नद्या-नगरे, पशू-पक्षी यांची वर्णने नृत्य-संगीतातून जिवंत केली जातातच पण छाया-प्रकाशाचा अद्भुत खेळ त्यात आगळे-वेगळे रंग भरतात.
 हे नाटक अंध कलाकारांनी सादर केलेय हे खरेच वाटत नाही इतक्या त्यांच्या हालचाली सराईत आहेत. यामागे अर्थात दिग्दर्शक स्वागत थोरातांचे अविरत कष्ट आहेत. जवळपास 80 दिवस आणि रोज 6-7 तास तालीम त्यांनी घेतलीय. न कंटाळता कलाकारांनी त्यांना साथ दिली. रंगमंचावरील त्यांचा वावर, त्यांची कसलेल्या नर्तक-नर्तिकांची वाटावीत अशी नृत्ये या कष्टातूनच साकार झालीत. त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. या नाटकाची निर्मिती करण्याचे अलौकिक धाडस रश्मी पांढरे आणि वीणा ढोले यांनी करून मराठी रंगभूमीला एक मोठी देणगी दिली आहे. नाट्यरसिक त्यांच्या नेहमीच ऋणात राहतील. हे नाटक पाहिलेच पाहिजे, पण ते अंध कलाकारांनी सादर केलेय या सहानुभूतीच्या भावनेतून नाही. कालिदासाचे काव्य नाट्यरुप कसे घेते, कसे जिवंत केले जाऊ शकते या अद्भुत आणि यच्चयावत विश्‍वातील एकमात्र आविष्कारासाठी हे नाट्य पाहिलेच पाहिजे.
 संजय सोनवणी
Published in Weekly Chaprak, 

Saturday, June 24, 2017

Ceaseless Search for the Aryans!



Image result for genetics aryan issue






 I came across the article published in The Hindu “How genetics is settling the Aryan migration debate” by Tony Joseph.


The wonder is they have still embraced the outdated term like Aryans. The well-known fact is the invention of farming cannot be attributed to a single source. We have the oldest archaeological proof of farming from Zagros mountains dating back to 10000 years BC. In fact, no civilisation ever develops in isolation. There are always exchanges between the civilisations along with the independent innovations and inventions and language forms a majority part of any culture.


 When we speak of the ancient past, genetics as a modern tool being used to understand our ancestry, many times give conflicting results for the samples we have are very scarce and that too contaminated by the onslaught of nature. Not more than 101 skeletons have been genetically examined so far and yet the geneticist's can make any claim to explain riddles of the ancient history.


 For example, their report published in The Hindu boldly affirms that sometime around 2000 BC -1500 BC Indo-European language speakers did stream in India with their distinct culture and Sanskrit language! A major unanswered question is, how genetics told these experts which language they spoke and what material culture they really lived from their genes?  The report is fake on many counts when it claims the migration was negated by the research so far, as two major recent reports have dealt with the very issue of the PIE migration through genetics and had conveniently confirmed the migrations of the PIE speakers’, contrary to the claim made by The Hindu.


 A large team led by Morten E Alentoft examined about 101 sampled ancient individuals from Europe and Central Asia. They also used the archeological evidence of chariot burials (2000-1800 BC) to find the migration pattern. The report relies on the hypothesis of the linguists that ‘the spread of Indo-European languages must have required migration combined with social or demographic dominance and this expansion has been supported by archaeologists pointing to striking similarities in the archeological record across western Eurasia during the third millennium BC. The genomic evidence for the spread of the Yamnaya people from the Pontic-Caspian Steppe to both northern Europe and Central Asia during the Early Bronze Age corresponds well with the hypothesized expansion of the IE languages.'  (You may read this report on https://www.nature.com/nature/journal/v522/n7555/full/nature14507.html)


The report appeared in “Science” (Feb. 15) is based on the research of a large team of geneticists led by David Reich and Iosif Lazaridis of Harward Medical School. The DNA samples suggest that the Yamnaya people (DNA obtained from 4 skeletons) could have moved from Steppes 4500 years ago. This paper claims to have connected two far-flunged material cultures to specific genetic signatures. The report states that the team says they spoke a form of Indo-European language. Earlier it was considered that the origins of PIE were 6000 years ago. To meet this gap, hypothetically, it is being proposed that this may be secondary migration!


 It is also agreed by the genetic scientists that they cannot tell the language of people from their DNA's. I have read the original report and it is admitted that they cannot tell for sure the ancestry of the original PIE speakers of Bronze Age because this was not the independent culture but was an admixture of East European or Caucasus hunter-gatherers and near eastern people. So, genetically too, Yamna people were blending of three distinct ancestries. Hence, if at all PIE existed, its origin cannot be attributed to the archaic skeletons from which the DNA’s were extracted to make a big claim.

 

Migrations is a historical fact around the globe for many reasons, but it is a bold claim that the movement of the certain group of the people belonging to some hypothetical culture destroyed or impacted heavily the languages and cultures of the old inhabitants of the regions unless they could outnumber them. Also attributing migrations of about 4500 years ago to the invention of the agriculture is a farfetched lie because the invention of the agriculture dates back to not less than 10000 BC. Also one cannot credit ceratin group of the people for any invention that changed the face of mankind.


 It is a fact that the Vedic religion and its original adherents entered India sometime around 1000 BC but their number was not as high to outnumber local inhabitants or make a significant impact on local DNA structure. Rather they got assimilated in the local culture. The scriptural proofs indicate that the cultural and linguistic traits of India influenced the Vedic religion and language of the migrant's. Indo-European language theory is renaming of old Aryan race theory and European supremacist approach still works hard by their ceaseless misrepresentation of the Genomic analysis to make out over and again their theory!


 Comparison of the modern and ancient DNA cannot tell the story of mankind because DNA samples are very few and prone to give conflicting results as they have in recent past. Still, the report of Hindu theoretically considers there were two groups, one that came to India tens of thousand years ago and other came to India 4,000 to 3,500 years ago. This second group is claimed to be Indo-Aryan when there is no proof what was DNA’s of the Indo-Aryans because genetics do not tell us racial or linguistic traits.

The author of this article published in Hindu, Tony Joseph, however, cautions us to treat population genetic models with caution because it works on the assumption which may be wrong or limited to the scope of their study!  The main assumption that those migrated about 4,000 to 3,500 years ago were speakers of the Indo-Europen language is such a baseless and unscientific assumption that the whole conjecture falls apart. 


The issue of the ancient humanities is complex. Origin of the languages cannot be attributed to any special group of the people. Geology might be playing a significant role in the origin of different languages. The spread of the cultures does not necessarily require demographic migrations. Migrations do not impact local cultures to the extent of erasing their language and cultures. The issue is actually overrated by the people who are in search of hypothetical Superman! 

...मग जगबुडी येणारच!


Inline image 1

भविष्यात जग कसे असावे व कसे असू शकेल याची चर्चा करत असतांना जगाबाबतचीच इतर जी भाकिते वर्तवली जातात तीही आपण पाहिली पाहिजेत. स्टिफन हॉकिंग्ज या विश्वविख्यात शास्त्रज्ञाने येत्या शंभर वर्षात एकतर मानवजातीला परग्रहावर रहायला जावे लागेल किंवा मानवजातच नष्ट होईल असे भाकीत वर्तवले होते. त्यांच्या भाकितामुळे जगभर खळबळ उडणे स्वाभाविक होते. ज्या वेगाने मनुष्य पृथ्वीतलाचे वाटोळे करत निघाला आहे तो वेग पाहता मानवजात नष्ट होईल किंवा त्याला अन्यत्र कोठे परग्रहावर आश्रय शोधावा लागेल हे भय संवेदनशील विचारवंतांना व वैज्ञानिकांना वाटत असल्यास नवल नाही. पण या भयाकडे आपण गांभिर्याने पाहिले पाहिजे.

खरे तर कधी ना कधी मानवजात नष्ट होणार आहे ही कल्पना अगदी अनेक धर्मशास्त्रांतही प्राचीन काळापासून येत आलेली आहे. जलप्रलय ही सर्वात जुनी कल्पना. पृथ्वीतलावर पाप वाढले की जलप्रलय येतो व मनुष्य व अन्य प्राणीजात नष्ट होऊ लागते. पण प्रभुच्या कृपेने मनू किंवा नोहाची नौका काही भाग्यवंतांना वाचवते व जीवनाचे रहाटगाडगे पृथ्वीवर पुन्हा सुरू राहते अशी ती कल्पना आहे. "कयामत का दिन..." अमूक अमूक आहे अशा घोषणा अधून मधून होतच असतात. अलीकडे माया कॅलेंडरचा आधार घेत पृथ्वी निबिरु नामक एका ग्रहाला धडकणार असून त्यात प्रचंद सुनामी येत मानवजात नष्ट होईल असे भाकीत वर्तवण्यात आले होते. ही घटना २१ डिसेंबर २०१२ रोजी घडणार असेही ठामपणे सांगण्यात आले होते. याचा परिणाम म्हणे असा झाला की चीनमधील एका माणसाने आधुनिक नोहाची नौकाच बनवली. अर्थात असे काही न घडल्याने हा आधुनिक नोहा निराश होण्यापलीकडे काही झाले नाही. अशा अनेक भविष्यवाण्या झाल्या आहेत, लोक घाबरलेले आहेत आणि काही तर "आता मरणारच आहोत तर आहे ते विकून मौजमजा करून घ्या!" म्हणत सर्वस्वाला मुकले आहेत. आपल्याकडेही १९७९ मध्ये अमेरिकेची अवकाशातील स्कायलॅब कोसळण्याने सर्वच नष्ट होणार या बातमीने हाहा:कार उडवला होता हे अनेकांच्या स्मरणात असेल. अनेकांना असे भय पसरवण्यात कदाचित विकृत आनंद होत असेल. कडव्या धार्मिक लोकांचा यात सर्वात मोठा वाटा असला तरी जीवसृष्टीचे नष्ट होणे ही निव्वळ कवीकल्पना नाही. 

खरे म्हणजे ही नष्ट व्हायची परंपरा अव्याहत सुरुच आहे. गेल्या दोन शतकांत ११ प्राणीप्रजाती केवळ माणसाने नष्ट केल्या आहेत. नैसर्गिक कारणांनी नष्ट होणा-या जैव प्रजाती वेगळ्या.  गेल्या साडेसहा कोटी वर्षांच्या इतिहासात प्राकृतिक कारणांनी किमान पाच वेळा पृथ्वीवरील तत्कालीन जीवसृष्ट्या पुरेपूर नष्ट झाल्या आहेत. ही प्राकृतिक कारणे म्हणजे ज्वालामुखींचे उद्रेक, हिमयुगे अथवा छोट्या उपग्रहांची पृथ्वीशी झालेली टक्कर. दुसरी कारणे दिली जातात ती जैविक उत्क्रांतीच्या टप्प्य्यांवर आधीच्या प्रजाती नष्ट झाल्या हे. दुसरे कारण हे अधिक संयुक्तिक असले तरी आता मात्र असा सहावा टप्पा न येता मनुष्य स्वत:च्याच हव्यासापायी सहाव्या टप्प्याच्या उंबरठ्यावर उभा आहे असे नादिया ड्रेक या पर्यावरणतज्ञही म्हणतात. आज दिवसाला बारा जैव प्रजाती रोज नष्ट होत आहेत. त्या नैसर्गिक रित्या नष्ट होत असल्या तरी मानवजातीचा त्यात कसलाही हातभार नाही असे म्हणता येत नाही. किंबहुना मनुष्य असा बेजबाबदार प्राणी आहे की त्याला कसलीही जबाबदारी घ्यायची इच्छा नसते.

मनुष्याने औद्योगिक क्रांतीनंतर नैसर्गिक साधनस्त्रोतांचा बेसुमार उपसा करत निसर्गाचे संतुलन पुरते घालवलेले आहे. पुढे हा वेग वाढताच राहील. दुसरी बाब अशी की माणसाने कृत्रीम साधनांच्या बळावर आपले आयुष्यमान वाढवले असले तरी लोकसंख्येचे प्रमाण हे नैसर्गिक समतोलाशी विसंगत बनलेले आहे. पर्यावरणाबाबत सारेच जरी बोलत असले तरी प्रत्यक्षात प्रामाणिक प्रयत्नांची वानवा आहे हे आपण नुकत्याच झालेल्या पॅरिस कराराची कशी लगोलग वासलात लावायचे प्रयत्न सुरु झाले त्यावरून लक्षात येईल. एकंदरीत जीवसृष्टीला लायक असलेला हा एकमात्र पृथ्वी नामक ग्रह, पण त्यावरील अत्याचार "अमानवी" म्हणता येतील असेच निघृण आहेत. यामुळे सर्वच प्रजातींच्या एकंदरीतच जगण्याच्या पद्धती, जैविक संरचनेतील बदल आणि त्यातून उद्भवणारी संकटे यातून आपण स्वत:च्व्ह स्वत:साठी विस्फोटक "जैविक बॉम्ब" तयार करत नेत असून त्यात आपलाच नव्हे तर अन्य जीवसृष्टीचाही विनाश आहे हे आपल्या लक्षात येईल. अर्थात त्याची आम्हाला फारशी पर्वा आहे असे दिसत नाही.

नैसर्गिक कारणाने, उत्क्रांतीच्या टप्प्यांवर आपल्या पुर्वज मानव प्रजाती नष्ट झालेल्या आहेत. निएंडरथल मानव नष्ट होऊन फार फार तर ४० हजार वर्ष झालीत. आजचा माणुस त्यानंतर उत्क्रांत झालेला आहे. सहा अब्ज वर्षांच्या पृथ्वीचा इतिहासात हे चाळीस हजार वर्ष म्हणजे अत्यंत किरकोळ आहेत. पण आजच्या आहे त्या होमो-सेपियन प्रजातीच्या माणसातून किंवा आहे हा मानव नष्ट होत नव्याच जैविक-संरचनेतुन पुढचा नवा मानव उत्क्रांत होईल अशी नैसर्गिक स्थितीच जर आम्ही ठेवली नाही तर मानव प्रजातीचा प्रवाह कोठेतरी थांबणार अथवा हे नक्कीच आहे. आणि या प्रदुषित पर्यावरनातून समजा नवा मानव उत्क्रांत झाला तरी तो बौद्धिक व शारिरीक दोषांनी पुरता ग्रासलेला नसेल असे कशावरून? समजा तो त्या प्रदुषित स्थितीला तोंड देण्यास समर्थ जरी बनला तरी त्याचे जैव विश्व मात्र अत्यंत आकुंचित झालेले असेल. अर्थात त्याची पर्वा या होमो-सेपियन्सला आहे असे मात्र फारसे दिसत नाही. 

स्टिफन हॉकिंग्ज यांनी वर्तवलेली भविष्यवाणी एका शास्त्रज्ञाची नसून मानवाच्या बेमुर्वतखोरपणातून आलेल्या उद्वेगाची ती अपरिहार्य परिणती आहे. समजा पृथ्वी नष्ट व्हायला शंभर वर्ष लागतील किंवा काही लाख वर्ष. प्रश्न तो नसून आपण जगातील जीवसृष्टीचा नैसर्गिक क्रमविकासच खुंटवतो आहोत आणि आपला शेवट आरोग्यदायी वातावरणात व्हावा असा प्रयत्न न करता आपल्याच हाताने आपली कबर खोदतो आहोत. याचा उद्वेग सुजाणांना वाटने स्वाभाविक आहे.

परग्रहावर रहायला जावे लागेल याचा मतितार्थ एवढाच की "परलोका"त जावे लागेल. कारण किमान आपल्या ग्रहमालिकेत जीवसृष्टी असलेला एकही ग्रह नाही. मंगळावर कृत्रीम वातावरण निर्माण करत काही थोके जगुही शकतील पण ते किती काळ परवडेल हा थोडक्यांचाही प्रश्न आहे. समजा दुस-या ता-यावर जीवसृष्टी सापडली आणि माणसाने तिकडे "ग्रहांतरित" व्हायचे ठरवले आणि सध्याचा अंतराळ प्रवासाचा वेग दुप्पट-तिप्पट जरी करण्यात यश आले तरी किमान दोन-तीन पिढ्या अंतराळयानांतच खपतील. हेही किती जणांना परवडेल हाहे प्रश्न आहेच. शिवाय तेथे आधीच अस्तित्वात असलेली जीवसृष्टी माणसांना का आणि कशी सामावुन घेणार? थोडक्यात परग्रहावर रहायला जावू हे म्हणने शेख-चिल्ली स्वप्न आहे. 

आपल्याला शाश्वत जीवनशैलीचाच अंगीकार करत आज बिघडत गेलेले पर्यावरण किमान आहे असेच राहील हे पाहिले पाहिजे. उंटावरची शेवटची काडी कधी पडेल हे ना धर्मवेत्ते सांगू शकतात ना शास्त्रज्ञ कारण अखिल जीवसृष्टीच परस्परांची अशा साखळीत गुंतलेली आहे की नेमकी कोणती कडी तुटली तर सर्वविनाशक चेन रिऍक्शन सुरू होत संपुर्णच कडेलोट होईल हे "जगबुडी"चे भाकीत करण्याएवढे सोपे नाही. विज्ञानाचा आधार हा विशिष्ट मर्यादेपर्यंतच असू शकतो कारण विज्ञानालाही आजच्या मानवी प्रजातीच्या बौद्धिक सर्वाधिक झेपेच्या मर्यादा आहेत हे विसरून चालणार नाही. देव-आणि धर्मालाही त्यापेक्षाही अधिक मर्यादा आहेत हे इतिहासानेच सिद्ध केलेले आहे. आपल्या मर्यादा न ओळखण्याची गंभीर चूक आपण करीत आहोत. अशा स्थितीत स्टिफन हॉकिंग्जसारख्यांनाही उद्वेग नाही येणार तर काय! 

शाश्वत जीवनशैली हीच भविष्यातील आदर्श जीवनपद्धत असू शकते. किंबहुना "एक जग : एक राष्ट्र" या संकल्पनेकडे जावे लागेल ते याच पद्धतीला आदर्शभूत मानत एका नव्या आदर्शाकडे जाण्यासाठी. अन्यथा जगबुडीच्या दिशेने आपण निघालेलोच आहोत. ही जगबुडी कोणी देव, अल्ला वा ईश्वरामुळे येणार नसून आम्हाच हव्यासखोरांमुळे येणार आहे.

(Published in Dainik Sanchar, Indradhanu supplement.)


Thursday, June 22, 2017

"गो-ब्राह्मण प्रतिपालक", "अफजलखान"....वगैरे...


Image result for shivaji maharaj hd wallpaper for facebook cover



महाराष्ट्रात सध्या जुनाच वाद पुन्हा चर्चेला आलेला आहे. या वादाचे तीन पदर आहेत. यांचा आपण साकल्याने विचार करण्याचा प्रयत्न करु.

१. शिवाजी महाराज व ब्राह्मण संबंध
२. शिवाजी महाराज व मुस्लिम संबंध
३. शिवाजी महाराज व रयत आणि रयतेबाहेरील असणा-या हिंदू-मुस्लिमांशी संबंध.

या पहिल्या, म्हणजे शिवाजी महाराज व ब्राह्मण संबंधाबाबत प्रचंड विवाद आहे. शिवाजी महाराज "गो-ब्राह्मण प्रतिपालक" होते की नव्हते हा तो वाद आहे. महाराज तसे होते हे दाखवण्यासाठी काही त्यांचीच पत्रे तसेच संभाजीमहाराजांची दानपत्रे व बुधभुषणममधील उतारे दिले जातात. त्यामुळे हे संबोधन शिवाजी महाराजांना, त्यांनी ते स्वत:हून घेतले नसले तरी त्यांना ते किमान मान्य होते, असे म्हणायला हरकत नाही. पण त्यातून सिद्ध काय होते? तर काहीच नाही. यावरुन शिवाजी महाराजांची राजनीति ठरवणे अशक्यप्राय आहे.

मुळात वेद आणि ब्राह्मण माहात्म्य अकराव्या शतकोत्तरापासुनच भारतियांच्या मनावर एवढे ठसवले गेले होते की त्याचा प्रभाव तेराव्या शतकापासुनच्या संतांवरही होता. तुकोबांचे काही अभंगही वेदमहत्ता मान्य करतांना दिसले तरी नवल वाटायचे कारण नाही. तेराव्या शतकातील विसोबा खेचरांना आपल्या षट्स्थळ या ग्रंथात आगमांपेक्षा वेद हे दुय्यम आहेत असे स्पष्टपणे म्हटले असले तरी आवश्यकता नसतांना त्यांना वेदांना दुय्यम स्थानी का होईना ठेवावे लागले. खरे तर वेद-वर्णाश्रम विरोधी जी बलाढ्य हिंदू तत्वपरंपरा होती ती त्या काळात आहोटीला लागलेली होती. वैदिकांनी त्यासठी पुराणांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून वेद व ब्राह्मण माहात्म्य सर्वसामान्यांच्या गळी उतरवले हे एक वास्तव आहे. समजा छत्रपतींना किंवा कोणालाही "गोब्राह्मणप्रतिपालक" ही पदवी वापरावी लागली असेल तर ती त्या काळातील संपुर्ण समाजजीवनाची शोकांतिका होती. त्याबद्दल कोणाला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील व मुलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असेल तर ते दुर्दैवी आहे. कोणत्याही एका समाजघटकाबाबत आपण पक्षपाती आहोत असे दाखवावे लागणे, मग ते धार्मिक का कारण होईना, दुर्दैवी होते याची खंत आम्हाला का नाही? ही धर्माचार्यांनी लादलेली बाब नसेलच वा तशी मन:स्थिती बनवली नसेलच असे कसे म्हणता येईल?

संभाजी महाराजांनी बुधभुषणमच्या सुरुवातीलाच म्हटले आहे की, "...त्या शिवाजी राजांचा – भोवतीच्या साऱ्या राजेलोकांना शिरोभूषण वाटणारा, काव्य, साहित्य, पुराण, संगीत, धनुर्विद्या यांचे ज्ञान घेतलेला मी पुत्र – शंभूराजे या नावाने प्रसिद्ध आहे. पुराण ग्रंथांचे विवेचन करून, त्यातील अर्थपूर्ण भाग निवडून मी शंभू हा बुधभूषणम् नावाचा सद्ग्रंथ रचीत आहे."

या विधानावरुनच मुळात संभाजी महाराजांनी हा ग्रंथ लिहिलाच असेल तर तो पुराणांवर आधारित आहे हे स्पष्ट होते. यात वेदांचा कसलाही उल्लेख नाही ही बाबही येथे उल्लेखनीय आहे. खरे तर शिवकालाआधी "गो-ब्राह्मण प्रतिपालक" ही पदवीच मुळात कोठे आढळत नाही. राजा हा "भूपाल" असतो ही मान्यता मात्र सर्व वैदिक व अवैदिक ग्रंथ देतात. पुराणांतही ही संज्ञा कोठे आलेली नाही. म्हणजेच ही त्या काळाच्या परिस्थितीत शोधली गेलेली पदवी होती असे आपल्याला दिसते. पण ब्राह्मण हा श्रेष्ठ होय ही पौराणिक कल्पना आहे आणि पुराणांचा तत्त्कालीन समाजावर प्रभाव होता हे शंभुराजांनीच बुधभुषणमध्ये दाखवून दिले आहे.

पण वास्तव राजकारणात शिवाजी महाराजांची भुमिका विपरित परिस्थितीत स्वराज्य उभे करू पाहणा-या कोणत्याही अलौकीक राजपुरुषाची होती तशीच होती. ती म्हणजे स्वराज्य निर्मितीसाठी जेही उपयुक्त आहेत त्यांचा त्यांच्या स्थानाचा वापर करून घेणे, आणि शिवाजी महाराजांनी तो केला आहे. जे मुस्लिम त्यांना साथ द्यायला तयार होते त्यांची साथही त्यांनी घेतलेली आहे. अफजलखानाबद्दल त्यांना ममत्व असण्याची शक्यताच नाही कारण तो शत्रूच्या गोटातील होता आणि युद्धसन्मूख झालेला होता. शिवाजी महाराजांवर त्याने स्वारी केली तेंव्हा वाटेत येतांना त्याने मंदिरे फोडली, याचा अर्थ अन्यत्र तो स्वा-या करत होता तेंव्हा मंदिरे फोडतच नव्हता असे नाही. तो शिवाजी महाराजांवर चालून आला होता, म्हणजे शत्रूच होता आणि त्याला मारणे हे प्रथम कर्तव्यच होते. त्याने मंदिरे न फोडता चाल केली असती तर महाराजांनी त्याला खुशाल स्वराज्य गिळू दिले असते काय? अफजलखान काय किंवा त्याचा ब्राह्मण वकील काय, हे शत्रुच्या गोटातील होते त्यामुळे त्यांची हत्या करणे अपरिहार्य होते आणि ते शिवाजी महाराजांनी केले. "गो-ब्राह्मण प्रतिपालक" म्हणवणा-या शिवाजी महाराजांनीच ब्राह्मणाचे हत्याही केलेली आहे आणि प्रसंगी खडसावलेही आहे. उपाधीकडे तारतम्याने पहावे लागते ते त्यामुळेच. शिवाजी महाराज व मुस्लिम यांच्यातील संबंधही अशाच प्रकारचे आहेत.

शिवाजी महाराजांना इस्लामियांबद्दल मनातून खरेच प्रेम असेल काय? दोन्ही पक्ष यात भरपूर गोंधळ घालतात. शिवाजी महाराजांना कोणत्या धर्माचे राज्य आणायचे होते असे समजणे हाच मुर्खपणा आहे. ते हिंदू होते म्हणून स्वराज्य, मग दिल्लीच्या पातशाहीला धुडकावून राज्य स्थापणारे मुस्लिम शासक त्यांचे स्वराज्य बनवत नव्हते काय? त्यांची धर्मप्रेरणा महत्वाची होती की सत्ताप्रेरणा? मुस्लिमांबद्दल परधर्मीयाबाबत वाटेल तेवढी साशंकता, काही प्रमाणातील राग हा त्यांच्याही मनात असणे स्वाभाविक आहे, पण शिवाजे महाराजांचा संघर्ष इस्लाम विरुद्ध हिंदू होता असे म्हणणेही आततायी आहे. समजा तत्कालीन सत्ता कोणत्याही धर्माच्या असत्या, अगदी हिंदुही असत्या, तरी शिवाजी महाराजांसारख्य स्वतंत्र बाण्याचा मानसाने स्वराज्य बनवलेच असते. अशा स्थितीत त्यांच्या शत्रुंबद्दल काय म्हणता आले असते?

सत्ता स्थापना ही महत्वाची ठरते तेंव्हा धर्म उत्प्रेरक होऊ शकतो पण तो काही मुख्य प्रेरणास्त्रोत असू शकत नाही. शत्रुच्या गोटांत, परधर्मीय असले तरी, त्यातील त्यातल्या त्यात मृदू गोटांशी प्रसंगी सख्यही करावे लागते आणि तेही शिवाजी महाराजांनी केलेले आहे. त्यांना मित्रही सर्वांत मिळाले आणि शत्रूही सर्वांत मिलाले. त्यामुळे शिवाजी महाराजांची राजनीति आणि धर्मधोरण त्याच परिप्रेक्षात पहावे लागते. बाबा याकुत यांनाही त्यांनी गुरू मानणे हा त्यातीलच एक भाग झाला. त्यांच्यात आजच्या व्याख्येतील साम्यवादी, सेक्युलर, समाजवादी किंवा लोकशाहीवादी शोधणे म्हणजे "आपल्याला हवा तसा शिवाजी ख-याखु-या शिवाजीमहाराजांवर लादणे." असे करणे इतिहासासाठी उपयुक्त नाही.

त्यांना वास्तव जीवनातील खरेखुरे "गो-ब्राह्मण प्रतिपालक" मानत राजकारण करणारे मुर्ख आहेत कारण तसे वास्तव नाही. ब्राह्मण मंत्री केले कारण त्या काळात त्यांच्याच नव्हे तर मुस्लिम सत्तांचे काही मंत्री व वकीलही ब्राह्मणच असत कारण त्यांना स्थानिक व्यवस्थांची माहिती असे व ते अनेक भाषाही शिकले होते. तो काही त्यांचा दोष नव्हे. उलट प्राप्त स्थितीत नवे शिकून घेत जगण्यासाठी त्याचा उपयोग करून घेण्यात काहे वावगे मानायचे कारण नाही. येथील असंख्य अवैदिक सरदारांनीही तेच केले. कारण मुस्लिम सत्तांची अपरिहार्यता तोवर पुर्णपणे ठसलेली होती. जशी वेदमहत्ता लोकांच्या मनावर पुरती बिंबलेली होती. किंबहुना मध्ययुगीन भारतीय मानसिकता हे वेगळे कडबोळे आहे. या स्थितीत शिवाजी महाराज स्वराज्य बनवू इच्छित होते. अशा स्थितीत मित्र मिळणे दुरापास्त होते. तशात त्यांना जर मिळतील ते ब्राह्मण काय आणि मुस्लिम काय, यांना सोबत घेत संघर्ष करायचा असेल तर त्यांना मुळात धर्माला प्राधान्य देणे शक्य नव्हते, व ते त्यांनी दिलेलेही नाही.

ते धार्मिक होतेच. तुळजाभवानीचे भक्त होते. अवैदिक शाक्त/शैव परंपरेचे अभिमानीही होते. सार्वभौमता घोषित करायची तर राज्याभिषेक हा पुराणांनी दाखवलेला मार्ग त्यांच्यासमोर होता. तो करण्यात काय अडथळे आले याचे विवेचन करण्यात मला रस नाही. पण या वैदिक राज्याभिषेकामुळे त्यांना आपल्याच पत्न्यांशी पुन्हा विवाह करावा लागला, म्हणजे हिंदू पद्धतीचे आधीचे विवाह वैदिक धर्मियांनी अमान्य केले होते असाच त्याचा अर्थ होतो. अर्थात शिवाजी महाराजांनी नंतर शाक्त पद्धतीनेही राज्याभिषेक करुन हिंदू परंपरेला पुन्हा स्विकारले. वैदिक राज्याभिषेक महत्वाचा वाटला याचे कारण वैदिकांनी निर्माण केलेले वेदगारुड जनमानसावर ठसलेले होते हे आहे. लोकमान्यतेसाठी ते गरजेचे वाटले असले तर नवल नाही.

वेदोक्ताचा अधिकार फक्त वैदिकाला असतो. शिवाजी महाराजांनाच तेवढी ही परवानगी मिळालेली होती हे वैदिक धर्माचे प्रकांड पंडित लो. टिळकांनाही माहित होते. वेदोक्त प्रकरणात ते म्हणाले होते की, "या काळात ब्राह्मण व शुद्र असे दोनच वर्ण राहिले असून शिवाजी महाराजही शूद्रच होते. तथापि त्यांच्या कार्यावर मोहित होऊन तत्कालीन महाराष्ट्रातील कर्त्या पुरुषांनी ( म्हणजे वैदिक धर्मीय ब्राह्मणांनी) खास सवलत म्हणून त्यांना क्षत्रियत्व बहाल करून गागाभट्टाच्या हस्ते वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक केला ; पण त्या वेळी भोसले घराण्याची सर्व धर्मकृत्ये पुराणोक्तच करावीत अशी परंपरा वैदिक ब्राह्मणांनी घालून दिली होती. हीच परंपरा पाळली गेली पाहिजे. छत्रपती घराण्याशिवाय अन्य मराठे क्षत्रिय नाहीत. सबब त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही . . . ." (संदर्भ : "राजर्षी शाहू छत्रपती" ; डॉ जयसिंगराव पवार , पृष्ठ ३५, "लोकमान्य टिळक यांचे चरित्र" , न. चिं. केळकर)

त्यामुळे "गो-ब्राह्मण प्रतिपालक" या संज्ञेकडे तारतम्याने पाहिले पाहिजे. "ब्राह्मणालाही दंड देता यावा म्हणून राज्याभिषेक करुन घेतला" हे विधानही असेच भंपक आहे. खरे तर कलीयुगातच काय कोणत्याही युगात क्षत्रीय हा मुळात वर्णच नव्हता, त्यामुळे क्षत्रीयत्वाचेही स्तोम असेच आहे. अर्थात याबाबत मी पुर्वीच बरेच लिहिले असल्याने येथे एवढेच पुरे.

शिवाजी महाराज हे राजनीतिकुशल लढवैय्ये होते. त्यांना कोणत्याही धर्मप्रेरणेने ग्रासलेले नव्हते. धर्माचा उपयोग गौण उत्प्रेरकाप्रमाणे झाला असला तरी ती त्यांची इच्छा होती. दादोजी कोंडदेव किंवा रामदासांचे त्यांच्या प्रेरणांमध्ये कसलेही स्थान नव्हते, असुच शकत नव्हते. दादोजी आदिलशहाचे कोंडाणा व पुरंदरचे सुभेदार होते. एक सुभेदार व त्याच्या कार्यक्षेत्रातील एक जहागीरदार यांच्यात असतील तेवढेच संबंध त्यांच्यात होते. रामदासांचा शिवरायांशी संबंध आला तोच मुळात राज्याभिषेकानंतर. त्यामुळे त्यांना गोवत इतिहासाचे विद्रुपीकरण करणारेही तेवढेच दोषी आहेत.

शिवाजी महाराज त्यांच्या काळाचे अपत्य होते. वेद, ब्राह्मण माहात्म्य वगैरेंचा त्यांच्यावर प्रभाव असनेही स्वाभाविक होते. पण प्रत्यक्ष वेळा आल्या तेंव्हा त्यांनी त्या पगड्यालाही दूर सारले आहे. कारण धर्मप्रेरणेने त्यांनी स्वराज्य स्थापना केलेली नव्हती. त्यामुळे त्यांच्या जीवनाला वारंवार कोणत्या ना कोणत्या धर्माचे संदर्भ जोडत त्यांच्याबद्दल वारंवार हिरीरीने चर्चा करणे गैर आहे. जन्माने हिंदू असल्याचे जे त्या काळाच्या चौकटीतले नैसर्गिक संदर्भ त्यांच्या जीवनाला आहेत ते आहेतच. पण "गो-ब्राह्मण प्रतिपालक", "अफजलखान", "हिंदू स्वराज्य" वगैरे भाकड गोष्टींना केंद्रीभूत धरत जी चर्चा केली जाते त्यात  शिवाजी महाराजांचे आपण अवमुल्यन करतो आहोत याचे भान ठेवले पाहिजे!


Wednesday, June 21, 2017

Genomics : A Geological connection!

 Image result for aryans dna

No matter what branch of the science they use, whether archaeology, scriptural, linguistics or genetics, there are two sides standing opposite of each other to prove Aryan migration or no migration using the same data. They just have to either misinterpret, distort or fake the extant proofs  Why so? And what could be the truth?

Indo-Aryan migration theory proponents were the westerners those wanted to pull back their history far back in order to prove the whites were superior. Since the Aryan term came forth from Rig Veda, they had to add Vedics to in the Aryan fold to make out their theory. Horses and Chariots became the centre of their fancy as Rig Vedic Aryans rode chariots driven by the domesticated horses, they were fair, tall, blue eyed and with golden hair were made heroes out of the fancied idea of a superior race!

The theory of Aryan origin has taken so much so turns and twists that it is highly difficult to understand its course. When Aryan Race Theory got defamed, thanks to Hitler, they came forth with linguistic theory supported by archaeology. The main attention was focused on the horse-chariot burials. It was utterly forgotten that though Vedic Aryans performed horse sacrifices it was not their custom to bury the dead men with horses and chariots. The people of ancient times roaming in the territories of Pontiac Stepps and nearby areas used domesticated horses because they were still pastoralists and horses available in these regions. 

The horses make no tribe superior in warfare and language. Still, horse-chariot issue and the burials became a significant basis to draw the migration maps for IE proponents. They forgot that the technologies do spread by many ways including religious concepts. There is no necessary need for physical migration of the people. Vedic religion finds no parallel in the so-called IE world except for Avesta. Elsewhere we do not find so much so affinity in linguistic and religious similarity. They had migrated to India, yes, but their number was too a small to cause any genetic impact on the huge populations here. 

IE language group is not caused by the demographic migrations. It has no biological connection as suggested by Talageri. Genetics does not confirm the language spoken by the people. Genetical proofs do not indicate the migrations but show the affinity with the geological and geographical features wherever so-called IE languages are spoken. The regional markers do derive from the geological features of the land where human being lived for generations. The geology and minaral distribution of the landmass decide general psychology and languages of the people. Rather human genetics is influenced by these physical factors and none else.

ANI (Ancestral North Indians) and ASI (Ancestral South Indians) DNA variation belongs to the geological construction of both the regions. They vary in great degree. You may refer to geological reports and can see clearly what demarcates ANI and ASI. The same thing applies to the South Asia and most of the Europe where we find the whole land mass have similar geological features and hence the languages spoken in these regions find some or other general similarities or affinity. The similarities in the mix of DNA elements like R1a and others in varied percentage is most likely is owed to the geological and geographical factors. It does not prove the migrations but the degree of impact of the geological factors on the DNA. Rather R1a Haplogroup is not the migration marker but is a geographical marker which is influenced by the geology of the region the person in question lived.

Indus civilisation had trade connections with the Semitics from for at the least 1500 years. Through the vast course of the time, North-Western Indians and Iraqi people’s DNA too should find some affinities to count on. But the geneticists are silent on this part. Indians have travelled for the trade not only taking sea route but the land route that courses through Iran. The men must have come in the intimate contacts with the women of society delving in the en route regions in question. The DNA results would be stronger to suggest an Indo-Semitic connection but it is not yet looked for! 

However, the linguists like Graziadio Ascoli was first to scientifically advocate this relationship in 1943 though it was proposed first by Richard Lepsius in 1836! However, this discussion was limited to the relationship between Semitic and Indo-European languages. The similarities are not negligible. However, the supremacist European scholars kept on their research limited to find the original homeland of the mysterious Indo-Europeans and their movements in different parts of the globe. However, R1a is not traceable in the Semitic populations. Their geology is quite different! 

The haplogroup was first identified in the 24000-year-old remains of so-called Malta boy from Altai region. It is assumed that R1a probably branched from R1* after last glacial maximum. Geneticists assume that place of the origin of R1a is Central Asia and Southern Russia and from there they migrated to Europe and elsewhere. Based on this insignificant raw material various scholars have used genetical data to assume the periods when the migrations took place.  

It also is claimed that the European Neolithic farmers genome miss the R1a in the European autosmal admixture. Hence it is claimed that R1a did not come to Europe with Neolithic farmers only propagated from Eastern Europe. However, the fact that geneticists admit is that modern Sardinians also lack this admixture! Did they check geological features of Sardinia?

Ancient DNA testing has confirmed the presence of haplogroup R1a1a in samples from the Corded Ware culture in Germany (2600 BCE), from Tocharian mummies (2000 BCE) in Northwest China, from Kurgan burials (circa 1600 BCE) from the Andronovo culture in southern Russia and southern Siberia, as well as from a variety of Iron-age sites from Russia, Siberia, Mongolia and Central Asia. New found skeletal remains also have been examined.

Now, the billion dollar question is, the Indo-European migrators that possessed R1a  could migrate to the difficult terrains of Europe and North India, but why they did not migrate, even in small branches, to North Africa and South India? What prohibited their journey to these lands that could influence their superior language and culture over the local populace?

Why there is no Indo-Semitic haplotype has been traced so far when all probabilities there was relationship over the millenniums between the Indians and the North Africans and interaction of Central Asian populations with both as well?

I think, the genetics too, like linguistics has been misused. Both the parties to the debate, i.e. indigenous Aryan Theory proponents and Aryan Migration Theorists are misusing the data and using the same to make out their rustic theories. I have proposed first time the relationship between geology and the language. I am sure and will prove that there is corelationship between certain percentages of genetic markers and the local geology and geography. Geology of the regions does impact the chemistry of the human body (and genetic structures) living for generations moulding their psychology and so the material expressions through language and culture. The overall geology of Eurasia is a single plate though is filled up with different geological features those mark the individual linguistic boundaries as well though the basic structure remains moreover common to varying degree. There are other factors as well that influence the genetic structures of the people with regions but we will discuss this in great detail in the next installment.

Trying to find caste dynamics from genomic data is a foolish adventure. Trying to prove migrations of the people speaking some hypothetical language too is misleading and is not a good science. Using the same data attempting to prove the Aryans were indigenous is another falsity studded with supremacist approach. The migrations is the fact and will remain a trend in future as well. The M17 distribution or R1a is not a product of the migrations but it is natural development caused by the geological features of the lands people live in.

We haven't been told what was the population of so-called PIE speakers. We are not told how many so-called Indo-Aryans entered India. Nor it is considered how many migrated out from India from its local stock. It is not considered the formation of R1a or other admixture might have related to some other unknown and yet inexplicable phenomena. Why Indo-Semitic gene flow is not traceable when in all probability it should form a major genetic structure of the North-Indians and Middle –East populations along with the Iranians and Afghans!

It appears that the racial war fought on academic grounds has reached to the despicable proportions. They misused the linguistics, archaeology and now using the baby science that is called genomics!

-Sanjay Sonawani



Sunday, June 18, 2017

फसव्या दाव्यांना ‘इंधनाचा’ फोल डोस!

फसव्या दाव्यांना ‘इंधनाचा’ फोल डोस!

भारतीय अर्थव्यवस्थेची सध्या झालेली नाजूक अवस्था पाहता सरकार तेलावरील कर कमी करेल हा आशावाद झाला. कोणत्याही करामुळे उत्पन्नाची चटक लागलेले सरकार त्यावर पाणी सोडेल, ही आशा करता येत नाही. जीएसटीमधून सध्या तेलाला वगळले आहे ते यामुळेच. थोडक्यात आंतरराष्ट्रीय तेलदरांशी जुळवून घेण्याचा सरकारी दावा कुचकामी आहे.
तेलाचे आंतरराष्ट्रीय भाव सातत्याने बदलत असतात. गेल्या काही वर्षांत अमेरिकेने तेलाचे विक्रमी उत्पादन सुरू केल्याने आंतरराष्ट्रीय किमती जुलै १४ ते जानेवारी १६ या पंधरा महिन्यांच्या काळात जवळपास ७५% नी खाली आल्या. आता किमती किंचित वर जाऊ लागल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी आपले रोजचे भाव आंतरराष्ट्रीय चढ-उताराशी घालण्याचा निर्णय घेतला आहे व शुक्रवारपासून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. इंधनाच्या व्यवहारात यामुळे जास्त पारदर्शकता येईल आणि तेल कंपन्यांचे रोजच्या चढउतारामुळे नुकसान तर होणार नाहीच, पण ग्राहकांना थेट फायदाही मिळेल, असा तर्क या निर्णयामागे आहे. या आधी तेल कंपन्या दर पंधरा दिवसांनी आंतरराष्ट्रीय किमतींचा आढावा घेत दर बदलत असत. वरकरणी हा हेतू उदात्त आणि अर्थव्यवस्थेतील खुलेपणाचे लक्षण वाटू शकतो. परंतु यामुळे नेमके काय होणार आहे, हेही आपल्याला पाहायला हवे.

भारताला ८५% तेल आयात करावे लागते. किंबहुना परकीय चलनाचा मोठा हिस्सा आपल्याला तेल आयातीवर खर्च करावा तर लागतोच; पण आपला आयात-निर्यात इंडेक्स यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रभावित राहतो. भारतीय तेल उद्योग बव्हंशी सरकारी मालकीचा असल्याने तेलाच्या किमती या नेहमीच राजकीय प्रभाव व सोयीनुसार ठरवल्या जात असत. २०१० पासून पेट्रोल, तर २०१४ पासून डिझेल नियंत्रणमुक्त करण्यात आले. म्हणजे तेल कंपन्यांनाच आंतरराष्ट्रीय दरांनुसार व परकीय चलनाच्या विनिमय दरानुसार तेलाचे दर ठरवायचे अधिकार देण्यात आले. पण असे असले तरी कंपन्याच सरकारी मालकीच्या असल्याने दरनिश्चितीवर राजकीय प्रभाव पडणे अपरिहार्य होते. जानेवारी ते मार्च १७ या काळात पाच राज्यांतल्या निवडणुका असल्याने यामुळेच तेल कंपन्यांना इंधन दरामध्ये वाढ करू दिली गेली नव्हती. हा असा तोटा भरून काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय भाव कोसळले असले तरी सरकार तेल कंपन्यांना जादा दराने तेल विकू देत होते. आता तसे होणार नाही व लोकानुनयी धोरण तसेच ठेवता येणार नाही. या रोज दरबदलाच्या निर्णयाचा हा एक फायदा म्हणता येईल. शिवाय आता नजीकच्या भविष्यात कोणत्या मोठ्या निवडणुकाही नसल्याने या काळात या बदलाची चाचणीही होईल आणि त्यानुसार हेच धोरण पुढे चालू ठेवायचे की नाही हे ठरवता येईल. थोडक्यात बदलासाठीही राजकीय वेळ साधली गेल्याचे आपण पाहू शकतो. भविष्यात नेमके काय होणार आहे हे तेल उत्पादक राष्ट्रांच्या व कंपन्यांच्या धोरणावर अवलंबून असणार आहे.

आंतराष्ट्रीय तेलाचे उत्पादन व व्यापार हा एक अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे. तेल उत्पादक कंपन्यांतील जीवघेण्या स्पर्धेचे जसे तेलाच्या उत्पादन व किमतींवर परिणाम होतात तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणाचेही पडसाद त्यावर पडतात. तेलावर राज्य म्हणजे जगावर राज्य ही धारणा ओपेक व अमेरिकेने जशी जोपासली तशीच रशियानेही जोपासलेली आहे. या स्पर्धेचा परिपाक म्हणून तेलाचे अतिउत्पादन केले गेले व त्यामुळे कच्च्या तेलाचे भाव ७५% नी कोसळत २६ डॉलर प्रतिपिंप या नीचांकी पातळीवर पोहोचले. ही आतबट्ट्यातील विक्री होती. कारण तेल उपशाचा खर्चही त्यातून भागणे शक्य नव्हते. त्यामुळे धाबे दणाणलेल्या उत्पादक कंपन्यांनी पुन्हा एकदा साटेलोटे करण्याचा प्रयत्न करत तेल उपसा कमी करत किमती पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यात कोणी ना कोणी खोडा घालत राहिले असले तरी आजमितीला तेलाचे भाव ४० ते ५० डॉलर प्रतिपिंपाच्या दरम्यान घोटाळत असल्याचे आपल्याला दिसते. म्हणजेच नीचांकी पातळीच्या जवळपास दुप्पट भाववाढ जानेवारी २०१६ नंतर झालेली आहे. त्यात इंधनाच्या जागतिक मागणीत होणारी दरवर्षीची सरासरी १.८% वाढ ही केवळ १% एवढीच मर्यादित राहिल्यानेही तेलाच्या किमतींवर धरबंध बसला. याला कारण झाले ते जागतिक अर्थव्यवस्थाच कोणत्या ना कोणत्या कारणाने संकटात जात असल्याचे. ओपेकचेही तेल उत्पादकांवरील नियंत्रण प्रभावी राहिलेले नाही, हेही एक कारण आहेच.

परंतु भविष्यात हाच कल राहील, असे मानण्याचे कारण नाही. तेलाचे भाव पुन्हा मूळ पदावर, म्हणजे ११५ डॉलर प्रतिपिंप, येत्या काही काळात जाण्याची दाट शक्यता आहे. किंबहुना ओपेक त्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. तेल उत्पादक कंपन्या अधिक उत्पादनाच्या हव्यासात आपला नफा फार काळ घटवतील, असे नाही. प्रदूषणविरहित ग्रीन एनर्जीबाबत जग कितीही उत्सुक असले तरी अद्याप तरी तेलाला किफायतशीर पर्यायही सापडलेला नाही. या शतकाच्या अखेरीपर्यंत तेलाचा वापर कमी करत नेण्याचा जी-७ राष्ट्रांनी ठराव केला असला तरी ते वास्तवात कसे येईल हे भावी संशोधने ठरवतील. आज मात्र तेलाला पर्याय नाही हेच चित्र आहे. भविष्यात तेलाची मागणी वाढत जाणार आणि तेल कंपन्यांतील उत्पादन युद्ध संपून तेलाचे भाव चढत्या क्रमाचेच राहणार हे उघड आहे.

आता प्रश्न येतो तो हा की, आंतरराष्ट्रीय तेलदरांशी जुळवून घेण्यासाठी हा जो रोजच ताज्या दरांनुसार तेलविक्री करण्याचा निर्णय अमलात आणण्यात आला आहे त्याचा नेमका काय परिणाम भारतीय ग्राहकांवर होणार आहे हा.

पहिली बाब अशी की, तेलाला २०१० पासून नियंत्रणमुक्त करायला सुरुवात झाली असली तरी आंतरराष्ट्रीय भाव ७५% नी कोसळूनही भारतीय ग्राहकांना त्याचा कसलाही लाभ मिळाला नाही. याचे कारण म्हणजे जसजसे आंतरराष्ट्रीय दर कोसळत गेले तसतसे मोदी सरकार तेलावरील कर वाढवत गेले. यामुळे सरकारी तिजोरीत लक्षणीय भर पडली असताना नागरिकांच्याही खिशावर भार पडत गेला. थोडक्यात आंतरराष्ट्रीय तेलदर बदलांतील फायदा रोजच थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवायचा हे जे काही उद्दिष्ट सांगितले जाते त्यात विशेष अर्थ नाही. तेलदरातील रोज फार विशेष अशी वाढ-घट होत नाही. यामुळे पेट्रोलपंप चालकांचे मात्र तेवढे कारकुनी काम वाढले आहे व ते याबाबत नाराजही आहेत. ग्राहकांना या निर्णयाचे कौतुकही नाही की विरोधही नाही. 
पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, तेलाचे दर वाढत गेले तर सरकार त्यावर लादलेले कर कमी करणार की, ते जैसे थे ठेवत ग्राहकांवर तो बोजा टाकणार? जसजसे आंतरराष्ट्रीय भाव वाढतील तसतसे तेलावरील कर कमी करत ग्राहकांना दिलासा मिळावा ही अपेक्षा चुकीचे असू शकत नाही कारण आंतरराष्ट्रीय किमतीतील घटीचा कसलाही फायदा भारतीय ग्राहकाला मिळालेला नाही. काही पैसे वा एक-दोन रुपयांची सध्या रोज होऊ शकणारी इंधन दरातील वाढ-घट हा ग्राहकांच्या चिंतेचा विषय नसून आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती चढ्याच राहत गेल्या तर काय परिस्थिती असेल, हा आहे. कारण सध्याचे कर असेच राहिले आणि तेलाचे भाव अगदी ६० डॉलर प्रतिपिंप झाले तर आपल्याला पेट्रोल १०० रुपये लिटरने घ्यावे लागेल, अशी सध्याची स्थिती आहे. असे झाले तर ग्राहकाचे कंबरडे तर मोडेलच; पण एकूणातील अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम होईल.

आणि समजा सरकारने करांचे प्रमाण कमी करत नेले तरी ग्राहकांना ते आज घेत आहेत त्याच भावाच्या आसपास दर द्यावे लागतील. म्हणजेच आंतरराष्ट्रीय दरांशी रोजच्या रोज जोडले जाण्याचा हा प्रयत्न कसा फसवा आहे हे आपल्या लक्षात येईल. भारतीय अर्थव्यवस्थेची सध्या झालेली नाजूक अवस्था पाहता सरकार कर कमी करेल हा आशावाद झाला. कोणत्याही करामुळे उत्पन्नाची चटक लागलेले सरकार त्यावर पाणी सोडेल ही आशा करता येत नाही. जीएसटीमधून सध्या तेलाला वगळले आहे ते यामुळेच. थोडक्यात आंतरराष्ट्रीय तेलदरांशी जुळवून घेण्याचा सरकारी दावा कुचकामी आहे व त्यातून ग्राहकहित साधले जाण्याची शक्यता धूसर आहे.


Saturday, June 17, 2017

दुर्घर दुखण्यांनी त्रस्त झालेले जग!


Inline image 1




व्यवस्था बदलत राहतात. कोणतीही व्यवस्था अमरतेचा पट्टा घेऊन जन्माला आलेली नाही हे आपण पाहिले. सुजाण व विचारी नागरीक आपल्या भविष्यातील पिढ्या अधिकाधिक चांगल्या वातावरणात वाढाव्यात यासाठी नवनव्या व्यवस्थांची मांडणी करीत असतात. त्या अंमलात याव्यात यासाठीही प्रयत्न करत असतात. पण कोणती व्यवस्था श्रेष्ठ याबाबतचे अहंकार आणि त्या अहंकारांतील संघर्ष याने जग बरबटलेले आहे व त्यामुळे भविष्याकडे जाण्याचा आपला वेग मंदावलेला आहे आणि जगात एका परीने गोंधळाची स्थिती उत्पन्न झाली आहे हे आपण पाहू शकतो. एका अर्थाने आजचे मानवी जग हे अनेक दुर्घर दुखण्यांनी जखडले आहे आणि त्यातून ते उमद्या भविष्याची कामना करत आहे असे आपण पाहू शकतो.  

"एक जग:एक राष्ट्र" या संकल्पनेचा पुर्णत्वापर्यंतचा प्रवास तेवढा सोपा नाही. या संकल्पनेच्या प्रत्यक्षात येण्यामुळे अखिल मानवजातीचे ख-या अर्थाने वैश्विक नागरिक होण्याचे स्वप्न साकार होईल याबाबत फारशी कोणाला शंका नाही. याला "दिवास्वप्न" समजणारे लोकही कमी नाहीत. आमचेच राष्ट्र जगातील अन्य राष्ट्रांवर सत्ता गाजवत राहील अशी स्वप्ने पाहणारी राष्ट्रे आता अनेक झाली आहेत. अमेरिका तर कधीपासुनच स्वत:ला महासत्ता समजते. पुर्वी ग्रेट ब्रिटन हे महासत्ता होते. जर्मनीने हिटलरच्या नेतृत्वाखालीच महासत्ता बनण्याचा प्रयत्न केला होता. साम्यवादी रशियानेही अर्ध्या जगावर प्रभुसत्ता गाजवली. आज चीनही त्या दिशेने वाटचाल करीत आहे पण चीनची अर्थव्यवस्थाच ब-याच अंशी अमेरिकेवर अवलंबून आहे. जर्मनीनेही आतापासून नव्याने महासत्ता बनण्यासाठी हालचाली सुरु केल्या असून शिक्षणपद्धतीतही त्या दृष्टीने बदल करायला सुरुवात केली आहे. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनीही भारतीयांत महासत्तेचे स्वप्न पेरले. पण महासत्ता म्हणजे नेमके काय याची व्याख्या मात्र अन्य राष्ट्रांवर आर्थिक व राजकीय प्रभुत्व गाजवणे (म्हणजेच अन्य राष्ट्रांन मांडलिक बनवणे" एवढ्यापुरती मर्यादित झालेली आहे. खरे म्हणजे महासत्ता होण्याच्या काही राष्ट्रांच्या स्पर्धेमुळे राष्ट्रवादाने एक विकृत स्वरूप धारण केले आहे. 

आज उजव्या विचारसरणीच्या लोकांची चलती आहे. विचारसरणी कोणतीही सर्वस्वी वाईट अथवा टाकावू असते असे नाही. किंबहुना विविध विचारसरण्यांचे सह-आस्तित्व व त्यातील वाद-विवादांमुळे पुढे जाणारे विचार आपल्याला अभिप्रेत असतात. प्रत्यक्षात आपल्याला असे दिसते की "विचारहीणांचा विचार" असे उजव्यांच्या विचारसरणीचे जागतीक रुप बनले आहे आणि त्याला भारतीय उजवा विचारही अपवाद नाही. किंबहुना ही राष्ट्रवादाचीही शोकांतिका आहे असेच आपल्याला म्हणावे लागेल.

डाव्यांचे म्हणावे तर तेही पोथीनिष्ठतेत अडकलेले असल्याने व मानवी स्वातंत्र्याची त्यांच्याही लेखी उजव्यांप्रमाणेच काही किंमत नसल्यामुळे त्यांचाही विचार मानवकल्याणाला उपयुक्त आहे असे दिसलेले नाही. जेवढी हिंसा जगात कम्युनिस्टांमुळे झालेली आहे व ज्या पद्धतीची समता ते आणू पाहतात ते पाहता त्यांना मानवी मुल्यांना चिरडणारी निरंकुश सत्ता असणारे जागतीक सत्ताकेंद्र व्हायचे आहे हे इतिहासाने सिद्ध केले आहे. लोकशाहीची मुल्ये साम्यवाद्यांना मुलत:च मान्य नाहीत. भारतात १/३ भुमीवर कब्जा बसवलेले माओवादी हे याच वादाचे खुनशी अपत्य आहे. यात मानवी जीवनाचे हित होणे तर दूर उलट मातेरे होणे स्वाभाविक आहे. समता हा अत्यंत फसवा शब्द असून त्याचे भारतातही घटनात्मक तत्व असुनही काय झाले आहे हे भारतीयांना चांगलेच माहित आहे. शिवाय, उजवे काय आणि डावे काय, त्यांच्यातही एवढे उप-विचारप्रवाह आहेत की कोणाला नेमके काय सांगायचे आहे आणि प्रत्यक्षात सत्ता मिळाल्यावर ते कसे वागणार आहेत याबाबत कोणी निश्चयाने सांगू शकणार नाही. त्यामुळे राष्ट्र ही संकल्पना दुषित तर झालीच आहे पण सा-या जगाचे एक राष्ट्र बनवण्याच्या महनीय संकल्पनेतील ते अडसरही आहेत. 

मुस्लिम ब्रदरहुड ही एक जागतीक राष्ट्र बनवण्याच्या संकल्पनेने पछाडलेली संस्था आहे. जगातील सर्वाधिक क्रुरकर्मा म्हणून कुख्यात झालेल्या इसिसचा जन्म त्यातुनच झाला. इसिसने नवखिलाफत स्थापन केली असून हळू हळू जगच काबीज करत नेत इस्लामी सत्ता स्थापन करण्याचे इसिसचे स्वप्न आहे. त्यांनी बनवलेल्या योजनेनुसार पुढील काही वर्षात भारतासह युरोप, अमेरिका ते आफ्रिकेतील अनेक राष्ट्रे दहशतवादाच्या आधाराने आपल्या स्वामित्वाखाली आणत "इस्लामी जग" बनवण्याचा त्यांचा मानस आहे. म्हणजे त्यांनाही एक जग एक राष्ट्रच हवे आहे पण ते इस्लामी सत्तेखालील! त्यांच्या स्वामित्वाखालील जग विशूद्ध इस्लामी तत्वांनुसार चालेल. त्यासाठी इसिसने रक्तरंजित संघर्ष मांडला असून युरोपात त्याची धग आधीच पोहोचली आहे. भारतातील काही मुस्लिमांनाही या संकल्पनेचे आकर्षण असून काही प्रत्यक्ष तर अनेक त्याचे छुपे समर्थक आहेत. मानवी हिताचे, मानवाला उपकारक असे "उदात्त एक जग:एक राष्ट्र" इसिसच्या संकल्पनेत नाही हे उघड आहे. धर्मांध, एका धर्माच्या वर्चस्वाखालील चिरडलेल्या अन्य धर्मियांचे मिळून त्यांना "एक जग:एक राष्ट्र" बनवायचे आहे. आणि सारी सत्ता या नवखिलाफतीमार्फत राबवली जाणार आहे. त्यात लोकशाहीला काही स्थान नाही हे उघड आहे. साम्यवाद आणि इस्लामवादात धर्म हा मुद्दा सोडला तर तसा विशेष फरक नाही हेही आपल्याला माहित आहे.

अन्य धर्मियांनाही आपल्याच धर्माचे वर्चस्व असलेले जग नको आहे अशातला भाग नाही. काहींचे छुपे तर काहींचे उघड प्रयत्न त्या दिशेने चालुच असतात. मध्यपुर्वेतील संघर्षाकडे आपण क्रुसेड काळातील ख्रिस्ती, ज्यु व इस्लाम यांच्यातील संघर्षाचे प्रतीरुप म्हणूनच पाहु शकतो. ख्रिस्ती व ज्यू राष्ट्रे विरुद्ध इस्लामी राष्ट्रे अशी सध्याची व्यूहनीति आहे. भविष्यात ती वेगळे परिमाण धारण करू शकेल. पण धार्मिक, वांशिक व प्रादेशिक अस्मिता, ज्या केवळ काल्पनिक पुरातनाच्या व श्रेष्ठत्ववादाच्या वर्चस्वतावादी गंडातून येतात त्यांचेही काय करायचे हा अखिल मानवजातीसमोरील एक गहन प्रश्न आहे. त्यावरही आपल्याला चिंतन करावे लागणार आहे. 

थोडक्यात अर्थविचारवाद (भांडवलशाही की साम्यवाद?) आणि धर्मवाद (कोणत्या धर्माच्या स्वामित्वाखालील जग?) आणि तदनुषंगिक मानवाच्याच भ्रमांतून निर्माण झालेल्या श्रेष्ठतावादाच्या गंडांत संघर्ष होत राहिल्याने ख-या अर्थाने "एक जग : एक राष्ट्र" कसे बनेल याची सुजाणांना चिंता लागणे स्वाभाविक आहे. सध्या जरी भांडवलशाही विचाराने जग पादाक्रांत केले असले तरी त्यालाही हे जागतीक संदर्भ असल्याने अनेक राष्ट्रांत भांडवलशाहीची जागा  "कुडमुड्या" बनावट भांडवलवादाने घेतली आहे. भारत हे या अशाच भांडवलवादाचे सर्वात मोठे उदाहरण आहे. भारतातील समाजवादही आता विकृत पातळीवर जावून पोहोचला आहे. त्यामुळे भारतातीलच नागरीक आपल्या एकुणातील अर्थव्यवस्थेच्या रसातळाला जाण्याने पिचत आहेत. समाजवादात "समाज" कोठेच राहिलेला नाही पण याची सामाजिक चिंताही आपल्याला नाही. मग नवे सुसंगत तत्वज्ञान शोधण्याची प्रेरणा कोठून येणार? म्हणजेच अर्थतत्वज्ञानास समृद्ध करत त्यानुषंगाने त्याला मानवी चेहरा देण्यास भारतीय विचारवंत व अर्थतज्ञांना अपयश तर आलेच आहे पण सत्तेत असनारे राजकीय पक्ष हे केवळ सत्ताकारणानेच तेवढे भारावून गेल्याने नार्सिससप्रमाने आपल्याच कोषात गुंगत नागरीहिताचे मात्र शत्रू बनले आहेत असेही चित्र आपल्याला दिसते. आणि हे चित्र जगात अनेक राष्ट्रांत आपल्याला पहायला मिळते. किंबहुना "राजकारण" या संकल्पनेची नवी व्याख्या होण्याची आवश्यकता असुनही विचारवंत ती करण्याचा प्रयत्न करीत नाहीत असेही चित्र आपल्याला दिसते.

आजचे जग जेथे आहे तेथून समृद्धीकडे व समग्र मानवहिताकडे जाण्यात जे अडथळे आहेत ते मी येथे थोडक्यात विशद केले आहेत. आजचे जग हे दुखण्यांनी त्रस्त आहे. यावर इलाज म्हणून जर आपल्याला नवतत्वज्ञानाची संजीवनी हवी असेल तर ती कोणकोणत्या प्रकाराने पुढे येवू शकते, आम्ही भारतीय त्यात कोणत्या प्रकारे हातभार लावू शकतो व जागतीक मानव बनण्याच्या प्रक्रियेत पुढाकार घेवू शकतो याचा विचारही आपण करणार आहोत!

Ceaseless Search for the Aryans!


 Image result for genetics aryan issue

 I came across the article published in The HinduHow genetics is settling the Aryan migration debate” by Tony Joseph.

The wonder is they have still embraced the outdated term like Aryans. The well-known fact is the invention of farming cannot be attributed to a single source. We have the oldest archaeological proof from Zagros mountains dating back to 10000 years BC. In fact, no civilisation ever develops in isolation. There are always exchanges between the civilisations along with the independent innovations and inventions and language forms a majority part of any culture.

 When we speak of the ancient past, genetics as a modern tool being used to understand our ancestry, many times give conflicting results for the samples we have are very scarce and that too contaminated by the onslaught of nature. Not more than 101 skeletons have been genetically examined so far and yet the geneticist's can make any claim to explain riddles of the ancient history.

 For example, their report published in The Hindu boldly affirms that sometime around 2000 BC -1500 BC Indo-European language speakers did stream in India with their distinct culture and Sanskrit language! A major unanswered question is, how genetics told these experts which language they spoke and what material culture they really lived from their genes?  The report is fake on many counts when it claims the migration was negated by the research so far, as two major recent reports have dealt with the very issue of the PIE migration through genetics and had conveniently confirmed the migrations of the PIE speakers’, contrary to the claim made by The Hindu.

 A large team led by Morten E Alentoft examined about 101 sampled ancient individuals from Europe and Central Asia. They also used the archeological evidence of chariot burials (2000-1800 BC) to find the migration pattern. The report relies on the hypothesis of the linguists that ‘the spread of Indo-European languages must have required migration combined with social or demographic dominance and this expansion has been supported by archweologists pointing to striking similarities in the archeological record across western Eurasia during the third millennium BC. The genomic evidence for the spread of the Yamnaya people from the Pontic-caspian Steppe to both northern Europe and Central Asia during the early Bronze Age corresponds well with the hypothesized expansion of the IE languages.'  (You may read this report on https://www.nature.com/nature/journal/v522/n7555/full/nature14507.html)

The report appeared in “Science” (Feb. 15) is based on the research of a large team of geneticists led by David Reich and Iosif Lazaridis of Harward Medical School. The DNA samples suggest that the Yamnaya people (DNA obtained from 4 skeletons) could have moved from Steppes 4500 years ago. This paper claims to have connected two far-flunged material cultures to specific genetic signatures. The report states that the team says they spoke a form of Indo-European language. Earlier it was considered that the origins of PIE were 6000 years ago. To meet this gap, hypothetically, it is being proposed that this may be secondary migration!

 It is also agreed by the genetic scientists that they cannot tell the language of people from their DNA's. I have read the original report and it is admitted that they cannot tell for sure the ancestry of the original PIE speakers of Bronze Age because this was not the independent culture but was an admixture of East European or Caucasus hunter-gatherers and near eastern people. So, genetically too, Yamna people were blending of three distinct ancestries. Hence, if at all PIE existed, its origin cannot be attributed to the archaic skeletons from which the DNA’s were extracted to make a big claim.

 

Migrations is a historical fact around the globe for many reasons, but it is a bold claim that the movement of the certain group of the people belonging to some hypothetical culture destroyed or impacted heavily the languages and cultures of the old inhabitants of the regions unless they could outnumber them. Also attributing migrations of about 4500 years ago to the invention of the agriculture is a farfetched lie because the invention of the agriculture dates back to not less than 10000 BC. Also one cannot credit ceratin group of the people for any invention that changed the face of the mankind.

 It is a fact that the Vedic religion and its original adherents entered India sometime around 1000 BC but their number was not as high to outnumber local inhabitants. The scriptural proofs indicate that the cultural and linguistic traits of India influenced the Vedic religion and language of the migrant's. Indo-European language theory is renaming of old Aryan race theory and European supremacist approach still works hard by their ceaseless misrepresentation of the Genomic analysis to make out over and again their theory!

 Comparison of the modern and ancient DNA cannot tell the story of the mankind because DNA samples are too a few and prone to give conflicting results as they have in recent past. Still, the report of Hindu theoretically considers there were two groups, one that was came to India tens of thousand years ago and other came to India 4,000 to 3,500 years ago. This second group is claimed to be Indo-Aryan when there is no proof what were DNA’s of the Indo-Aryans because genetics do not tell us racial or linguistic traits.

The author of this article published in Hindu, Tony Joseph, however, cautions us to treat population genetic models with caution because it works on the assumption which may be wrong or limited to the scope of their study!  The main assumption that those migrated about 4,000 to 3,500 years ago were speakers of the Indo-Europen language is such a baseless and unscientific assumption that the whole conjecture falls apart. 


The issue of the ancient humanities is complex. Origin of the languages cannot be attributed to any special group of the people. Geology might be playing the significant role in the origin of different languages. The spread of the cultures do not necessarily require demographic migrations. Migrations do not impact local cultures to the extent of erasing their language and cultures. The issue is actually overrated by the people who are in search of hypothetical Superman! 

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...